शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

बेरोजगारी ९.२ टक्क्यांवर, तरुणांची जॉबसाठी भटकंती; काँग्रेसची टीका; नवीन उदारीकरणाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 09:28 IST

केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस (जनसंपर्क) जयराम रमेश म्हणाले की, अनियमित धोरणे, घराणेशाही आणि ईडी, आयटी, सीबीआयचे छापेराज या कारणांमुळे २०१४ पासून भारत कमी गुंतवणुकीच्या चक्रात अडकला आहे.

नवी दिल्ली : देशातील बेरोजगारीचा दर ९.२ टक्क्यांवर पोहोचला आहे, त्यामुळे तरुण त्रस्त आहेत, त्यांना नोकरीसाठी भटकंती करावी लागत आहे, परंतु सरकारला या तरुणांच्या समस्या दिसत नाहीत, त्यांच्या हाका ऐकूही येत नाहीत. याउलट सर्व आकडेवारीकडे दुर्लक्ष करून ते खोटे पसरविण्यात व्यस्त आहेत, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस (जनसंपर्क) जयराम रमेश म्हणाले की, अनियमित धोरणे, घराणेशाही आणि ईडी, आयटी, सीबीआयचे छापेराज या कारणांमुळे २०१४ पासून भारत कमी गुंतवणुकीच्या चक्रात अडकला आहे.

श्रीमंत-गरिबांतील दरी रुंदावली

देशातील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी रुंदावत असल्याचा दावा करत काँग्रेसने या दोन वर्गांच्या मासिक खर्चात सुमारे २० पट तफावत असल्याचे म्हटले आहे. 

पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही एका बातमीचा हवाला दिला, ज्यात म्हटले आहे की, पाच टक्के नागरिकांचा मासिक उपभोग खर्च केवळ १३७३ रुपये आहे, तर सर्वात श्रीमंत आणि गरीब कुटुंबांचा मासिक उपभोग खर्च २० पट आहे. २०१२ ते २०२१ पर्यंत देशात निर्माण झालेल्या संपत्तीपैकी ४० टक्क्यांहून अधिक संपत्ती फक्त एक टक्का लोकसंख्येकडे गेली आहे. २१ अब्जाधीशांकडे ७० कोटी भारतीयांपेक्षा जास्त संपत्ती आहे.

काँग्रेसचा दावा...

देशातील ८३ टक्के तरुण बेरोजगार आहेत.

२०-२४ वयोगटातील तरुणांमधील बेरोजगारीचा दर ४४.४९ टक्के.

देशात डझनावारी पेपर फुटत आहेत.

३० लाख सरकारी पदे रिक्त.

बेरोजगारीला कंटाळून दर तासाला दोन तरुणांची आत्महत्या.

तरुणांना नोकरीसाठी रशिया, इस्रायलमध्ये जावे लागते.

टॅग्स :jobनोकरी