शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

उज्ज्वल निकम सहावे पद्मश्री पुरस्कारार्थी सन्मान : उद्योग, साहित्य, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश

By admin | Updated: January 26, 2016 00:04 IST

जळगाव : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले ते जळगाव जिल्‘ातील सहावे मान्यवर आहेत. यापूर्वी ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ कवी ना.धों.महानोर, जैन उद्योग समूहाचे संस्थापक भंवरलाल जैन, समाजसेविका नीलिमा मिश्रा व शीतल महाजन यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.

जळगाव : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले ते जळगाव जिल्‘ातील सहावे मान्यवर आहेत. यापूर्वी ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ कवी ना.धों.महानोर, जैन उद्योग समूहाचे संस्थापक भंवरलाल जैन, समाजसेविका नीलिमा मिश्रा व शीतल महाजन यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.


भालचंद्र नेमाडे
जळगाव जिल्‘ातील यावल तालुक्यातील सांगवी येथील मूळचे रहिवासी भालचंद्र नेमाडे यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कादंबरीकार, कविता, समीक्षक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. यापूर्वी त्यांना १९९१ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार तर २०१४ मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. कोसला, बिढार, झूल, जरिला, हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ ‘ा कादंबर्‍या आणि मेलडी, देखणी हे कवितासंग्रह वगैरे त्यांचे गाजलेले साहित्य आहे.

ना.धों.महानोर
मूळचे औरंगाबाद जिल्‘ातील पळसखेडे येथील रहिवासी असलेले व सध्या जळगाव शहरात स्थायिक झालेले प्रसिद्ध कवी ना.धों.महानोर यांना साहित्य व शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल १९९१ मध्ये पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. एक होता विदूषक, जैत रे जैत, सर्जा, मुक्ता या चित्रपटातील त्यांची गीते गाजली होती. तसेच रानातल्या कविता, प्रार्थना दयाघना, वहाटूळ, अजिंठा, जगाला प्रेम अर्पावे हे कविता संग्रह त्यांचे गाजलेले आहेत. १९७८ साली त्यांची महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

भवरलाल जैन
जळगाव जिल्‘ातील वाकोद येथील रहिवासी भंवरलाल जैन यांना २००८ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जैन उद्योग समूहाच्या माध्यमातून कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात चांगले काम केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. यापूर्वी त्यांना कर्मवीर भाऊराव पाटील, जळगाव रत्न, भारत कृषक समाजाचा जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.

नीलिमा मिश्रा
सामाजिक क्षेत्रात चांगले काम केल्याबद्दल पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथील नीलिमा मिश्रा यांना २०१३ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी बचत गटांना प्रोत्साहन दिल्याबद्दल २०११ मध्ये त्यांना रेमन मॅगसेसे पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले आहे.