शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

2 कोटी रोजगार माझ्या खात्यानेच दिले, गडकरींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 11:51 IST

बेरोजगारीवरुन विरोधकांनी केंद्र सरकारला टार्गेट केलं असतानाचा आता बचावासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे सरसावले आहेत.

नवी दिल्ली - बेरोजगारीवरुन विरोधकांनी केंद्र सरकारला टार्गेट केलं असतानाचा आता बचावासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे सरसावले आहेत. भाजपा सरकारने केंद्रात सत्तेत येताना दरवर्षी 2 कोटी रोजगार उपलब्ध करु असं आश्वासन दिलं होतं त्यावरुन विरोधकांनी नोटाबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले असा आरोप केला. मग 2 कोटी रोजगारांचे झाले काय असा सवाल विरोधकांकडून निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विचारला जाऊ लागला. त्यावर नितीन गडकरी यांनी एका हिंदी दैनिकाला मुलाखत देताना भाष्य केलं आहे. 

नितीन गडकरी यांनी सांगितले की, दोन कोटी रोजगार तर फक्त त्यांच्या मंत्रालयाने दिले आहेत. माझ्या विभागाने १७ लाख कोटींची कामे दिली आहेत, ती भारत सरकाच्या बजेटपेक्षा अनेक पट जास्त आहे. दोन कोटी रोजगार तर फक्त माझे खातेच देत आहे. त्याचे आकडे आहेत. ई-रिक्षा पाहा. एक कोटी लोक हातरिक्षा चालवत होते, हा रोजगार नाही का? दिल्लीच्या पोलिस आयुक्तांनी सांगितले की, ई-रिक्षामुळे रोजगार मिळाल्याने राजधानीत गुन्हे घटले असंही गडकरींनी सांगितले. 

तसेच गंगा स्वच्छतेवरुन विरोधकांवर टीका करताना गडकरी म्हणाले की, गंगा स्वच्छ झाली आहे. अलाहाबादहून कानपूर आणि हरिद्वारपर्यंत काही अडचणी आहेत. गेल्या कुंभाच्या वेळी घाण पाणी पाहून मॉरिशसचे पंतप्रधान स्नान न करताच गेले होते. या वेळी गंगा स्वच्छ होती, आम्ही ३०% कामच केले आहे. पुढील मार्चपर्यंत १००% करू. २६ हजार कोटींचे प्रकल्प आणत आहोत. पाणी स्वच्छ नसते तर प्रियंका गंगेचे पाणी प्यायल्या असत्या का? असा सवाल नितीन गडकरी यांनी उपस्थित केला आहे. 

दरम्यान मोदींचा उत्तराधिकारी कोण या प्रश्नावर उत्तर देताना गडकरी म्हणाले की, पक्ष योग्य वेळी निर्णय घेईल. पक्षात लोकशाही व्यवस्था आहे. सध्या त्याची गरज नाही. कारण आम्हाला बहुमत मिळणार आहे. मात्र मी पुन्हा अध्यक्ष होणार नाही. मी एकदा अध्यक्ष झालो. काही दोष नसतानाही माझ्यावर आरोप झाले. चौकशीत निर्दोष सुटलो असं ते म्हणाले. 

२०१४ मध्ये यूपीएबद्दल नाराजी होती. भाजपने जेव्हा नरेंद्र मोदींना एनडीएचा नेता निवडले तेव्हा लोकांच्या मनात आशा होती की हे स्थिती बदलतील. मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रतिष्ठा वाढली असून काँग्रेसला माहीत आहे आपण सत्तेत येणार नाही त्यामुळेच न्याय सारख्या योजना आणण्याचं आश्वासन काँग्रेसकडून देण्यात येतं आहे असा टोला नितीन गडकरी यांनी केला आहे. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीjobनोकरीCentral Governmentकेंद्र सरकारElectionनिवडणूक