शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

उपोषणाबद्दल अनिश्चितता कायम, केंद्राच्या कार्यपद्धतीबद्दल अण्णासमर्थकांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 03:24 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण कधी सुटणार, याबाबत अनिश्चितता कायम

विश्वास खोड  नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण कधी सुटणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे. अण्णांशी बातचीत करण्यासाठी महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन दिल्लीत आहेत. मंगळवारी सकाळी महाजन यांच्या स्वीय सहायकांनी अण्णांना भेटून केंद्र सरकारच्या आश्वासनांचा मसुदा वाचून दाखविला. अण्णांनी त्यात सुधारणा सुचविल्या असून, या सूचना तातडीने पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या आहेत.महाराष्टÑाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याशी चर्चा करण्यासाठी येणार आहेत. उद्या सकाळपर्यंत सरकारी अधिकारीही येतील, असे अण्णा हजारे यांनी आज सांगितले. अण्णांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस होता. गिरीश महाजन यांच्याशी सुरू असलेल्या चर्चेमुळे काहीतरी ठोस तोडगा निघेल, अशी आशा आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना होती. मात्र, केंद्र सरकारने महाराष्ट्रातील एका मंत्र्यांच्या स्वीय सहायकाला अण्णांशी चर्चा करण्यासाठी पाठविले. त्यामुळे केंद्र सरकारच्या असंवेदनशील कार्यपद्धतीबद्दल आंदोलकाच्या संयोजकांनी नाराजी व्यक्त केली.अण्णांचे वजन पाच किलोने घटले आहे. तरीही अण्णांनी सकाळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि चिंतेचे काही कारण नाही, अशा शब्दांत आंदोलकांचा हुरूप वाढविला. आपल्याला पाठिंबा देण्यासाठी बारा राज्यांमध्ये आंदोलन सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. आपले आंदोलन सरकारविरोधात नाही, तर सरकारने त्यांचे कर्तव्य करावे, यासाठी आहे, असे अण्णांनी नमूद केले.अण्णांची विश्वंभर चौधरी यांची भेट घेतली. त्यानंतर, शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे केंद्र सरकारने अवमूल्यन केले, असा आरोप चौधरी यांनी केला. अण्णांशी चर्चा करण्यासाठी किमान केंद्रीय मंत्री सरकारने पाठविणे आवश्यक आहे, असेही चौधरी म्हणाले. काँग्रेस सरकारने २०११ मधील आंदोलन अत्यंत संवेदनशीलतेने हाताळल्याचेही त्यांनी नमूद केले.१४ जणांची प्रकृती बिघडलीबलराम आणि महेंद्र प्रताप या आंदोलकांना प्रकृती बिघडताच, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. रविवारीही तिघांची प्रकृती बिघडली होती. आंदोलन काळात १४ जणांची प्रकृती बिघडली, पण हे सर्वजण रुग्णालयातून सुट्टी झाल्यानंतर ते पुन्हा आंदोलनात सहभागी झालेत. उन्हामध्ये प्रकृतीची काळजी घेण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचे आवाहन अण्णांनी आंदोलकांना केले.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे