शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

उपोषणाबद्दल अनिश्चितता कायम, केंद्राच्या कार्यपद्धतीबद्दल अण्णासमर्थकांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 03:24 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण कधी सुटणार, याबाबत अनिश्चितता कायम

विश्वास खोड  नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण कधी सुटणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे. अण्णांशी बातचीत करण्यासाठी महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन दिल्लीत आहेत. मंगळवारी सकाळी महाजन यांच्या स्वीय सहायकांनी अण्णांना भेटून केंद्र सरकारच्या आश्वासनांचा मसुदा वाचून दाखविला. अण्णांनी त्यात सुधारणा सुचविल्या असून, या सूचना तातडीने पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या आहेत.महाराष्टÑाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याशी चर्चा करण्यासाठी येणार आहेत. उद्या सकाळपर्यंत सरकारी अधिकारीही येतील, असे अण्णा हजारे यांनी आज सांगितले. अण्णांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस होता. गिरीश महाजन यांच्याशी सुरू असलेल्या चर्चेमुळे काहीतरी ठोस तोडगा निघेल, अशी आशा आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना होती. मात्र, केंद्र सरकारने महाराष्ट्रातील एका मंत्र्यांच्या स्वीय सहायकाला अण्णांशी चर्चा करण्यासाठी पाठविले. त्यामुळे केंद्र सरकारच्या असंवेदनशील कार्यपद्धतीबद्दल आंदोलकाच्या संयोजकांनी नाराजी व्यक्त केली.अण्णांचे वजन पाच किलोने घटले आहे. तरीही अण्णांनी सकाळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि चिंतेचे काही कारण नाही, अशा शब्दांत आंदोलकांचा हुरूप वाढविला. आपल्याला पाठिंबा देण्यासाठी बारा राज्यांमध्ये आंदोलन सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. आपले आंदोलन सरकारविरोधात नाही, तर सरकारने त्यांचे कर्तव्य करावे, यासाठी आहे, असे अण्णांनी नमूद केले.अण्णांची विश्वंभर चौधरी यांची भेट घेतली. त्यानंतर, शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे केंद्र सरकारने अवमूल्यन केले, असा आरोप चौधरी यांनी केला. अण्णांशी चर्चा करण्यासाठी किमान केंद्रीय मंत्री सरकारने पाठविणे आवश्यक आहे, असेही चौधरी म्हणाले. काँग्रेस सरकारने २०११ मधील आंदोलन अत्यंत संवेदनशीलतेने हाताळल्याचेही त्यांनी नमूद केले.१४ जणांची प्रकृती बिघडलीबलराम आणि महेंद्र प्रताप या आंदोलकांना प्रकृती बिघडताच, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. रविवारीही तिघांची प्रकृती बिघडली होती. आंदोलन काळात १४ जणांची प्रकृती बिघडली, पण हे सर्वजण रुग्णालयातून सुट्टी झाल्यानंतर ते पुन्हा आंदोलनात सहभागी झालेत. उन्हामध्ये प्रकृतीची काळजी घेण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचे आवाहन अण्णांनी आंदोलकांना केले.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे