शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

बेरोजगारी ९.२ टक्क्यांवर, तरुणांची जॉबसाठी भटकंती; काँग्रेसची टीका; नवीन उदारीकरणाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 09:28 IST

केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस (जनसंपर्क) जयराम रमेश म्हणाले की, अनियमित धोरणे, घराणेशाही आणि ईडी, आयटी, सीबीआयचे छापेराज या कारणांमुळे २०१४ पासून भारत कमी गुंतवणुकीच्या चक्रात अडकला आहे.

नवी दिल्ली : देशातील बेरोजगारीचा दर ९.२ टक्क्यांवर पोहोचला आहे, त्यामुळे तरुण त्रस्त आहेत, त्यांना नोकरीसाठी भटकंती करावी लागत आहे, परंतु सरकारला या तरुणांच्या समस्या दिसत नाहीत, त्यांच्या हाका ऐकूही येत नाहीत. याउलट सर्व आकडेवारीकडे दुर्लक्ष करून ते खोटे पसरविण्यात व्यस्त आहेत, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस (जनसंपर्क) जयराम रमेश म्हणाले की, अनियमित धोरणे, घराणेशाही आणि ईडी, आयटी, सीबीआयचे छापेराज या कारणांमुळे २०१४ पासून भारत कमी गुंतवणुकीच्या चक्रात अडकला आहे.

श्रीमंत-गरिबांतील दरी रुंदावली

देशातील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी रुंदावत असल्याचा दावा करत काँग्रेसने या दोन वर्गांच्या मासिक खर्चात सुमारे २० पट तफावत असल्याचे म्हटले आहे. 

पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही एका बातमीचा हवाला दिला, ज्यात म्हटले आहे की, पाच टक्के नागरिकांचा मासिक उपभोग खर्च केवळ १३७३ रुपये आहे, तर सर्वात श्रीमंत आणि गरीब कुटुंबांचा मासिक उपभोग खर्च २० पट आहे. २०१२ ते २०२१ पर्यंत देशात निर्माण झालेल्या संपत्तीपैकी ४० टक्क्यांहून अधिक संपत्ती फक्त एक टक्का लोकसंख्येकडे गेली आहे. २१ अब्जाधीशांकडे ७० कोटी भारतीयांपेक्षा जास्त संपत्ती आहे.

काँग्रेसचा दावा...

देशातील ८३ टक्के तरुण बेरोजगार आहेत.

२०-२४ वयोगटातील तरुणांमधील बेरोजगारीचा दर ४४.४९ टक्के.

देशात डझनावारी पेपर फुटत आहेत.

३० लाख सरकारी पदे रिक्त.

बेरोजगारीला कंटाळून दर तासाला दोन तरुणांची आत्महत्या.

तरुणांना नोकरीसाठी रशिया, इस्रायलमध्ये जावे लागते.

टॅग्स :jobनोकरी