शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘उडान’ स्वस्त विमानसेवेत महाराष्ट्राऐवजी गुजरातला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 05:04 IST

नवी दिल्ली : हवाई वाहतूक मंत्रालयाचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनावर मोर्चा नेत शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी मोदी सरकारला शिवसेनेची झलक राजधानी दिल्लीत गुरुवारी दाखवून दिली.

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : हवाई वाहतूक मंत्रालयाचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनावर मोर्चा नेत शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी मोदी सरकारला शिवसेनेची झलक राजधानी दिल्लीत गुरुवारी दाखवून दिली. विषय होता नाशिकसह महाराष्ट्रातल्या छोट्या शहरांना जोडणा-या ‘उडान’ या महत्त्वाकांक्षी हवाई सेवेचा. ‘उडान’ सेवेबाबत जीव्हीके कंपनीने गुजरातला प्राधान्य देऊन, महाराष्ट्रातील सर्व छोट्या शहरांवर अन्याय केल्याचा आरोप खा. गोडसे यांनी केला. तसेच १५ डिसेंबरपर्यंत अन्याय दूर झाला नाही तर शिवसेनेचे सर्व खासदार दिल्लीत आंदोलन करतील, असा इशाराही गोडसेंनी नागरी वाहतूक मंत्रालयाच्या अधिका-यांना दिला.खा. गोडसे म्हणाले की, देशभरातील छोटी विमानतळे मोठ्या शहरांना जोडली जावीत, यासाठी केंद्र सरकारने आॅक्टोबर २0१६ मधे उडान योजनेची घोषणा केली. एअर डेक्कन कंपनीला नाशिक-पुणे, नाशिक- मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव, सोलापूर या हवाई मार्गांवर विमानसेवा सुरू करण्यास मान्यता दिली आणि ३0 सप्टेंबर २0१७ पर्यंत विमानसेवा सुरू करण्याचे आदेशही दिले. नाशिकची निवड झाल्यामुळे वर्षानुवर्षे रखडलेली विमानसेवा मार्गी लागणार असा आनंद आम्हा सर्वांना झाला.त्यानंतर आॅगस्टमध्ये मुंबईत टाइम स्लॉटसंदर्भात बैठका सुरू झाल्या. हवाई वाहतूक मंत्रालयाने जीव्हीके या खासगी कंपनीला टाइम स्लॉट विचारण्याऐवजी आदेश द्यायला हवा होता. तसे न केल्याने जीव्हीकेने गुजरातच्या सुरत, कांडला आणि पोरबंदर विमानतळांची निवड करून महाराष्ट्राची विमानसेवा वाºयावर सोडून दिली.साहजिकच नाशिकची विमानसेवा ३0 सप्टेंबर रोजी सुरू झाली नाही, असे सांगून, उडान सेवेत गुजरातला प्राधान्य देताना महाराष्ट्राला का वगळले? उडान सेवेचाअग्रक्रम केंद्र सरकार ठरवणार की जीव्हीके कंपनी, असा सवाल खा. गोडसे यांनी केला.विमान प्रवास हे सामान्यजनांचे स्वप्न आहे. नाशिक वा महाराष्ट्रातील सर्व छोटी शहरे त्यास अपवाद नाहीत. मोदी सरकारने १५ डिसेंबरच्या आत जीव्हीके कंपनीला सरकारी आदेशाची अंमलबजावणी करण्यास भाग न पाडल्यास शिवसेनेला मोदी सरकारविरुद्धच आंदोलन करावे लागेल, असा सक्त इशारा देण्यासाठीच हवाई वाहतूक मंत्रालयाच्या मुख्यालयावर आज मोर्चा काढण्यात आाला, असे हेमंत गोडसे म्हणाले.

टॅग्स :Gujaratगुजरात