शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला दिसत नाही का? किरेन रिजिजूंचा राहुल गांधींवर पुन्हा पलटवार, PM मोदींचाही केला उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 21:30 IST

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिलं.

Parliament Session: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा झाली. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ४० मिनिटांच्या भाषणात आक्रमक भूमिका घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी जातीय जनगणनेवर भाष्य केलं. याशिवाय त्यांनी लोकसभेत इतरही अनेक मुद्दे उपस्थित केले. दरम्यान, राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवरुन भाजप खासदारांनी त्यांना विरोध केला. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता किरेन रिजिजू यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

लोकसभेत सोमवारी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भाषणानंतर हा गोंधळ उडाला. राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्र्यांच्या अमेरिका दौऱ्यावरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. त्यानंतर राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवर केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी त्याचे खंडन केले. राहुल गांधी यांनी अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींचे प्रश्न लोकसभेत उपस्थित केले होते. यावर किरेन रिजिजू यांनी राहुल गांधींवर जोरदार प्रत्युत्तर देत विचारले की ते आंधळे आहात का? असा सवाल केला. 

"राहुल गांधी गेली २-३ वर्षे या वर्गांबद्दल बोलत आहेत, पण त्यांना देशाचे पंतप्रधान दिसत नाहीत का? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात मोठा ओबीसी चेहरा आणि जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. राहुल गांधी यांना हे दिसत नाही का? ते काय आंधळे आहेत का? मी स्वतः अनुसूचित जमातीचा आहे आणि देशाचे संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम करत आहे. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल हे देखील दलित आहेत," असं मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं.

"काँग्रेसने कधी कोणत्याही आदिवासी किंवा दलिताला देशाचा कायदामंत्री बनवले आहे का? काँग्रेसने कधी ओबीसीला पंतप्रधान केले आहे का?मला वाटतं राहुल गांधी काय बोलतात हे त्यांनाच माहीत नाही," असा टोलाही किरेन रिजिजू यांनी लगावला.

याआधी राहुल गांधी यांनी जातिय जनगणनेची मागणी लावून धरत देशातील मोठ्या कंपन्यांमध्ये दलित-ओबीसी मालक नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. "देशातील ५० टक्के लोकसंख्या अनुसूचित जाती आणि जमाती आणि ओबीसींची आहे. पण त्यांच्याकडे सत्ता नाही कारण ते आवाज उठवू शकत नाहीत. भाजपमध्ये ओबीसी, दलित आणि आदिवासी खासदार आहेत, पण ते बोलू शकत नाहीत," असं राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद