शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

2 कोटी रोजगार माझ्या खात्यानेच दिले, गडकरींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 11:51 IST

बेरोजगारीवरुन विरोधकांनी केंद्र सरकारला टार्गेट केलं असतानाचा आता बचावासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे सरसावले आहेत.

नवी दिल्ली - बेरोजगारीवरुन विरोधकांनी केंद्र सरकारला टार्गेट केलं असतानाचा आता बचावासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे सरसावले आहेत. भाजपा सरकारने केंद्रात सत्तेत येताना दरवर्षी 2 कोटी रोजगार उपलब्ध करु असं आश्वासन दिलं होतं त्यावरुन विरोधकांनी नोटाबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले असा आरोप केला. मग 2 कोटी रोजगारांचे झाले काय असा सवाल विरोधकांकडून निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विचारला जाऊ लागला. त्यावर नितीन गडकरी यांनी एका हिंदी दैनिकाला मुलाखत देताना भाष्य केलं आहे. 

नितीन गडकरी यांनी सांगितले की, दोन कोटी रोजगार तर फक्त त्यांच्या मंत्रालयाने दिले आहेत. माझ्या विभागाने १७ लाख कोटींची कामे दिली आहेत, ती भारत सरकाच्या बजेटपेक्षा अनेक पट जास्त आहे. दोन कोटी रोजगार तर फक्त माझे खातेच देत आहे. त्याचे आकडे आहेत. ई-रिक्षा पाहा. एक कोटी लोक हातरिक्षा चालवत होते, हा रोजगार नाही का? दिल्लीच्या पोलिस आयुक्तांनी सांगितले की, ई-रिक्षामुळे रोजगार मिळाल्याने राजधानीत गुन्हे घटले असंही गडकरींनी सांगितले. 

तसेच गंगा स्वच्छतेवरुन विरोधकांवर टीका करताना गडकरी म्हणाले की, गंगा स्वच्छ झाली आहे. अलाहाबादहून कानपूर आणि हरिद्वारपर्यंत काही अडचणी आहेत. गेल्या कुंभाच्या वेळी घाण पाणी पाहून मॉरिशसचे पंतप्रधान स्नान न करताच गेले होते. या वेळी गंगा स्वच्छ होती, आम्ही ३०% कामच केले आहे. पुढील मार्चपर्यंत १००% करू. २६ हजार कोटींचे प्रकल्प आणत आहोत. पाणी स्वच्छ नसते तर प्रियंका गंगेचे पाणी प्यायल्या असत्या का? असा सवाल नितीन गडकरी यांनी उपस्थित केला आहे. 

दरम्यान मोदींचा उत्तराधिकारी कोण या प्रश्नावर उत्तर देताना गडकरी म्हणाले की, पक्ष योग्य वेळी निर्णय घेईल. पक्षात लोकशाही व्यवस्था आहे. सध्या त्याची गरज नाही. कारण आम्हाला बहुमत मिळणार आहे. मात्र मी पुन्हा अध्यक्ष होणार नाही. मी एकदा अध्यक्ष झालो. काही दोष नसतानाही माझ्यावर आरोप झाले. चौकशीत निर्दोष सुटलो असं ते म्हणाले. 

२०१४ मध्ये यूपीएबद्दल नाराजी होती. भाजपने जेव्हा नरेंद्र मोदींना एनडीएचा नेता निवडले तेव्हा लोकांच्या मनात आशा होती की हे स्थिती बदलतील. मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रतिष्ठा वाढली असून काँग्रेसला माहीत आहे आपण सत्तेत येणार नाही त्यामुळेच न्याय सारख्या योजना आणण्याचं आश्वासन काँग्रेसकडून देण्यात येतं आहे असा टोला नितीन गडकरी यांनी केला आहे. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीjobनोकरीCentral Governmentकेंद्र सरकारElectionनिवडणूक