शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

फूड फेअरमध्ये ढिसाळ आयोजनामुळे लोक संतापले; पियूष गोयल भाषण अर्ध्यावर सोडून निघून गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 15:40 IST

मंत्री पियूष गोयल यांना भाषण अर्धवट सोडून काढता पाय घ्यावा लागला

नवी दिल्ली: प्रगती मैदानावर 'आहार इंटरनॅशनल फूड फेयर'ला सुरुवात झाली आहे. मात्र या मेळाव्याच्या उद्घाटनालाच गोंधळ झाला. केंद्रीय मंत्री पियूष गोयल भाषण देत असताना हा प्रकार घडला मेळाव्याचा वीज पुरवठा अचानक खंडित झाला. याचा कार्यक्रमावर कोणताही परिणाम झाला नाही. बुकलेट लॉन्च झाल्यानंतर गोयल भाषण द्यायला गेले. त्याचवेळी हाय हायच्या घोषणा सुरू झाल्या. काही जण थेट व्यासपीठापर्यंत पोहोचले.

मेळाव्यात गोंधळ घालणाऱ्यांना गोयल यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अपयश आलं. त्यामुळे गोयल यांना कार्यक्रम सोडून निघावं लागलं. घोषणा देणाऱ्यांनी गोयल यांना घेराव घालत समस्या मांडल्या. खाद्यपदार्थ मेळाव्याला संपूर्ण देशभरातून व्यवसायिक आले आहेत. परदेशातून खरेदीदार आले आहेत. मात्र तरीही मेळाव्यात कोणतीही तयारी नाही, अशा तक्रारी लोकांनी गोयल यांच्याकडे केल्या. 

खाद्यपदार्थ मेळाव्यात अनेकांनी स्टॉल मांडले आहेत. मात्र मेळावा भरलेल्या ठिकाणी स्वच्छता, वीज नसल्याचं स्टॉलधारकांनी सांगितलं. गोयल यांनी ढिसाळ नियोजन पाहावं असा आग्रह स्टॉलधारकांनी धरला. गोयल यांनी त्यासाठी तयारी दर्शवली. मात्र वीज नसल्यानं लिफ्टच बंद होती. त्यामुळे गोयल यांना माघारी जावं लागलं. गोयल यांनी स्टॉलधारकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. गोंधळ वाढताच गोयल तिथून निघून गेले.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयल