शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रामविलास पासवान यांचे निधन; वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 06:52 IST

गेल्या काही आठवड्यांपासून त्यांना दिल्लीतील खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली होती.

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान (७४) यांचे गुरुवारी निधन झाले. ते पाच दशकांहून अधिक काळ सक्रिय राजकारणात होते आणि देशातील मान्यवर दलित नेत्यांपैकी एक नेते होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिकमंत्री होते. गेल्या काही आठवड्यांपासून त्यांना दिल्लीतील खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली होती.रामविलास पासवान यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचे पुत्र आणि लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी ट्विट करून दिली. ::पापा... तुम्ही आता या जगात नाहीत; पण मला माहीत आहे की, तुम्ही जिथे कुठे आहात सदैव माझ्यासोबत आहेत, असे टष्ट्वीट चिराग पासवान यांनी केले आहे.समाजवादी चळवळीचे खंदे समर्थक असलेले रामविलास पासवान यांनी नंतर देशभरात बिहारचे अग्रणी दलित नेते म्हणून ओळख निर्माण केली. १९९० च्या दशकात मंडल आयोग लागू करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. पोलीस अधिकारी म्हणून निवड होऊनही त्यांनी राजकीय क्षेत्राची निवड केली.जीवनप्रवासराम विलास पासवान यांचा जन्म ५ जुलै, १९४६ रोजीचा. लोकजनशक्ती पक्षाचे ते अध्यक्ष होते. आठ वेळा लोकसभेवर निवडून गेलेले पासवान सध्या राज्यसभेचे सदस्य होते. त्यांनी त्यांच्या राजकीय किरकीर्दीची सुरुवात संयुक्त सोशालिस्ट पार्टीचा सदस्य या नात्याने केली. ते १९६९ मध्ये बिहार विधानसभेवर निवडून गेले होते. नंतर ते १९७४ मध्ये स्थापन झालेल्या लोकदलात गेले व त्याचे सरचिटणीस बनले. १९७७ मध्ये पासवान लोकसभेवर जागतिक विक्रम ठरला एवढ्या मतांनी निवडून गेले ते हाजीपूर मतदारसंघातून जनता पक्षाचे सदस्य म्हणून. वर्ष २००० मध्ये पासवान यांनी जनता दल सोडून लोक जनशक्ती पक्षाची स्थापना केली व ते त्याचे अध्यक्ष बनले. २००४ मध्ये ते संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये सहभागी झाले व केंद्रीय रसायने व खते मंत्री बनले. २००४ मध्ये ते लोकसभेची निवडणूक जिंकले; परंतु २०१४ मध्ये ते पुन्हा हाजीपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. पासवान हे जयप्रकाश नारायण यांचे कट्टर अनुयायी होते. १९८३ मध्ये त्यांनी दलित सेनेची स्थापना केली ती दलितांची दास्यातून सुटका करून कल्याणासाठी. १९९६ मध्ये पासवान रेल्वेमंत्री बनले. आॅक्टोबर १९९९ ते सप्टेंबर २००१ पर्यंत ते दूरसंचारमंत्री होते. नंतर ते एप्रिल २००२ पर्यंत कोळसामंत्री होते. २००९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पासवान यांनी लालूप्रसाद यादव व त्यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दलाशी युती करून लढवली.केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनाने देशाने दूरदृष्टीचा नेता गमावला. पासवान हे पीडित, शोषितांचा आवाज होते.- रामनाथ कोविंद, राष्ट्रपतीपासवान यांच्या निधनामुळे देशात निर्माण झालेली पोकळी कदाचित कधीच भरून निघणार नाही. माझे दु:ख व्यक्त करण्यास शब्दही नाहीत. पासवान यांचे जाणे हे माझे वैयक्तिक नुकसान आहे. मी मित्र, बहुमोल सहकारी गमावला.- नरेंद्र मोदी, पंतप्रधानदिलदार माणूस गमावलारामविलास पासवान यांच्या रूपात मी बंधूच गमावला. मला आठवते, मी म्हटल्यावर ते एका टपाल कार्यालयाच्याउद््घाटनासाठी यवतमाळला आले होते. मी तेथे म्हटले होते की, देशाचे संचारमंत्री कोणत्या टपाल कार्यालयाच्या उद््घाटनासाठीयेत नाहीत. माझ्या मनात हे आहे की, महाराष्ट्राला टेलिफोन व इंटरनेटसाठी आॅप्टिकल फायबर मिळत नाही. एवढे ऐकताच त्यांनी म्हटले की, मंत्री येतो तेव्हा तो काही घोषणा करून जातो. त्यांनी महाराष्ट्राला आॅप्टिकल फायबर देण्याची घोषणा केली. ते फारच दिलदार व्यक्ती होते. - विजय दर्डा, माजी खासदार,चेअरमन, लोकमत एडिटोरिअल बोर्ड