शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

दोन-तीन दिवसांत केंद्रात शपथविधी!

By admin | Updated: June 30, 2016 05:35 IST

दोन-तीन दिवसांत मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ फेरबदलात, महाराष्ट्रातील विनय सहस्रबुद्धे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता जाणकार सूत्रांकडून समजली आहे.

नवी दिल्ली : दोन-तीन दिवसांत मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ फेरबदलात, महाराष्ट्रातील विनय सहस्रबुद्धे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता जाणकार सूत्रांकडून समजली आहे. फेरबदलात मंत्रिमंडळातून काही मंत्र्यांना वगळले जाईल तर काही नव्या चेहऱ्यांचा समावेश होईल. नव्या चेहऱ्यांमध्ये सहस्रबुद्धे, अलाहाबादचे श्यामाचरण गुप्ता, जबलपूरचे राकेशसिंग, बीकानेरचे अर्जुनराम मेघवाल, भाजपचे महासचिव ओम माथुर ही ५ नावे चर्चेत तूर्त आघाडीवर आहेत. याखेरीज सर्बानंद सोनोवाल यांच्या रिक्त जागी आसाममधून एका खासदाराची हमखास वर्णी लागेल. उत्तरप्रदेशच्या आगामी निवडणुका लक्षात घेउन अलाहाबादचे गुप्ता व विद्यमान राज्यमंत्री नकवींना कॅबिनेट मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.सहस्रबुद्धे भाजपच्या थिंक टँकचे महत्त्वाचे घटक आहेत. मोदी सरकारच्या कोअर ग्रुपमधे त्यांच्या समावेशाची शक्यता जाते. महाराष्ट्रात म्हाळगी प्रबोधिनीचे संचालकपद त्यांनी कौशल्याने सांभाळले. राज्यसभेवर निवड झाली, तेव्हापासूनच मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळेल, असा कयास व्यक्त होत होता.नव्या मंत्र्यांच्या शपथविधी १९ ते २३ जूनच्या दरम्यान करण्याचा सरकारचा इरादा होता. तथापि काही कारणांनी फेरबदल पुढे ढकलला गेला. मंत्रिमंडळ फेरबदलाचा तसेच नव्या मंत्र्यांच्या नियुक्तीचा निर्णय पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी रा.स्व. संघाच्या नेत्यांशी विचारविनिमय करून घेतल्याचे समजते. पंतप्रधान मोदी ६ जुलै रोजी परदेशी जात आहेत. त्यापूर्वीच फेरबदल करण्याचा सरकारचा विचार आहे, असे सूत्रांनी सांगितले.>कोणाला मिळणार डच्चूमंत्रिमंडळातून ज्यांना बहुदा डच्चू मिळेल, त्यात वादग्रस्त विधाने करणारे बिहारचे गिरीराजसिंग, उपराष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत असलेल्या नजमा हेपतुल्ला, राज्यमंत्री निहालचंद, साध्वी निरंजन ज्योती आदींची नावे आहेत. गिरीराजसिंग यांचा समावेश बिहार विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करण्यात आला होता. त्यांना मर्जीनुसार विधाने करण्याची खुली सूटही दिली होती.तथापि त्याचा कोणताही लाभ भाजपला झाला नाही. उलट वादग्रस्त विधानांमुळे पक्षाला बॅकफूटवर जावे लागले. नजमा हेपतुल्ला ७१ वर्षांच्या आहेत. ज्येष्ठ मंत्र्यांना शक्यतो ठेवायचे नाही, असे भाजपाचे धोरण आहे. हेपतुल्लांची जागा रिक्त झाल्यास राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवींची कॅबिनेट मंत्रिपदी पदोन्नती होईल.