शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

दोन विमान अपघात टळले; ५१७ प्रवाशांचा जीव वाचला

By admin | Updated: December 28, 2016 04:54 IST

दोन विमानतळांवर दोन मोठे विमान अपघात टळल्याने ५१७ प्रवाशांचा जीव वाचला. दिल्लीत दोन विमानांची टक्कर थोडक्यात टळली. गोव्यात जेटचे विमान धावपट्टीवरून

नवी दिल्ली/पणजी : दोन विमानतळांवर दोन मोठे विमान अपघात टळल्याने ५१७ प्रवाशांचा जीव वाचला. दिल्लीत दोन विमानांची टक्कर थोडक्यात टळली. गोव्यात जेटचे विमान धावपट्टीवरून घसरल्याने २० प्रवासी जखमी झाले आहेत. पहाटे ५ वाजेच्या सुमारास दुबईहून गोवामार्गे मुंबईला जाणारे विमान गोव्यात दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले होते़ मुंबईला प्रस्थान करण्यास धावपट्टीवर येत असताना दाट धुक्यामुळे वैमानिकाला अंदाज न आल्याने ते धावपट्टीबाहेर गेले़ त्याचवेळी विमानाचे टायर फुटले. वैमानिकाने अचानक ब्रेक लावल्याने विमान वर्तुळाकार फिरले आणि पुढे जाऊन धडकले़ त्यात २० जण जखमी झाले़ - गोव्यात दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या जेट एअरवेजच्या अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली. काहींनी केबिनच्या दारातून बाहेर पडण्यास गर्दी केल्याने विमान एका बाजूने झुकले़ ते कलंडताच प्रवासी आणखी घाबरले.काहींनी मागील दरवाजातून बाहेर पडण्यास उड्या मारल्या़ काहींचे हात-पाय फ्रॅ क्चर झाले़. काहींना किरकोळ दुखापती झाल्या़ जखमींमध्ये गरोदर महिलेचा समावेश आहे़ नौदलाचे मदतकार्य नौदलाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवत बचावकार्य सुरू केले. विमानात अडकलेल्या सर्व प्रवाशांना त्यांनी सुखरूपपणे बाहेर काढले़ १० प्रवाशांना चिखलीच्या सरकारी कुटीर रुग्णालयात, तर गंभीर जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ दिल्लीत संदेशवहनाची चूकइंडिगो आणि स्पाइसजेट या खासगी कंपन्यांची विमाने दिल्ली विमानतळावर मंगळवारी सकाळी समोरासमोर आली. मात्र, थोडक्यात मोठा अपघात टळला. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाकडून चुकीच्या संदेशवहनामुळे या विमानांचा अपघात होताहोता टळला, असे सूत्रांनी सांगितले. ही घटना घडली त्या वेळी लखनौहून आलेल्या इंडिगो विमानात १६० तर हैदराबादला निघालेल्या स्पाइसजेट विमानात १८७ प्रवासी होते. या घटनेची चौकशी नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने सुरू केली आहे.