शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Nirmala Sitharaman | भारतातील 5G तंत्रज्ञान 'मेड-इन-इंडिया', बाहेरून आणलेलं नाही- केंद्रीय अर्थमंत्र्यांचे उद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 19:33 IST

पूर्वी भारत जगाकडे पाहायचा, पण आता भारत नवनवे जागतिक बेंचमार्क सेट करत आहे!

Nirmala Sitharaman | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय 5G सेवेबाबत मोठे विधान केले आहे. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड इंटरनॅशनल स्टडीजमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, भारताने स्वदेशी 5G पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत आणि आम्ही इतर देशांसोबतही ते तंत्रज्ञान शेअर करण्यास तयार आहोत.

भारताच्या 5G तंत्रज्ञानाचे कौतुक करताना निर्मला सीतारामन म्हणाल्या, "भारतातील 5G ​​तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी आहे. हे इतर कोठूनही आयात (Imported) केलेले नाही आणि ते देशाचे स्वतःचे उत्पादन आहे. ही बाब अजून लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. आम्ही आमच्या देशात लाँच केलेला 5G पूर्णपणे स्वदेशी, स्वतंत्र आहे. त्याचा प्रसार खूप वेगाने होतो. २०२४ च्या अखेरीस देशातील बहुतांश लोक या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊ शकतील. भारताच्या या कामगिरीचा आम्हाला खूप अभिमान आहे. भारतातील साडेसात लाख पंचायतींपैकी ८० टक्के ठिकाणी ऑप्टिकल फायबर पोहोचले आहे. तंत्रज्ञानाच्या वापराने भारतात शासनव्यवस्थेत सुधारणा होत असून अर्थव्यवस्थेच्या डिजिटायझेशनच्या वाढत्या क्षमतेमुळे हे परिवर्तन घडणे शक्य झाले आहे."

"भारत सरकारने सार्वजनिक हितासाठी तयार केलेले ओपन-सोर्स नेटवर्क लहान आणि मध्यम उद्योगांना त्यांचा अवाका वाढविण्यात मदत करत आहे. मला पुन्हा एकदा सांगावेसे वाटते की भारतातील हे तंत्रज्ञान ज्या देशांना गरज आहे, त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. 'मुद्रा' योजनेंतर्गत देण्यात आलेल्या सर्व कर्जांपैकी ४५ टक्के कर्ज महिलांना देण्यात आले आहे. असे बरेच वेळा घडले की भारताने जगातील इतर बेंचमार्ककडे पाहिले. पण आता डिजिटल आघाडीवर, पेमेंट, आरोग्य, शिक्षण यावर भारताने खरोखरच नवा बेंचमार्क सेट केला आहे,” असे अभिमानाने त्यांनी सांगितले.

टॅग्स :5G५जीtechnologyतंत्रज्ञानNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन