शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

दोन-तीन दिवसांत केंद्रात शपथविधी!

By admin | Updated: June 30, 2016 05:35 IST

दोन-तीन दिवसांत मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ फेरबदलात, महाराष्ट्रातील विनय सहस्रबुद्धे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता जाणकार सूत्रांकडून समजली आहे.

नवी दिल्ली : दोन-तीन दिवसांत मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ फेरबदलात, महाराष्ट्रातील विनय सहस्रबुद्धे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता जाणकार सूत्रांकडून समजली आहे. फेरबदलात मंत्रिमंडळातून काही मंत्र्यांना वगळले जाईल तर काही नव्या चेहऱ्यांचा समावेश होईल. नव्या चेहऱ्यांमध्ये सहस्रबुद्धे, अलाहाबादचे श्यामाचरण गुप्ता, जबलपूरचे राकेशसिंग, बीकानेरचे अर्जुनराम मेघवाल, भाजपचे महासचिव ओम माथुर ही ५ नावे चर्चेत तूर्त आघाडीवर आहेत. याखेरीज सर्बानंद सोनोवाल यांच्या रिक्त जागी आसाममधून एका खासदाराची हमखास वर्णी लागेल. उत्तरप्रदेशच्या आगामी निवडणुका लक्षात घेउन अलाहाबादचे गुप्ता व विद्यमान राज्यमंत्री नकवींना कॅबिनेट मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.सहस्रबुद्धे भाजपच्या थिंक टँकचे महत्त्वाचे घटक आहेत. मोदी सरकारच्या कोअर ग्रुपमधे त्यांच्या समावेशाची शक्यता जाते. महाराष्ट्रात म्हाळगी प्रबोधिनीचे संचालकपद त्यांनी कौशल्याने सांभाळले. राज्यसभेवर निवड झाली, तेव्हापासूनच मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळेल, असा कयास व्यक्त होत होता.नव्या मंत्र्यांच्या शपथविधी १९ ते २३ जूनच्या दरम्यान करण्याचा सरकारचा इरादा होता. तथापि काही कारणांनी फेरबदल पुढे ढकलला गेला. मंत्रिमंडळ फेरबदलाचा तसेच नव्या मंत्र्यांच्या नियुक्तीचा निर्णय पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी रा.स्व. संघाच्या नेत्यांशी विचारविनिमय करून घेतल्याचे समजते. पंतप्रधान मोदी ६ जुलै रोजी परदेशी जात आहेत. त्यापूर्वीच फेरबदल करण्याचा सरकारचा विचार आहे, असे सूत्रांनी सांगितले.>कोणाला मिळणार डच्चूमंत्रिमंडळातून ज्यांना बहुदा डच्चू मिळेल, त्यात वादग्रस्त विधाने करणारे बिहारचे गिरीराजसिंग, उपराष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत असलेल्या नजमा हेपतुल्ला, राज्यमंत्री निहालचंद, साध्वी निरंजन ज्योती आदींची नावे आहेत. गिरीराजसिंग यांचा समावेश बिहार विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करण्यात आला होता. त्यांना मर्जीनुसार विधाने करण्याची खुली सूटही दिली होती.तथापि त्याचा कोणताही लाभ भाजपला झाला नाही. उलट वादग्रस्त विधानांमुळे पक्षाला बॅकफूटवर जावे लागले. नजमा हेपतुल्ला ७१ वर्षांच्या आहेत. ज्येष्ठ मंत्र्यांना शक्यतो ठेवायचे नाही, असे भाजपाचे धोरण आहे. हेपतुल्लांची जागा रिक्त झाल्यास राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवींची कॅबिनेट मंत्रिपदी पदोन्नती होईल.