शहरं
Join us  
Trending Stories
1
"२२ आमदार मुख्यमंत्र्याच्या हाती लागलेत..."; आदित्य ठाकरेंचा दावा, कुणावर साधला निशाणा?
2
जिनांच्या दबावापुढे काँग्रेसने गुडघे टेकले; 'वंदे मातरम्'वरील चर्चेदरम्यान PM मोदींचा घणाघात
3
बाजारात हाहाकार! सेन्सेक्स ८०० अंक तर निफ्टी २६,००० च्या खाली; 'या' ६ कारणांमुळे मोठी घसरण
4
चित्रपट हिट झाला अन् कंपनी मालामाल! 'धुरंधर'च्या जबरदस्त कमाईमुळे गुंतवणूकदारांनाही फायदा
5
Crime: एकत्र दारु प्यायले, नंतर UPI पिन चोरला, मग...; २० लाखांच्या FD साठी मित्रांनीच रचला कट!
6
"माझ्या नवऱ्याने गर्लफ्रेंडसाठी मला..."; बायकोला जीवे मारण्याची धमकी, ढसाढसा रडत पोलिसांत धाव
7
लाखोंचं एक-एक टी शर्ट विकणारं Versace का बुडालं; कोणी खरेदी केला ब्रँड, २०२५ ची 'मेगा-डील'
8
हायस्पीड इंटरनेट! भारतात Starlink चे सब्सक्रिप्शन किती रुपयांना मिळेल? कंपनीने जाहीर केली किंमत
9
'पैसे नाही, मला तूच पाहिजे!', वरिष्ठ अधिकाऱ्याच्या 'त्या' मागण्या, वेतनवाढही रोखली; कंटाळून नर्सने...
10
SMAT: डेब्यू सामन्यातच मोठा धमाका, ५५ चेंडूत ११४ धावा ठोकल्या; कोण आहे अमित पासी?
11
भगवद्गीतेची पुतिन यांनाही भुरळ, भारतातून परतताना विमानात केले वाचन; PM मोदींचा मान राखला!
12
Pune Crime: "माझ्या बहिणीसोबतचे प्रेमसंबंध तोड", रागावलेल्या बॉयफ्रेंडने २९ वेळा वार करत सोन्याला संपवले  
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील पाचपट! फिरतानाही दिसेल भारतीय संस्कृतीची झलक
14
तुमच्या पेन्शन ठेवींवर तुम्हाला व्याज मिळते का? पीएफ आणि EPS साठीच्या नियमात तुमचाही गोंधळ होतो?
15
'इंडिगो' प्रकरणानंतर सरकार सावध, अशी समस्या पुन्हा उद्भवू नये यासाठी केंद्राची राज्यसभेतून मोठी घोषणा
16
हळूहळू दिवाळखोर होतोय अमेरिका! डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजवटीत १५ वर्षांचा विक्रम मोडला
17
Video - कडक सॅल्यूट! पॅरालाइझ्ड आहे, कमकुवत नाही... ५२ वर्षीय Zepto डिलिव्हरी वुमन
18
'बोल्डनेस'चा कहर! युवराज सिंगसोबत समुद्राच्या मधोमध फोटोशूट, जाणून घ्या 'ती' सुंदरी कोण?
19
माझ्या बहिणीची हत्या करण्यात आलीये, पती आणि सासऱ्याने तिचा...; सरिता अग्रवाल यांच्या भावाचे गंभीर आरोप
20
IndiGo: प्रवाशांचे हाल, तिकीट खिडकीवर गोंधळ, विमानतळांवर सामानाचा ढिग; पाहा फोटो!
Daily Top 2Weekly Top 5

किसान युनियनमध्ये दोन गट; नरेश, राकेश टिकैत यांना हटविले, राजेश सिंह चौहान अध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 06:24 IST

शेतकऱ्यांचे नेते महेंद्र सिंह टिकैत यांच्या ११व्या पुण्यतिथीच्या दिवशीच त्यांनी स्थापन केलेली भारतीय किसान युनियन दोन गटांत विभागली.

लोकमत न्यूज नेटवर्क

लखनौ : शेतकऱ्यांचे नेते महेंद्र सिंह टिकैत यांच्या ११व्या पुण्यतिथीच्या दिवशीच त्यांनी स्थापन केलेली भारतीय किसान युनियन (भाकियु) दोन गटांत विभागली. लखनौच्या ऊस संस्थान सभागृहामध्ये भाकियु कार्यकारिणीच्या बैठकीत महेंद्र सिंह टिकैत यांची दोन मुले नरेश व राकेश टिकैत यांना भाकियुच्या कार्यकारिणीतून बरखास्त करण्यात आले.

नरेश टिकैत यांना राष्ट्रीय अध्यक्ष पदावरूनही हटविण्यात आले. भाकियुचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेश सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली भाकियु (अराजकीय)ची स्थापना करण्यात आली. नरेश व राकेश टिकैत हे राजकारण करणारे लोक आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत एका पक्षाचा प्रचार करण्यास सांगितले होते, असा आरोप राजेश सिंह चौहान यांनी केला. 

भाकियुचे नवे अध्यक्ष राजेश सिंह चौहान यांनी दावा केला आहे की, आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडले जाणार नाहीत. आम्ही महेंद्र सिंह टिकैत यांच्या मार्गावर चालणार आहोत. आम्ही १३ दिवस आंदोलनात होतो. परंतु, जमा झालेल्या निधीच्या एक रुपयालाही स्पर्श केला नाही. शेतकऱ्यांना सन्मान देणे आमचे काम आहे. राजेश सिंह चौहान हे यूपीच्या फतेहपूर जिल्ह्यातील रहिवासी असून, भाकियुच्या स्थापनेपासून त्यांचा सहभाग आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आता आम्ही संघटनेची नव्या पद्धतीने बांधणी करू. देशातील शेतकरी नेते राकेश व नरेश यांच्या पवित्र्याने नाराज आहेत. आम्ही तर प्रत्येक व्यासपीठावर शेतकऱ्यांच्या समस्या उपस्थित करण्याचा संकल्प केला आहे. परंतु, नरेश व राकेश हे शेतकऱ्यांच्या हिताची चर्चा करण्याऐवजी लांगूलचालनात अडकले आहेत. शेतकरी आंदोलनानंतर भाकियु नेत्यांच्या सुरू झालेल्या असंतोषातून रविवारी वेगळा मार्ग निवडला. तथापि, याचे संकेत मिळाल्यानंतर भाकियुचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत शुक्रवारीच लखनौमध्ये दाखल झाले होते.

३५ वर्षांपूर्वी झाली होती भाकियुची स्थापना

१ मार्च १९८७ रोजी महेंद्र सिंह टिकैत यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर लढण्यासाठी भारतीय किसान युनियनची स्थापना केली होती. त्याच दिवशी करमूखेडी वीज केंद्रावर पहिले धरणे धरण्यात आले. यावेळी हिंसाचार झाला व शेतकरी आंदोलन उग्र झाले. पीएसीचा शिपाई व एका शेतकऱ्याचा गोळी लागून मृत्यू झाला होता. पोलिसांचे वाहन जाळण्यात आले होते. त्यानंतर कोणताही तोडगा न निघता धरणे समाप्त करण्यात आले. १७ मार्च १९८७ रोजी भाकियूची पहिली बैठक झाली. ही संघटना शेतकऱ्यांची लढाई लढेल व नेहमी अराजकीय राहील, असे ठरले. यानंतर पश्चिम उत्तर प्रदेशात भाकियु शेतकऱ्यांचे मुद्दे उपस्थित करू लागली. आज या संघटनेत दोन गट झाले. 

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैत