शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

फूड फेअरमध्ये ढिसाळ आयोजनामुळे लोक संतापले; पियूष गोयल भाषण अर्ध्यावर सोडून निघून गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 15:40 IST

मंत्री पियूष गोयल यांना भाषण अर्धवट सोडून काढता पाय घ्यावा लागला

नवी दिल्ली: प्रगती मैदानावर 'आहार इंटरनॅशनल फूड फेयर'ला सुरुवात झाली आहे. मात्र या मेळाव्याच्या उद्घाटनालाच गोंधळ झाला. केंद्रीय मंत्री पियूष गोयल भाषण देत असताना हा प्रकार घडला मेळाव्याचा वीज पुरवठा अचानक खंडित झाला. याचा कार्यक्रमावर कोणताही परिणाम झाला नाही. बुकलेट लॉन्च झाल्यानंतर गोयल भाषण द्यायला गेले. त्याचवेळी हाय हायच्या घोषणा सुरू झाल्या. काही जण थेट व्यासपीठापर्यंत पोहोचले.

मेळाव्यात गोंधळ घालणाऱ्यांना गोयल यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अपयश आलं. त्यामुळे गोयल यांना कार्यक्रम सोडून निघावं लागलं. घोषणा देणाऱ्यांनी गोयल यांना घेराव घालत समस्या मांडल्या. खाद्यपदार्थ मेळाव्याला संपूर्ण देशभरातून व्यवसायिक आले आहेत. परदेशातून खरेदीदार आले आहेत. मात्र तरीही मेळाव्यात कोणतीही तयारी नाही, अशा तक्रारी लोकांनी गोयल यांच्याकडे केल्या. 

खाद्यपदार्थ मेळाव्यात अनेकांनी स्टॉल मांडले आहेत. मात्र मेळावा भरलेल्या ठिकाणी स्वच्छता, वीज नसल्याचं स्टॉलधारकांनी सांगितलं. गोयल यांनी ढिसाळ नियोजन पाहावं असा आग्रह स्टॉलधारकांनी धरला. गोयल यांनी त्यासाठी तयारी दर्शवली. मात्र वीज नसल्यानं लिफ्टच बंद होती. त्यामुळे गोयल यांना माघारी जावं लागलं. गोयल यांनी स्टॉलधारकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. गोंधळ वाढताच गोयल तिथून निघून गेले.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयल