शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

UP Election 2022: यूपी मा हवा कुछ बदला बदला सा है..! वाराणसीतील मतदारांनी व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 06:12 IST

UP Election 2022: योगी सरकारने पाच साल में कुछ अच्छे काम किये जरूर है, लेकीन... वाराणसीतील मतदार सांगत होते.

धनाजी कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क

वाराणसी : योगी सरकारने पाच साल में कुछ अच्छे काम किये जरूर है, लेकीन सांड और गाय के बारे में जो वादा किया था वो पुरा नहीं किया. उसी वजह से हमरा यूपी का हवा अब कुछ और ही है..! असं वाराणसीत भेटलेले मतदार सांगत होते.

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा माहोल अंतिम टप्प्यात आला, तशी रंगतदेखील वाढली आहे. कोण बाजी मारणार हे आता १० तारखेला कळेल. येथील मतदारांसोबत बोलताना शेवटचा टप्पा किती महत्त्वाचा मानला जातो, याचा अंदाज आला.

पन्नाशीत असलेले जौनपूरचे जंगबहादूर यादव राजकारणाबरोबर सामाजिक परिस्थितीबद्दल बोलत होते. योगी सरकारने नागरिकांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा पायंडा पाडला. अखिलेश यादव सत्तेत होते, तेव्हा त्यांनी मूलभूत नागरी सुविधा पुरवण्यावर भर दिला होता. 

जनतेला आता सार्वजनिक विकासापेक्षा व्यक्तिगत विकासाचा मुद्दा महत्त्वाचा वाटत असल्याने ते तत्काळ मिळणाऱ्या फायद्याचा विचार करतात. मात्र, आता यूपीची हवा बदलली आहे, असे त्यांना वाटते. उत्तर प्रदेशात मोकाट जनावरांचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. 

मोकाट जनावरांमुळे शेतीचे नुकसान होते. अपघात होतात. लोक मारले जातात; पण सरकारने ठोस काही केले नाही. त्याचा प्रचंड राग जनतेच्या मनात आहे.

गाजीपूरचा मोहम्मद अरशद हा तरुण म्हणाला, मी परदेशात असतो. राज्यातच काम मिळाले तर आम्हाला परदेशात जाण्याची गरज नाही. राजकारणी आश्वासने देतात, ती पाळली जात नाहीत. आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे, विवेक जागा ठेवून त्याचा उपयोग केला पाहिजे.

मिर्जापूरचे इम्तियाजअली अन्सारी मुंबईत खारघरमध्ये छोटा व्यवसाय करतात. भाजप-सपमध्येच मुख्य लढत असली तरी इतर पक्षांची काही प्रमाणात ताकद आहेच. त्यामुळे एका पक्षाला बहुमत मिळेल अशी परिस्थिती नाही, आघाडी करूनच सरकार स्थापन करावे लागणार आहे. जातिधर्माच्या नावावर मते फिरविण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

रोजगाराची केवळ घोषणाच राहू नये

कौशिक घोष हे मूळचे पश्चिम बंगालचे. व्यवसायामुळे वाराणसीत असतात. ते म्हणाले, भाजपला जागा जास्त मिळणार नाहीत; पण सरकार त्यांचेच येईल. राकेश कुमार हा तरुण म्हणाला, तरुण वर्गाची मतेही निर्णायक ठरतील.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Politicsराजकारण