शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

तुम्हाला दिसत नाही का? किरेन रिजिजूंचा राहुल गांधींवर पुन्हा पलटवार, PM मोदींचाही केला उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 21:30 IST

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिलं.

Parliament Session: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा झाली. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ४० मिनिटांच्या भाषणात आक्रमक भूमिका घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी जातीय जनगणनेवर भाष्य केलं. याशिवाय त्यांनी लोकसभेत इतरही अनेक मुद्दे उपस्थित केले. दरम्यान, राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवरुन भाजप खासदारांनी त्यांना विरोध केला. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता किरेन रिजिजू यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

लोकसभेत सोमवारी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भाषणानंतर हा गोंधळ उडाला. राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्र्यांच्या अमेरिका दौऱ्यावरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. त्यानंतर राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवर केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी त्याचे खंडन केले. राहुल गांधी यांनी अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींचे प्रश्न लोकसभेत उपस्थित केले होते. यावर किरेन रिजिजू यांनी राहुल गांधींवर जोरदार प्रत्युत्तर देत विचारले की ते आंधळे आहात का? असा सवाल केला. 

"राहुल गांधी गेली २-३ वर्षे या वर्गांबद्दल बोलत आहेत, पण त्यांना देशाचे पंतप्रधान दिसत नाहीत का? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात मोठा ओबीसी चेहरा आणि जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. राहुल गांधी यांना हे दिसत नाही का? ते काय आंधळे आहेत का? मी स्वतः अनुसूचित जमातीचा आहे आणि देशाचे संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम करत आहे. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल हे देखील दलित आहेत," असं मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं.

"काँग्रेसने कधी कोणत्याही आदिवासी किंवा दलिताला देशाचा कायदामंत्री बनवले आहे का? काँग्रेसने कधी ओबीसीला पंतप्रधान केले आहे का?मला वाटतं राहुल गांधी काय बोलतात हे त्यांनाच माहीत नाही," असा टोलाही किरेन रिजिजू यांनी लगावला.

याआधी राहुल गांधी यांनी जातिय जनगणनेची मागणी लावून धरत देशातील मोठ्या कंपन्यांमध्ये दलित-ओबीसी मालक नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. "देशातील ५० टक्के लोकसंख्या अनुसूचित जाती आणि जमाती आणि ओबीसींची आहे. पण त्यांच्याकडे सत्ता नाही कारण ते आवाज उठवू शकत नाहीत. भाजपमध्ये ओबीसी, दलित आणि आदिवासी खासदार आहेत, पण ते बोलू शकत नाहीत," असं राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद