शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

उन्नाव खटला जलदगती न्यायालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 01:11 IST

पीडित कुटुंबाला पंतप्रधान योजनेंतर्गत घर

लखनौ : उन्नावमधील पीडित महिलेचा मृत्यू झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावर दु:ख व्यक्त करीत हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याचे निर्देश दिले, तसेच राज्य सरकारच्या दोन मंत्र्यांना तात्काळ उन्नाव प्रकरणातील त्या महिलेच्या गावी पाठविले असून अंत्यसंस्कार होईपर्यंत हे मंत्री येथे थांबणार आहेत. पीडितेचे पार्थिक शनिवारी रात्री ९ नंतर तिच्या गावी पोहोचले.

राज्य सरकारच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर शिक्षणमंत्री कमल राणी वरुण आणि कामगारमंत्री स्वामी प्रसाद मौर्य हे उन्नाव पीडितेच्या गावी रवाना झाले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी पीडितेच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केले असून, ही घटना दुर्र्भाग्यपूर्ण असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केलेली असून, खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

उन्नाव जिल्ह्याच्या बिहार पोलीस ठाण्यांतर्गत एका गावातील बलात्कारपीडिता गुरुवारी रेल्वेस्थानकाकडे जात असताना रस्त्यात पाच जणांनी तिला जिवंत पेटविले. यातील दोन जणांविरुद्ध पीडितेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. जवळपास ९० टक्के जळालेल्या पीडितेवर दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. शुक्रवारी रात्री तिचा मृत्यू झाला.

क्रूरतेस मर्यादा नसतात : ममता बॅनर्जी

उन्नावपीडितेच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टष्ट्वीट केले आहे की, क्रूरतेस कोणतीही मर्यादा नसते.

सरकार असंवेदनशील : मालिवाल

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी शनिवारी सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, ते बहिरे आणि असंवेदनशील आहे. पीडितेच्या किंकाळ्या त्यांना ऐकू येत नाहीत. बलात्कारातील दोषींना दोषी ठरविल्यानंतर सहा महिन्यांच्या आत फाशी दिली जावी या मागणीसाठी त्या बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत.

उपराष्ट्रपतींनी केली चिंता व्यक्त

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी चिंता व्यक्त केली आहे. एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, नवे विधेयक अथवा कायदा करणे हा यावर एकमेव तोडगा नाही. समाजातील वाईट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय कौशल्य आवश्यक आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दखल घ्यावी : मायावती

उत्तर प्रदेशात होणाऱ्या बलात्काराच्या घटनांवर राज्य सरकार व केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना बसपाप्रमुख मायावती यांनी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने अशा घटनांची स्वत:हून दखल घ्यावी, तसेच केंद्र सरकारला अशा प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत. तथापि, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा करावा. राज्यात असा एकही दिवस जात नाही की, ज्यादिवशी बलात्कार वा छेडछाडीची घटना घडत नाही.

पीडितेच्या कुटुंबाला २५ लाखांची मदत

पीडितेच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची मदत आणि पंतप्रधान निवास योजनेंतर्गत घर देण्यात येईल, अशी घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. अपर मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांनी सांगितले की, याशिवाय स्थानिक प्रशासन पीडितेच्या कुटुंबाला सर्वोतोपरी मदत करेन. उन्नावमध्ये दाखल झालेले कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी सांगितले की, आम्ही पीडित कुटुंबीयांसोबत आहोत.

बलात्काराचे खटले त्वरित निकाली काढा : प्रसाद

बलात्काराचे खटले त्वरित निकाली काढण्यासाठी एक यंत्रणा निश्चित करण्याची गरज आहे, असे मत कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, सरन्यायाधीश आणि ज्येष्ठ न्यायाधीशांना मी विनंती करतो की, असे खटले निकाली काढण्यासाठी एक यंत्रणा असावी. देशातील महिला वेदना आणि त्रासात आहेत. त्या न्यायाची मागणी करीत आहेत. गंभीर गुन्ह्यांसाठी ७०४ फास्ट ट्रॅक कोर्ट आहेत, तर पॉक्सो आणि बलात्कार प्रकरणांसाठी सरकार १,१२३ न्यायालये स्थापन करण्याच्या प्रक्रियेत आहे, असेही ते म्हणाले.

उत्तर प्रदेश बलात्काराची राजधानी : काँग्रेस

उन्नाव प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करीत काँग्रेसने म्हटले आहे की, उत्तर प्रदेश बलात्काराची राजधानी झाले आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनात यांनी म्हटले आहे की, उन्नाव प्रकरणाची जबाबदारी उत्तर प्रदेश सरकारवर आहे. याठिकाणी कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे.

टॅग्स :Unnao rape caseउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणPoliceपोलिस