शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची बहीण काय करते? या मंदिराबाहेर गेलात तर समजेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 17:23 IST

ऋषिकेशपासून ३६ किमी दूरवर असलेलं नीलकंठ महादेव मंदिर लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे. याच मंदिराच्या परिसरात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मोठी बहिण प्रसादाचं दुकान चालवते. तसंच दररोज आपल्या लहान भावाच्या यशासाठी भगवान शंकराकडे प्राथर्ना करते. 

नवी दिल्ली-

ऋषिकेशपासून ३६ किमी दूरवर असलेलं नीलकंठ महादेव मंदिर लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे. याच मंदिराच्या परिसरात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मोठी बहिण प्रसादाचं दुकान चालवते. तसंच दररोज आपल्या लहान भावाच्या यशासाठी भगवान शंकराकडे प्राथर्ना करते. 

नीलकंठ मंदिराबाहेर एकूण ७० प्रसाद आणि इतर पुजा साहित्याची दुकानं आहेत. यात एक दुकान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मोठी बहिण शशि पयाल यांचं आहे. ज्या दुकानातून आपण प्रसाद घेत आहोत किंवा चहा-नाश्ता करत आहोत त्या दुकानाची मालकीण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बहीण आहे याची कुणी कल्पनाही केली नसेल. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या भाऊ यशस्वी व्हावा यासाठी शशि पायल या रोज भगवान नीलकंठ महादेवाकडे प्रार्थना करतात. भाऊ योगी आदित्यनाथ यांच्या कपाळावर विजयाचा तिलक पाहणं हे आपलं स्वप्न असल्याचं शशि पायल सांगतात. 

१९९४ नंतर कधीच बांधली नाही राखीबालपणापासूनच योगी आदित्यनाथ यांचा स्वभाव इतर भावंडांपेक्षा खूप वेगळा होता. ते खूप गंभीर प्रवृत्तीचे होते. दरवर्षी रक्षाबंधनासाठी त्या योगी आदित्यनाथ यांना राखी आठवणीनं पाठवतात पण १९९४ सालापासून आजवर एकदाही त्यांना राखी बांधण्याची संधी मिळालेली नाही. १९९४ साली योगी आदित्यनाथ यांनी संन्यास घेतला. त्यानंतर रक्षाबंधनाचा योग कधीच जुळून आलेला नसल्याचं त्या सांगतात. योगी आदित्यनाथ यांनी संन्यास घेतल्यानंतरही एक दिवस येईल की आपला भाऊ घरी परतेल असं वाटत होतं. पण आता तशी शक्यता नसल्याचंही त्या म्हणाल्या. 

योगी आदित्यनाथ यांच्या स्वभावातील रोखठोकपणा आणि तितकाच मृदू भाव त्यांना वारसा हक्कानंच मिळाला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. योगी आदित्यनाथांना एकूण ७ भावंडं होती. यात शशि पायल या सर्वात मोठ्या आणि योगी आदित्यनाथ पाचव्या क्रमांकाचे बंधू आहेत. ३१ वर्षांपूर्वी शशि यांचा विवाह कोठार गावातील पूरण सिंह पयाल यांच्याशी झाला. पती-पत्नी दररोज कोठार गावातून पायी चालत जवळपास अडीच किमी अंतर पार करुन नीलकंठ मंदिर परिसरातील दुकानात येतात. दररोज सकाळी सात वाजता दुकान उघडतात आणि दुपारी चार वाजता दुकान बंद करुन घरी परतात. शशि यांना तीन मुलं आहेत. एका मुलाचा विवाह देखील झाला आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२