शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

देशात ५० वर्षांतील सर्वाधिक बेकारी, मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम,राहुल गांधी यांचा घणाघाती हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 07:47 IST

Rahul Gandhi News: देशात गेल्या ५० वर्षांतील सर्वाधिक बेकारी सध्या निर्माण झाली आहे. हा सर्व मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.

 नवी दिल्ली : देशात गेल्या ५० वर्षांतील सर्वाधिक बेकारी सध्या निर्माण झाली आहे. भारतामध्ये श्रीमंतांचा व गरीबांचा असे दोन वेगवेगळे भारत वसत आहेत. या दोन भारतांमधील दरी खूप वाढली आहे. हा सर्व मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने झाला होता. त्याच्या आभारप्रदर्शन प्रस्तावावरील चर्चेत राहुल गांधी म्हणाले की, देशाला भे़डसावणाऱ्या समस्या तसेच प्रचंड प्रमाणात वाढलेल्या बेकारीचा या अभिभाषणात काहीही उल्लेख नव्हता. नोकरशाहीने मांडलेल्या संकल्पनांची जंत्री राष्ट्रपतींच्या अभिभाषणात होती. श्रीमंत व गरीब अशा दोन भारतांतील दरी मिटविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केले पाहिजेत. राहुल गांधी म्हणाले की, गेल्या वर्षी देशातील तीन कोटी युवक बेकार झाले. ते सध्या रोजगाराच्या शोधात आहे. मात्र त्यांच्या हाताला मोदी सरकारने काम मिळवून दिलेले नाही. त्याऐवजी नरेंद्र मोदी मेक इन इंडिया, स्टार्ट-अपबद्दलच भाषणे देतात.

४० टक्के संपत्ती मुठभरांच्या हातीकाँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, भारतातील ४० टक्के संपती मुठभरांच्या हाती एकवटली आहे. ८४ टक्के भारतीयांची कमाई कमी झाली आहे. त्यामुळे गरिबीच्या दिशेने ते ढकलले जात आहेत. देशातील असंघटित कामगार क्षेत्र उद्ध्वस्त करण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. त्यामुळे मेक इन इंडियाची मोहिम यशस्वी होणार नाही. 

मोदी सरकार करत आहे, आवाज दडपण्याचा प्रयत्नमोदी सरकार संघराज्यातील घटकांचा आवाज दडपण्यासाठी न्याययंत्रणा, निवडणूक आयोग, पेगॅसस यांचा वापर करत आहे. १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्याचवेळी राजेशाही व्यवस्था नष्ट होऊन लोकशाही आली. पण तीच राजेशाही व्यवस्था भाजप पुन्हा देशात आणण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षी देशातील तीन कोटी युवक बेकार झाले. ते सध्या रोजगाराच्या शोधात आहे.     - राहुल गांधी, काँग्रेस नेते 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकारUnemploymentबेरोजगारी