शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

यूएलएफने स्वीकारली काश्मिरातील ११ लोकांच्या हत्येची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 06:41 IST

परप्रांतीय मजुरांना बाहेर जाण्याचा इशारा

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत ११ नागरिकांच्या करण्यात आलेल्या हत्यांची जबाबदारी युनायटेड लिबरेशन फ्रंट (युएलएफ) या दहशतवादी गटाने घेतली आहे. काश्मीरमधील परप्रांतीय मजुरांनी खोरे सोडून जावे असा इशारा युएलएफने दिला आहे. देशात मुस्लिमांच्या अनेक ठिकाणी हत्या होत असून त्याचा आम्ही बदला घेणार आहोत असे लष्कर-ए-तय्यबाशी संलग्न असलेल्या युएलएफने म्हटले आहे. काश्मीरमध्ये होत असलेल्या हल्ल्यांमुळे तेथील परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यांत माघारी जाण्यास सुरूवात झाली आहे.काश्मीरमध्ये रविवारी आणखी दोन परप्रांतीय मजुरांची हत्या करण्यात आली, त्याआधीही असा प्रकार घडला होता. हत्या झालेले नागरिक बिहार व उत्तर प्रदेशमधील मूळ रहिवासी होते. गेल्या काही दिवसांत काश्मीरमध्ये झालेल्या ११ नागरिकांच्या हत्यांची जबाबदारी स्वीकारणारे एक निवेदन युएलएफने जारी केले आहे. या गटाच्या दहशतवाद्यांनी परप्रांतीय मजुरांच्या निवासस्थानांमध्ये घुसून रविवारी गोळीबार केला होता. त्यात दोन जण ठार झाले. त्याआधी शनिवारी दहशतवाद्यांच्या गोळीबारात बिहार व उत्तर प्रदेशमधील दोन मजुरांना जीव गमवावा लागला. या मजुरांना सुरक्षा दलांच्या छावण्यांसह अन्य सुरक्षित ठिकाणी तातडीने हलविण्याची प्रक्रिया रविवार रात्रीपासून सुरू झाली होती. दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमुळे हे मजूर भयभीत झाले आहेत.लष्करप्रमुख नरवणे काश्मीर दौऱ्यावरजम्मू-काश्मीरमध्ये परप्रांतीयांच्या हत्या होत असून दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील सुरक्षाविषयक स्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख मनोज नरवणे हे सोमवारपासून त्या भागाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. ते सीमेवरील विविध ठिकाणांना भेट देऊन अधिकारी व जवानांशी चर्चा करतील.