शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

Surgical Strike Day साजरा करण्यावरून 'युद्ध'; सरकारवर विरोधकांचा 'स्ट्राइक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 19:37 IST

१८ सप्टेंबर २०१६ रोजी नियंत्रण रेषेजवळच्या उरी इथल्या लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात १७ जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला भारतीय लष्करानं २९ सप्टेंबरला घेतला होता.

नवी दिल्लीः भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकला २९ सप्टेंबरला दोन वर्षं पूर्ण होत आहेत. हा दिवस 'सर्जिकल स्ट्राइक डे' म्हणून साजरा करण्याचं पत्रक विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सर्व विद्यापीठांना पाठवल्यानं नवा वाद सुरू झाला आहे. 

केंद्र सरकार जवानांच्या शौर्याचा वापर राजकीय स्वार्थासाठी करून घेत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. परंतु, सर्जिकल स्ट्राइक डे हा राजकारणाचा नव्हे, तर देशभक्तीचा विषय आहे, अशी भूमिका केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केली आहे. 

१८ सप्टेंबर २०१६ रोजी नियंत्रण रेषेजवळच्या उरी इथल्या लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात १७ जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला भारतीय लष्करानं २९ सप्टेंबरला घेतला होता. पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून आपल्या वीर जवानांनी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते आणि पाकिस्तानला हिसका दाखवला होता. स्वाभाविकच, लष्कराच्या पराक्रमाला देशानं सलाम केला होता. दुर्दैवानं, त्यावरून राजकारणही झालं होतं. काही नेत्यांनी सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागितले होते आणि त्यावरून बरीच शाब्दिक चकमक उडाली होती. 

आता, दोन वर्षांनंतर या सर्जिकल स्ट्राइकवरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. २९ सप्टेंबरला देशातील सर्व विद्यापीठांनी सर्जिकल स्ट्राइक डे साजरा करावा, अशी सूचना यूजीसीनं केल्यानं ही वादाची ठिणगी पडली. असा दिवस साजरा करण्याची गरज काय, हा तर सरकारचा राजकारण करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. हा भाजपाचा अजेंडा असल्यानं आम्ही हा दिवस साजरा करणार नाही, असं पश्चिम बंगालचे शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी यांनी निक्षून सांगितलं. 

या टीकेनंतर प्रकाश जावडेकर यांनी सरकारची बाजू स्पष्ट केली आहे. भारतीय जवानांच्या पराक्रमाला सलाम करण्याच्या दृष्टीने २९ सप्टेंबर हा दिवस सर्जिकल स्ट्राइक डे म्हणून साजरा करण्याची सूचना अनेक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केली होती. त्यामुळे आम्ही फक्त आवाहन केलं आहे, हे पत्रक बंधनकारक नाही. हा विषय राजकारणाचा नसून देशभक्तीचा आहे, असं त्यांनी नमूद केलं. अर्थात, त्यानंतरही हे वाक् युद्ध सुरूच आहे. 

टॅग्स :surgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Armyभारतीय जवानPrakash Javadekarप्रकाश जावडेकर