शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

बेरोजगारांना ३० दिवसांत मिळेल भत्ता; ईएसआईसीच्या मंडळाची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 00:45 IST

यंदाच्या वर्षात २४ मार्च ते ३१ डिसेंबर या कालावधीत ज्यांना नोकऱ्या गमवाव्या लागतील तसेच जे एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे (ईएसआयसी) सदस्य असतील अशांनाच या योजनेचा लाभ होणार आहे.

नवी दिल्ली : कोरोना साथीच्या संकटामुळे नोकरी गमावलेल्यांना तीन महिन्यांच्या पगारापैकी ५० टक्के रक्कम अटल विमा कल्याण योजनेच्या अंतर्गत मदत स्वरूपात देण्याच्या निर्णयामुळे औद्योगिक कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा भत्ता बेरोजगार झाल्यानंतर ३० दिवसांत मिळेल.यंदाच्या वर्षात २४ मार्च ते ३१ डिसेंबर या कालावधीत ज्यांना नोकऱ्या गमवाव्या लागतील तसेच जे एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे (ईएसआयसी) सदस्य असतील अशांनाच या योजनेचा लाभ होणार आहे. हे वेतन नोकरी सुटली किंवा नोकरी जाण्याच्या शक्यतेमुळे बेरोजगारी भत्ता म्हणून दिला जाईल.या प्रस्तावाला ईएसआईसीच्या मंडळाने गुरुवारी मंजुरी दिली. ईएसआईसी बोर्डच्या सदस्य अमरजित कौर यांच्यानुसार ईएसआयसीच्या योग्य विमाधारक व्यक्तींना तीन महिन्यांच्या सरासरी ५० टक्के वेतनाइतका रोख लाभ मिळेल.पात्रता मापदंड काहीसे शिथिल केले जाऊ शकतात. जर असे झाले तर लाभार्थींची संख्या दोन पट (७.५ दशलक्ष) होऊ शकते.२१ हजार रुपयांपर्यंत मासिक वेतन असलेल्या औद्योगिक कामगारांना ईएसआयसीच्या योजनेचा लाभ मिळतो. लाभार्थी व्यक्तीला या लाभासाठी मालकाच्या (एम्प्लॉयर) कार्यालयात जायची गरज नाही. विमाधारक ईएसआयसीच्या शाखा कार्यालयात जाऊन दावा करू शकतो. मालकाकडे क्लेमच्या खातरजमेचे कामही शाखा कार्यालय स्तरावर केले जाईल. त्यानंतर पैसे थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केले जातील.आधार कार्डचा लागेल क्रमांक१२ आकड्यांचे (डिजिट) आधार कार्ड क्लेमदरम्यान ओळख पटण्यासाठी वापरले जाईल.२०१८ पासून ही प्रक्रिया सुरू असलेल्या अटल बीमित व्यक्ती कल्याण योजनेंतर्गत होईल.२५ टक्के बेरोजगारी या योजनेत लाभ देण्याची तरतूद आहे; परंतु त्यात तांत्रिक अडचणी येत होत्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या