शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

विविधतेतील एकता हीच आपली खरी ताकद - राष्ट्रपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 20:16 IST

विविधतेतील एकता हीच आपली खरी ताकद आहे. भारतातील विविधता, लोकशाही आणि विकास जगासमोरील एक आदर्श आहे.

नई दिल्ली : विविधतेतील एकता हीच आपली खरी ताकद आहे. भारतातील विविधता, लोकशाही आणि विकास जगासमोरील एक आदर्श आहे. तसेच, भौगोलिक विविधतेने संपन्न असलेल्या आपल्या देशात यशस्वीपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान महत्वाचे ठरत आहे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. प्रजासत्ताक दिन आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. 26 नोव्हेंबर रोजी आपण 70 वा 'संविधान दिन' साजरा करणार आहोत. शिक्षण, कला, संशोधन आणि खेळाबरोबरच लष्कराच्या तीनही दलात महिला आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले.

याचबरोबर, देशातील सर्व व्यक्तिंना समान संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. देशवासीयांच्या आशा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि विकसित भारत तयार करण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आपण आहोत. देशाला अद्याप मोठा पल्ला गाठायचा आहे. तसेच, रेल्वे सेवेतील सुधारणा, मेट्रो निर्माण, रस्ते बांधणी आणि देशांतर्गत विमान सेवेतील सुधारणांमुळे प्रवास सुखकर होत आहे. याशिवाय, मोबाइल तसेच इंटरनेटमुळे डिजिटल कनेक्टिव्हिटीमध्ये क्रांतिकारी बदल होत असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ईव्हीएमवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. याविषयी बोलताना  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ईव्हीएमचे समर्थन केले. ते म्हणाले, निष्पक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान अत्यंत गरजेचे आहे. मतदान करणे आपले कर्तव्य असून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहनही यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद केले. 

 

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदRepublic Dayप्रजासत्ताक दिन