शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

या दोन पंतप्रधानांना नाही मिळाली लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्याची संधी 

By balkrishna.parab | Updated: August 15, 2017 22:47 IST

देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते मोदींपर्यंत स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावण्याची परंपरा कायम आहे. मात्र स्वतंत्र भारतात असे दोन पंतप्रधान होऊन गेले ज्यांना लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावण्याची संधी मिळाली नाही. 

मुंबई, दि. 15 - देशभरात आज 71 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौथ्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावत देशवासियांना संबोधित केले. देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते मोदींपर्यंत स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावण्याची परंपरा कायम आहे. मात्र स्वतंत्र भारतात असे दोन पंतप्रधान होऊन गेले ज्यांना लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावण्याची संधी मिळाली नाही. हे दोन पंतप्रधान म्हणजे दोन वेळा देशाचे पंतप्रधानपद भूषवणारे गुलझारी लाल नंदा आणि दुसरे चंद्रशेखर. गुलझारीलाल नंदा हे दोन वेळा देशाचे हंगामी पंतप्रधान झाले. जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर 27 मे 1964  ते 9 जून 1964 या कालावधीत गुलझारीलाल नंदा यांनी हंगामी पंतप्रधान म्हणून काम पाहिले. त्यानंतर 11 ते 24 जानेवारी 1966 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा हंगामी पंतप्रधान म्हणून काम पाहिले होते. त्यामुळे त्यांना स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवून देशाला संबोधित करण्याची संधी मिळाली नाही. पंतप्रधानपद भूषवूनही देशाला संबोधित करण्याची संधी न मिळालेले दुसरे पंतप्रधान म्हणजे चंद्रशेखर. चंद्रशेखर यांनी 10 नोव्हेंबर 1990 ते 21 जून 1991 या काळात देशाचे पंतप्रधानपद भूषवले. पण त्यांचा कार्यकाळ स्वातंत्र्य दिनाआधीच संपुष्टात आल्याने त्यांनाही लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्याची संधी मिळाली नाही.  लाल किल्ल्यावरून सर्वाधिक वेळा तिरंगा फडकवण्याचा विक्रम देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावे आहे. त्यांनी 1947 ते 1964 दरम्यान सलग 17 वेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला होता. त्यानंतर नंबर लागतो तो इंदिरा गांधींचा. इंदिरा गांधी यांनी 1966 ते 1984 दरम्यान 16 वेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला होता. तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दहावेळी लाल किल्ल्यावरून ध्वजवंदन केले.  अटल बिहारी वाजपेयी हे सर्वाधिक सहावेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणारे गैर काँग्रेसी पंतप्रधान आहेत. त्यांनी 1998 ते 2004 दरम्यानच्या आपल्या कारकिर्दीत सहावेळा लाल किल्यावरून ध्वजवंदन केले होते.  

दरम्यान,  आज  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजवंदन करुन  सलग चौथ्यांदा देशवासियांना संबोधित केले.   देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्य दिनाच्या या शुभप्रसंगी देशवासियांना कोटी-कोटी शुभेच्छा. संपूर्ण देश आज स्वातंत्र्य दिनासोबत जन्माष्टमीचाही उत्सव साजरा करत आहे. सुदर्शन चक्राधारी मोहनपासून ते चरखाधारी मोहनपर्यंतचा वारसा आपल्याला लाभला आहे.  देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या गौरवासाठी हजारो लोकांनी बलिदान दिलं, यातना-दु:ख सोसले, त्या सर्व वीरांना सव्वाकोटी देशवासियांतर्फे नमन करतो, असेही उद्गार यावेळी पंतप्रधान मोदींनी काढले.