शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

काश्मिरात दोन आठवड्यांत बाहेरील ५ कामगारांच्या हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 06:31 IST

दहशत। उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडहून येणाऱ्या कामगारांत भीती

पुलवामा : राजस्थानातील एका ट्रकचालकाची १४ आॅक्टोबर रोजी काश्मिरात शोपियानमध्ये अतिरेक्यांनी हत्या केली होती. त्यानंतर काश्मिरात चार हत्या झाल्या आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. पुलवामात एका बाहेरील मजुराची, तसेच बाहेरील ट्रकचालक, एक स्थानिक सफरचंद व्यापारी यांची हत्या झाल्याने तणाव आहे. दोन आठवड्यांत झालेल्या ५ हत्यांमुळे कामगार, बाहेरील लोकांतही भीती आहे.

५ आॅगस्ट रोजी काश्मिरातील कलम ३७० हटविल्यानंतर मजुरांची कमतरता जाणवत आहे, तसेच काश्मिरात दाखल झालेले बाहेरील मजूर सुरक्षेच्या कारणास्तव परत गेले आहेत. छत्तीसगडच्या बिलासपूरचा रहिवासी २५ वर्षीय गोपाल कुमार कर्ण हा पुलवामात वीटभट्टीवर मजूर आहे. तो सांगतो, आपले वडीलही येथे वीटभट्टीवर काम करीत होते. ते आमच्या पूर्ण कुटुंबाला येथे घेऊन आले. माझ्या दहा महिन्यांच्या मुलाचाही जन्म येथीलच आहे. या ठिकाणी वीटभट्टीवर काम करणारे १४० हून अधिक मजूर उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड भागातील आहेत. कामाच्या +शोधात ते काश्मिरात येतात. दोन कामगार एका दिवसात २००० विटा भाजू शकतात. त्याबदल्यात त्यांना प्रति दिन ५०० ते ७०० रुपये मिळतात. स्थानिक मजुरांच्या तुलनेत मजुरीचे हे दर कमी आहेत. स्थानिक मजूर प्रति दिन १५०० रुपये घेतात. काश्मिरात ८३ व्या दिवशीही जनजीवन विस्कळीतश्रीनगर : काश्मिरातील जनजीवन ८३ व्या दिवशीही विस्कळीतच होते. मुख्य बाजारपेठा बंद होत्या. काही भागात सकाळी काही तासांसाठी दुकाने उघडली होती. मात्र, ११ वाजता ही दुकानेही बंद झाली. थोड्या वेळातच या दुकानांत एकच गर्दी उसळली होती आणि रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढल्याने ट्रॅफिक जाम होती. काश्मिरात अद्यापही इंटरनेट सेवा बंद आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर