शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
2
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
5
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
6
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
8
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
9
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
10
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
11
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
12
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
13
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
14
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
15
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
16
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
17
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
18
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
19
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
20
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...

किसान युनियनमध्ये दोन गट; नरेश, राकेश टिकैत यांना हटविले, राजेश सिंह चौहान अध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 06:24 IST

शेतकऱ्यांचे नेते महेंद्र सिंह टिकैत यांच्या ११व्या पुण्यतिथीच्या दिवशीच त्यांनी स्थापन केलेली भारतीय किसान युनियन दोन गटांत विभागली.

लोकमत न्यूज नेटवर्क

लखनौ : शेतकऱ्यांचे नेते महेंद्र सिंह टिकैत यांच्या ११व्या पुण्यतिथीच्या दिवशीच त्यांनी स्थापन केलेली भारतीय किसान युनियन (भाकियु) दोन गटांत विभागली. लखनौच्या ऊस संस्थान सभागृहामध्ये भाकियु कार्यकारिणीच्या बैठकीत महेंद्र सिंह टिकैत यांची दोन मुले नरेश व राकेश टिकैत यांना भाकियुच्या कार्यकारिणीतून बरखास्त करण्यात आले.

नरेश टिकैत यांना राष्ट्रीय अध्यक्ष पदावरूनही हटविण्यात आले. भाकियुचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेश सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली भाकियु (अराजकीय)ची स्थापना करण्यात आली. नरेश व राकेश टिकैत हे राजकारण करणारे लोक आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत एका पक्षाचा प्रचार करण्यास सांगितले होते, असा आरोप राजेश सिंह चौहान यांनी केला. 

भाकियुचे नवे अध्यक्ष राजेश सिंह चौहान यांनी दावा केला आहे की, आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडले जाणार नाहीत. आम्ही महेंद्र सिंह टिकैत यांच्या मार्गावर चालणार आहोत. आम्ही १३ दिवस आंदोलनात होतो. परंतु, जमा झालेल्या निधीच्या एक रुपयालाही स्पर्श केला नाही. शेतकऱ्यांना सन्मान देणे आमचे काम आहे. राजेश सिंह चौहान हे यूपीच्या फतेहपूर जिल्ह्यातील रहिवासी असून, भाकियुच्या स्थापनेपासून त्यांचा सहभाग आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आता आम्ही संघटनेची नव्या पद्धतीने बांधणी करू. देशातील शेतकरी नेते राकेश व नरेश यांच्या पवित्र्याने नाराज आहेत. आम्ही तर प्रत्येक व्यासपीठावर शेतकऱ्यांच्या समस्या उपस्थित करण्याचा संकल्प केला आहे. परंतु, नरेश व राकेश हे शेतकऱ्यांच्या हिताची चर्चा करण्याऐवजी लांगूलचालनात अडकले आहेत. शेतकरी आंदोलनानंतर भाकियु नेत्यांच्या सुरू झालेल्या असंतोषातून रविवारी वेगळा मार्ग निवडला. तथापि, याचे संकेत मिळाल्यानंतर भाकियुचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत शुक्रवारीच लखनौमध्ये दाखल झाले होते.

३५ वर्षांपूर्वी झाली होती भाकियुची स्थापना

१ मार्च १९८७ रोजी महेंद्र सिंह टिकैत यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर लढण्यासाठी भारतीय किसान युनियनची स्थापना केली होती. त्याच दिवशी करमूखेडी वीज केंद्रावर पहिले धरणे धरण्यात आले. यावेळी हिंसाचार झाला व शेतकरी आंदोलन उग्र झाले. पीएसीचा शिपाई व एका शेतकऱ्याचा गोळी लागून मृत्यू झाला होता. पोलिसांचे वाहन जाळण्यात आले होते. त्यानंतर कोणताही तोडगा न निघता धरणे समाप्त करण्यात आले. १७ मार्च १९८७ रोजी भाकियूची पहिली बैठक झाली. ही संघटना शेतकऱ्यांची लढाई लढेल व नेहमी अराजकीय राहील, असे ठरले. यानंतर पश्चिम उत्तर प्रदेशात भाकियु शेतकऱ्यांचे मुद्दे उपस्थित करू लागली. आज या संघटनेत दोन गट झाले. 

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैत