शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

Nirmala Sitharaman | भारतातील 5G तंत्रज्ञान 'मेड-इन-इंडिया', बाहेरून आणलेलं नाही- केंद्रीय अर्थमंत्र्यांचे उद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 19:33 IST

पूर्वी भारत जगाकडे पाहायचा, पण आता भारत नवनवे जागतिक बेंचमार्क सेट करत आहे!

Nirmala Sitharaman | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय 5G सेवेबाबत मोठे विधान केले आहे. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड इंटरनॅशनल स्टडीजमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, भारताने स्वदेशी 5G पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत आणि आम्ही इतर देशांसोबतही ते तंत्रज्ञान शेअर करण्यास तयार आहोत.

भारताच्या 5G तंत्रज्ञानाचे कौतुक करताना निर्मला सीतारामन म्हणाल्या, "भारतातील 5G ​​तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी आहे. हे इतर कोठूनही आयात (Imported) केलेले नाही आणि ते देशाचे स्वतःचे उत्पादन आहे. ही बाब अजून लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. आम्ही आमच्या देशात लाँच केलेला 5G पूर्णपणे स्वदेशी, स्वतंत्र आहे. त्याचा प्रसार खूप वेगाने होतो. २०२४ च्या अखेरीस देशातील बहुतांश लोक या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊ शकतील. भारताच्या या कामगिरीचा आम्हाला खूप अभिमान आहे. भारतातील साडेसात लाख पंचायतींपैकी ८० टक्के ठिकाणी ऑप्टिकल फायबर पोहोचले आहे. तंत्रज्ञानाच्या वापराने भारतात शासनव्यवस्थेत सुधारणा होत असून अर्थव्यवस्थेच्या डिजिटायझेशनच्या वाढत्या क्षमतेमुळे हे परिवर्तन घडणे शक्य झाले आहे."

"भारत सरकारने सार्वजनिक हितासाठी तयार केलेले ओपन-सोर्स नेटवर्क लहान आणि मध्यम उद्योगांना त्यांचा अवाका वाढविण्यात मदत करत आहे. मला पुन्हा एकदा सांगावेसे वाटते की भारतातील हे तंत्रज्ञान ज्या देशांना गरज आहे, त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. 'मुद्रा' योजनेंतर्गत देण्यात आलेल्या सर्व कर्जांपैकी ४५ टक्के कर्ज महिलांना देण्यात आले आहे. असे बरेच वेळा घडले की भारताने जगातील इतर बेंचमार्ककडे पाहिले. पण आता डिजिटल आघाडीवर, पेमेंट, आरोग्य, शिक्षण यावर भारताने खरोखरच नवा बेंचमार्क सेट केला आहे,” असे अभिमानाने त्यांनी सांगितले.

टॅग्स :5G५जीtechnologyतंत्रज्ञानNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन