शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

फूड फेअरमध्ये ढिसाळ आयोजनामुळे लोक संतापले; पियूष गोयल भाषण अर्ध्यावर सोडून निघून गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 15:40 IST

मंत्री पियूष गोयल यांना भाषण अर्धवट सोडून काढता पाय घ्यावा लागला

नवी दिल्ली: प्रगती मैदानावर 'आहार इंटरनॅशनल फूड फेयर'ला सुरुवात झाली आहे. मात्र या मेळाव्याच्या उद्घाटनालाच गोंधळ झाला. केंद्रीय मंत्री पियूष गोयल भाषण देत असताना हा प्रकार घडला मेळाव्याचा वीज पुरवठा अचानक खंडित झाला. याचा कार्यक्रमावर कोणताही परिणाम झाला नाही. बुकलेट लॉन्च झाल्यानंतर गोयल भाषण द्यायला गेले. त्याचवेळी हाय हायच्या घोषणा सुरू झाल्या. काही जण थेट व्यासपीठापर्यंत पोहोचले.

मेळाव्यात गोंधळ घालणाऱ्यांना गोयल यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अपयश आलं. त्यामुळे गोयल यांना कार्यक्रम सोडून निघावं लागलं. घोषणा देणाऱ्यांनी गोयल यांना घेराव घालत समस्या मांडल्या. खाद्यपदार्थ मेळाव्याला संपूर्ण देशभरातून व्यवसायिक आले आहेत. परदेशातून खरेदीदार आले आहेत. मात्र तरीही मेळाव्यात कोणतीही तयारी नाही, अशा तक्रारी लोकांनी गोयल यांच्याकडे केल्या. 

खाद्यपदार्थ मेळाव्यात अनेकांनी स्टॉल मांडले आहेत. मात्र मेळावा भरलेल्या ठिकाणी स्वच्छता, वीज नसल्याचं स्टॉलधारकांनी सांगितलं. गोयल यांनी ढिसाळ नियोजन पाहावं असा आग्रह स्टॉलधारकांनी धरला. गोयल यांनी त्यासाठी तयारी दर्शवली. मात्र वीज नसल्यानं लिफ्टच बंद होती. त्यामुळे गोयल यांना माघारी जावं लागलं. गोयल यांनी स्टॉलधारकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. गोंधळ वाढताच गोयल तिथून निघून गेले.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयल