शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
5
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
6
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
7
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
8
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
9
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
10
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
12
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
13
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
14
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
15
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
16
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
17
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
18
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
19
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
20
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप

Nirmala Sitharaman | भारतातील 5G तंत्रज्ञान 'मेड-इन-इंडिया', बाहेरून आणलेलं नाही- केंद्रीय अर्थमंत्र्यांचे उद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 19:33 IST

पूर्वी भारत जगाकडे पाहायचा, पण आता भारत नवनवे जागतिक बेंचमार्क सेट करत आहे!

Nirmala Sitharaman | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय 5G सेवेबाबत मोठे विधान केले आहे. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड इंटरनॅशनल स्टडीजमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, भारताने स्वदेशी 5G पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत आणि आम्ही इतर देशांसोबतही ते तंत्रज्ञान शेअर करण्यास तयार आहोत.

भारताच्या 5G तंत्रज्ञानाचे कौतुक करताना निर्मला सीतारामन म्हणाल्या, "भारतातील 5G ​​तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी आहे. हे इतर कोठूनही आयात (Imported) केलेले नाही आणि ते देशाचे स्वतःचे उत्पादन आहे. ही बाब अजून लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. आम्ही आमच्या देशात लाँच केलेला 5G पूर्णपणे स्वदेशी, स्वतंत्र आहे. त्याचा प्रसार खूप वेगाने होतो. २०२४ च्या अखेरीस देशातील बहुतांश लोक या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊ शकतील. भारताच्या या कामगिरीचा आम्हाला खूप अभिमान आहे. भारतातील साडेसात लाख पंचायतींपैकी ८० टक्के ठिकाणी ऑप्टिकल फायबर पोहोचले आहे. तंत्रज्ञानाच्या वापराने भारतात शासनव्यवस्थेत सुधारणा होत असून अर्थव्यवस्थेच्या डिजिटायझेशनच्या वाढत्या क्षमतेमुळे हे परिवर्तन घडणे शक्य झाले आहे."

"भारत सरकारने सार्वजनिक हितासाठी तयार केलेले ओपन-सोर्स नेटवर्क लहान आणि मध्यम उद्योगांना त्यांचा अवाका वाढविण्यात मदत करत आहे. मला पुन्हा एकदा सांगावेसे वाटते की भारतातील हे तंत्रज्ञान ज्या देशांना गरज आहे, त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. 'मुद्रा' योजनेंतर्गत देण्यात आलेल्या सर्व कर्जांपैकी ४५ टक्के कर्ज महिलांना देण्यात आले आहे. असे बरेच वेळा घडले की भारताने जगातील इतर बेंचमार्ककडे पाहिले. पण आता डिजिटल आघाडीवर, पेमेंट, आरोग्य, शिक्षण यावर भारताने खरोखरच नवा बेंचमार्क सेट केला आहे,” असे अभिमानाने त्यांनी सांगितले.

टॅग्स :5G५जीtechnologyतंत्रज्ञानNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन