शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या या शेजा-याने चीनकडून विकत घेतल्या दोन पाणबुडया

By admin | Updated: July 13, 2017 18:04 IST

चीनकडून 20.30 कोटी डॉलर्सना पाणबुडया विकत घेणे हे चीनबरोबरचे आर्थिक आणि संरक्षण संबंध दृढ होत असल्याचे लक्षण आहे.

 ऑनलाइन लोकमत 

ढाका, दि. 13 - भारताचा जवळचा शेजारी  बांगलादेशने चीनकडून 20.30 कोटी अमेरिकन डॉलर्सना दोन पाणबुडया विकत घेतल्या आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले आहे. बांगलादेशची सप्रभुता आणि अखंडतेसाठी या पाणबुडया विकत घेतल्या. त्यात काहीही चुकीचे नाही असे  त्यांनी सांगितले. बांगलादेशच्या विकासामध्ये चीन महत्वाचा सहकारी असल्याचे हसीना म्हणाल्या. 
 
बांगलादेश नौदलाच्या आधुनिकीकरणासाठी या दोन पाणबुडया विकत घेतल्याचे त्यांनी सांगितले. बांगलादेशच्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला. शेजारी देशांनी याकडे नकारात्मक दृष्टीने पाहू नये असे त्या म्हणाल्या. 035G मिंग क्लासच्या या पाणबुडया आहेत. बीएन नबाजत्रा आणि बीएन आग्राजत्रा अशी या पाणबुडयांना नावे देण्यात आली आहेत. 
 
संसदेत खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी ही माहिती दिली. चीनकडून 20.30 कोटी डॉलर्सना पाणबुडया विकत घेणे हे चीनबरोबरचे आर्थिक आणि संरक्षण संबंध दृढ होत असल्याचे लक्षण आहे असे विश्लेषकांनी सांगितले. 2013 मध्ये बांगलादेशने रशियाकडून युध्दसामग्री खरेदीचा करार केला त्याचवेळी शेख हसीना यांनी चीनकडून पाणबुडया विकत घेण्याची योजना जाहीर केली होती. 
 
आणखी वाचा 
चीनचा सामना करण्यासाठी भारत तयार करतोय खास मिसाईल
तिढा वाढला! भारतापाठोपाठ चीननेही डोकलाममध्ये ठोकले तंबू
चीनची ऎतिहासिक सैन्यकपात, हा आहे ड्रॅगनचा नवा प्लॅन
 
सध्या सिक्कीम सीमेवरुन भारत आणि चीनमध्ये संबंध ताणले गेले आहेत. दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने उभे ठाकले आहे. त्यावेळी बांगलादेशसारखा जवळचा सहकारी चीनच्या जवळ जाणे भारताला परवडणारे नाही. चीनकडून सातत्याने युद्धखोरीची भाषा करुन भारताला धमक्या दिल्या जात आहेत. भारतानेही कणखर भूमिका घेत चीनच्या प्रत्येक आगळीकीला त्याच भाषेत प्रत्युत्तर देत आहे. 
 
चीनच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय जवानांनी डोकलाम परिसरात तंबू ठोकल्यानंतर आता चीननेही येथे दीर्घकाळ उभे राहण्याच्या इराद्याने तळ ठोकला आहे. या ठिकाणी दोन्हीकडचे सुमारे प्रत्येकी ३०० सैनिक उपस्थित असून, दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये केवळ १२० मीटरचे अंतर आहे. असे असले तरी दोन्ही सैन्यांमध्ये झटापट होण्याची शक्यता नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नल दर्जाचे लष्करी अधिकारी दोन्हीकडच्या लष्करांचे नेतृत्व करत आहेत.