शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर संयुक्त राष्ट्र गप्पच

By admin | Updated: April 14, 2017 01:28 IST

भारत आणि पाकिस्तानने आपापसातील प्रश्न शांततामय मार्गांनी सोडवण्यासाठी चर्चा करावी, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले. भारतीय नागरिक कुलभूषण जाधव

संयुक्त राष्ट्रे : भारत आणि पाकिस्तानने आपापसातील प्रश्न शांततामय मार्गांनी सोडवण्यासाठी चर्चा करावी, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले. भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेबद्दल भाष्य करण्यास संयुक्त राष्ट्रांचे (युनो) सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेझ यांनी नकार दिला. या एका विशिष्ट घटनेवर (कुलभूषण जाधव) भाष्य करण्याच्या अवस्थेला आम्ही नाहीत, असे गुटेरेझ यांचे प्रवक्ते स्टीफन दुतारीक यांनी बुधवारी येथे म्हटले. पाकिस्तानने जाधव प्रकरणात कायदा आणि न्यायाची योग्य प्रक्रिया वापरली नाही. या फाशीच्या शिक्षेला ठरवून केलेला खून असेच समजेल, असे भारताने म्हटले आहे. याबद्दल दुतारीक यांना प्रश्न विचारण्यात आला होता. जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला असून, दोन्ही देशांनी संवादाच्या माध्यमातून तो दूर करण्याची सूचना दुतारीक यांनी केली. (वृत्तसंस्था)जाधव प्रकरणी तडजोड नाही : पाकिस्तानी लष्करहेरगिरीच्या आरोपांवरून भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेवर कोणतीही तडजोड न करण्याचा निर्णय पाकिस्तानच्या वरिष्ठ लष्करी जनरल्सनी गुरुवारी घेतला. जाधव यांना फाशी दिले गेले तर त्याचे द्विपक्षीय संबंधांवर अत्यंत गंभीर परिणाम होतील, असा इशारा भारताने आधीच दिलेला आहे. लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांच्या अध्यक्षतेखाली कोअर कमांडर्सची बैठक रावळपिंडीत झाली. त्यात कोणतीही तडजोड न करण्याचा निर्णय झाला. लष्कराच्या जनसंपर्क विभागाने निवेदनाद्वारे ही माहिती दिली.कुलभूषण जाधव प्रकरणाची थोडक्यात माहिती जनरल्सना देण्यात आली व अशा देशविरोधी कृत्यांबद्दल कोणतीही तडजोड न करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे त्यात म्हटले आहे.भारताला माहिती नाहीनवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानात कोठे ठेवण्यात आले आहे आणि त्यांची प्रकृती कशी आहे, याबाबत भारत सरकारला कोणतीही माहिती नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने गुरुवारी सांगण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागले म्हणाले की, कुलभूषण जाधव निर्दोष आहेत आणि त्यांची सुटका पाकिस्तान सरकारने करावी, अशी भारतातील प्रत्येक व्यक्तीची भावना आहे आणि परराष्ट्र मंत्रालयालाही तसेच वाटत आहे. त्यामुळे त्याच्या सुटकेसाठी भारत सरकार प्रयत्न करीत आहे. कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी कोणत्याही टोकाला जाऊ , असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज पुन्हा एकवार स्पष्ट केले.