शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

काश्मिरात दोन आठवड्यांत बाहेरील ५ कामगारांच्या हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 06:31 IST

दहशत। उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडहून येणाऱ्या कामगारांत भीती

पुलवामा : राजस्थानातील एका ट्रकचालकाची १४ आॅक्टोबर रोजी काश्मिरात शोपियानमध्ये अतिरेक्यांनी हत्या केली होती. त्यानंतर काश्मिरात चार हत्या झाल्या आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. पुलवामात एका बाहेरील मजुराची, तसेच बाहेरील ट्रकचालक, एक स्थानिक सफरचंद व्यापारी यांची हत्या झाल्याने तणाव आहे. दोन आठवड्यांत झालेल्या ५ हत्यांमुळे कामगार, बाहेरील लोकांतही भीती आहे.

५ आॅगस्ट रोजी काश्मिरातील कलम ३७० हटविल्यानंतर मजुरांची कमतरता जाणवत आहे, तसेच काश्मिरात दाखल झालेले बाहेरील मजूर सुरक्षेच्या कारणास्तव परत गेले आहेत. छत्तीसगडच्या बिलासपूरचा रहिवासी २५ वर्षीय गोपाल कुमार कर्ण हा पुलवामात वीटभट्टीवर मजूर आहे. तो सांगतो, आपले वडीलही येथे वीटभट्टीवर काम करीत होते. ते आमच्या पूर्ण कुटुंबाला येथे घेऊन आले. माझ्या दहा महिन्यांच्या मुलाचाही जन्म येथीलच आहे. या ठिकाणी वीटभट्टीवर काम करणारे १४० हून अधिक मजूर उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड भागातील आहेत. कामाच्या +शोधात ते काश्मिरात येतात. दोन कामगार एका दिवसात २००० विटा भाजू शकतात. त्याबदल्यात त्यांना प्रति दिन ५०० ते ७०० रुपये मिळतात. स्थानिक मजुरांच्या तुलनेत मजुरीचे हे दर कमी आहेत. स्थानिक मजूर प्रति दिन १५०० रुपये घेतात. काश्मिरात ८३ व्या दिवशीही जनजीवन विस्कळीतश्रीनगर : काश्मिरातील जनजीवन ८३ व्या दिवशीही विस्कळीतच होते. मुख्य बाजारपेठा बंद होत्या. काही भागात सकाळी काही तासांसाठी दुकाने उघडली होती. मात्र, ११ वाजता ही दुकानेही बंद झाली. थोड्या वेळातच या दुकानांत एकच गर्दी उसळली होती आणि रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढल्याने ट्रॅफिक जाम होती. काश्मिरात अद्यापही इंटरनेट सेवा बंद आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर