शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
2
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
3
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
4
शौचालयाच्या खाली असलेल्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनमध्ये गळती, दूषित पाण्यामुळे ७ जणांचा मृत्यू, १४९ जण गंभीर; अधिकारी निलंबित
5
बाथरुममध्ये गेली अन् जीव गमावून बसली; वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तरुणीसोबत काय घडलं?
6
खामेनेईंची सत्ता धोक्यात! इराणमध्ये लोक रस्त्यावर का उतरले? जाणून घ्या कारण...
7
नील सोमय्यांविरोधात दोन्ही ठाकरे, काँग्रेसने उमेदवारच दिला नाही?, किरीट सोमय्यांनी मानले देवाचे आभार
8
Team India ODI Schedule 2026: रोहित-विराटची क्रेझ! नव्या वर्षात टीम इंडिया किती वनडे खेळणार?
9
वॉरेन बफेंची 'एनर्जी मशीन' आज पासून अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोण आहेत ग्रेग एबेल, ज्यांच्या हाती आलीये बर्कशायर हॅथवेची धुरा
10
चमत्कार! ११ वर्षांच्या मुलावरून गेले मालगाडीचे ४० डबे, साधं खरचटलंही नाही
11
जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध
12
भारतीय अर्थव्यवस्थेची भरारी! बँकांचा पाया भक्कम, एनपीए घटला; RBI च्या अहवालात नेमकं काय म्हटलंय?
13
वडील आणि भावाला गमावलं, दु:खाचा डोंगर कोसळला, पण खचला नाही, आता कमबॅकसाठी सज्ज झालाय हा भारतीय गोलंदाज
14
Malegaon Election 2026: 'इस्लाम' पार्टीने खाते उघडले; मुनिरा शेख बिनविरोध निश्चित, अपक्ष उमेदवाराने घेतली माघार
15
Ai व्हिडिओद्वारे 'या' भारतीय युट्यूब चॅनेलने एका वर्षात केली तब्बल 38 कोटी रुपयांची कमाई
16
Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव मनपा उमेदवारी छाननीत १५ अर्ज ठरले बाद; अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम
17
अखेर मुंबईत ‘या’ ठिकाणी ठाकरे बंधू आमने-सामने; मनसे-उद्धवसेनेने अर्ज भरले, कोण माघार घेणार?
18
Vastu Tips: २०२६ मध्ये नशीब सोन्यासारखं चमकेल, फक्त कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर करा 'हा' छोटा बदल!
19
हातात बिअरची बाटली घेऊन गोव्यातील रस्त्यावर फिरताना दिसली सारा तेंडुलकर, फोटो झाला व्हायरल   
20
रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 'या' कंपनीचे आहेत १७ लाखांपेक्षा अधिक शेअर्स; मोठी अपडेट, आता शेअरमध्ये हेवी बाईंग
Daily Top 2Weekly Top 5

UP Election 2022: यूपी मा हवा कुछ बदला बदला सा है..! वाराणसीतील मतदारांनी व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 06:12 IST

UP Election 2022: योगी सरकारने पाच साल में कुछ अच्छे काम किये जरूर है, लेकीन... वाराणसीतील मतदार सांगत होते.

धनाजी कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क

वाराणसी : योगी सरकारने पाच साल में कुछ अच्छे काम किये जरूर है, लेकीन सांड और गाय के बारे में जो वादा किया था वो पुरा नहीं किया. उसी वजह से हमरा यूपी का हवा अब कुछ और ही है..! असं वाराणसीत भेटलेले मतदार सांगत होते.

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा माहोल अंतिम टप्प्यात आला, तशी रंगतदेखील वाढली आहे. कोण बाजी मारणार हे आता १० तारखेला कळेल. येथील मतदारांसोबत बोलताना शेवटचा टप्पा किती महत्त्वाचा मानला जातो, याचा अंदाज आला.

पन्नाशीत असलेले जौनपूरचे जंगबहादूर यादव राजकारणाबरोबर सामाजिक परिस्थितीबद्दल बोलत होते. योगी सरकारने नागरिकांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा पायंडा पाडला. अखिलेश यादव सत्तेत होते, तेव्हा त्यांनी मूलभूत नागरी सुविधा पुरवण्यावर भर दिला होता. 

जनतेला आता सार्वजनिक विकासापेक्षा व्यक्तिगत विकासाचा मुद्दा महत्त्वाचा वाटत असल्याने ते तत्काळ मिळणाऱ्या फायद्याचा विचार करतात. मात्र, आता यूपीची हवा बदलली आहे, असे त्यांना वाटते. उत्तर प्रदेशात मोकाट जनावरांचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. 

मोकाट जनावरांमुळे शेतीचे नुकसान होते. अपघात होतात. लोक मारले जातात; पण सरकारने ठोस काही केले नाही. त्याचा प्रचंड राग जनतेच्या मनात आहे.

गाजीपूरचा मोहम्मद अरशद हा तरुण म्हणाला, मी परदेशात असतो. राज्यातच काम मिळाले तर आम्हाला परदेशात जाण्याची गरज नाही. राजकारणी आश्वासने देतात, ती पाळली जात नाहीत. आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे, विवेक जागा ठेवून त्याचा उपयोग केला पाहिजे.

मिर्जापूरचे इम्तियाजअली अन्सारी मुंबईत खारघरमध्ये छोटा व्यवसाय करतात. भाजप-सपमध्येच मुख्य लढत असली तरी इतर पक्षांची काही प्रमाणात ताकद आहेच. त्यामुळे एका पक्षाला बहुमत मिळेल अशी परिस्थिती नाही, आघाडी करूनच सरकार स्थापन करावे लागणार आहे. जातिधर्माच्या नावावर मते फिरविण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

रोजगाराची केवळ घोषणाच राहू नये

कौशिक घोष हे मूळचे पश्चिम बंगालचे. व्यवसायामुळे वाराणसीत असतात. ते म्हणाले, भाजपला जागा जास्त मिळणार नाहीत; पण सरकार त्यांचेच येईल. राकेश कुमार हा तरुण म्हणाला, तरुण वर्गाची मतेही निर्णायक ठरतील.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Politicsराजकारण