शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

तुम्हाला दिसत नाही का? किरेन रिजिजूंचा राहुल गांधींवर पुन्हा पलटवार, PM मोदींचाही केला उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 21:30 IST

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिलं.

Parliament Session: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा झाली. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ४० मिनिटांच्या भाषणात आक्रमक भूमिका घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी जातीय जनगणनेवर भाष्य केलं. याशिवाय त्यांनी लोकसभेत इतरही अनेक मुद्दे उपस्थित केले. दरम्यान, राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवरुन भाजप खासदारांनी त्यांना विरोध केला. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता किरेन रिजिजू यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

लोकसभेत सोमवारी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भाषणानंतर हा गोंधळ उडाला. राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्र्यांच्या अमेरिका दौऱ्यावरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. त्यानंतर राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवर केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी त्याचे खंडन केले. राहुल गांधी यांनी अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींचे प्रश्न लोकसभेत उपस्थित केले होते. यावर किरेन रिजिजू यांनी राहुल गांधींवर जोरदार प्रत्युत्तर देत विचारले की ते आंधळे आहात का? असा सवाल केला. 

"राहुल गांधी गेली २-३ वर्षे या वर्गांबद्दल बोलत आहेत, पण त्यांना देशाचे पंतप्रधान दिसत नाहीत का? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात मोठा ओबीसी चेहरा आणि जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. राहुल गांधी यांना हे दिसत नाही का? ते काय आंधळे आहेत का? मी स्वतः अनुसूचित जमातीचा आहे आणि देशाचे संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम करत आहे. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल हे देखील दलित आहेत," असं मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं.

"काँग्रेसने कधी कोणत्याही आदिवासी किंवा दलिताला देशाचा कायदामंत्री बनवले आहे का? काँग्रेसने कधी ओबीसीला पंतप्रधान केले आहे का?मला वाटतं राहुल गांधी काय बोलतात हे त्यांनाच माहीत नाही," असा टोलाही किरेन रिजिजू यांनी लगावला.

याआधी राहुल गांधी यांनी जातिय जनगणनेची मागणी लावून धरत देशातील मोठ्या कंपन्यांमध्ये दलित-ओबीसी मालक नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. "देशातील ५० टक्के लोकसंख्या अनुसूचित जाती आणि जमाती आणि ओबीसींची आहे. पण त्यांच्याकडे सत्ता नाही कारण ते आवाज उठवू शकत नाहीत. भाजपमध्ये ओबीसी, दलित आणि आदिवासी खासदार आहेत, पण ते बोलू शकत नाहीत," असं राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद