शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रामविलास पासवान यांचे निधन; वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 06:52 IST

गेल्या काही आठवड्यांपासून त्यांना दिल्लीतील खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली होती.

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान (७४) यांचे गुरुवारी निधन झाले. ते पाच दशकांहून अधिक काळ सक्रिय राजकारणात होते आणि देशातील मान्यवर दलित नेत्यांपैकी एक नेते होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिकमंत्री होते. गेल्या काही आठवड्यांपासून त्यांना दिल्लीतील खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली होती.रामविलास पासवान यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचे पुत्र आणि लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी ट्विट करून दिली. ::पापा... तुम्ही आता या जगात नाहीत; पण मला माहीत आहे की, तुम्ही जिथे कुठे आहात सदैव माझ्यासोबत आहेत, असे टष्ट्वीट चिराग पासवान यांनी केले आहे.समाजवादी चळवळीचे खंदे समर्थक असलेले रामविलास पासवान यांनी नंतर देशभरात बिहारचे अग्रणी दलित नेते म्हणून ओळख निर्माण केली. १९९० च्या दशकात मंडल आयोग लागू करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. पोलीस अधिकारी म्हणून निवड होऊनही त्यांनी राजकीय क्षेत्राची निवड केली.जीवनप्रवासराम विलास पासवान यांचा जन्म ५ जुलै, १९४६ रोजीचा. लोकजनशक्ती पक्षाचे ते अध्यक्ष होते. आठ वेळा लोकसभेवर निवडून गेलेले पासवान सध्या राज्यसभेचे सदस्य होते. त्यांनी त्यांच्या राजकीय किरकीर्दीची सुरुवात संयुक्त सोशालिस्ट पार्टीचा सदस्य या नात्याने केली. ते १९६९ मध्ये बिहार विधानसभेवर निवडून गेले होते. नंतर ते १९७४ मध्ये स्थापन झालेल्या लोकदलात गेले व त्याचे सरचिटणीस बनले. १९७७ मध्ये पासवान लोकसभेवर जागतिक विक्रम ठरला एवढ्या मतांनी निवडून गेले ते हाजीपूर मतदारसंघातून जनता पक्षाचे सदस्य म्हणून. वर्ष २००० मध्ये पासवान यांनी जनता दल सोडून लोक जनशक्ती पक्षाची स्थापना केली व ते त्याचे अध्यक्ष बनले. २००४ मध्ये ते संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये सहभागी झाले व केंद्रीय रसायने व खते मंत्री बनले. २००४ मध्ये ते लोकसभेची निवडणूक जिंकले; परंतु २०१४ मध्ये ते पुन्हा हाजीपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. पासवान हे जयप्रकाश नारायण यांचे कट्टर अनुयायी होते. १९८३ मध्ये त्यांनी दलित सेनेची स्थापना केली ती दलितांची दास्यातून सुटका करून कल्याणासाठी. १९९६ मध्ये पासवान रेल्वेमंत्री बनले. आॅक्टोबर १९९९ ते सप्टेंबर २००१ पर्यंत ते दूरसंचारमंत्री होते. नंतर ते एप्रिल २००२ पर्यंत कोळसामंत्री होते. २००९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पासवान यांनी लालूप्रसाद यादव व त्यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दलाशी युती करून लढवली.केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनाने देशाने दूरदृष्टीचा नेता गमावला. पासवान हे पीडित, शोषितांचा आवाज होते.- रामनाथ कोविंद, राष्ट्रपतीपासवान यांच्या निधनामुळे देशात निर्माण झालेली पोकळी कदाचित कधीच भरून निघणार नाही. माझे दु:ख व्यक्त करण्यास शब्दही नाहीत. पासवान यांचे जाणे हे माझे वैयक्तिक नुकसान आहे. मी मित्र, बहुमोल सहकारी गमावला.- नरेंद्र मोदी, पंतप्रधानदिलदार माणूस गमावलारामविलास पासवान यांच्या रूपात मी बंधूच गमावला. मला आठवते, मी म्हटल्यावर ते एका टपाल कार्यालयाच्याउद््घाटनासाठी यवतमाळला आले होते. मी तेथे म्हटले होते की, देशाचे संचारमंत्री कोणत्या टपाल कार्यालयाच्या उद््घाटनासाठीयेत नाहीत. माझ्या मनात हे आहे की, महाराष्ट्राला टेलिफोन व इंटरनेटसाठी आॅप्टिकल फायबर मिळत नाही. एवढे ऐकताच त्यांनी म्हटले की, मंत्री येतो तेव्हा तो काही घोषणा करून जातो. त्यांनी महाराष्ट्राला आॅप्टिकल फायबर देण्याची घोषणा केली. ते फारच दिलदार व्यक्ती होते. - विजय दर्डा, माजी खासदार,चेअरमन, लोकमत एडिटोरिअल बोर्ड