शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

पंजाबी लखोबांच्या विरोधात वीस हजार प्रकरणं प्रलंबित

By admin | Updated: July 5, 2017 13:32 IST

हजारो मुलींना एनआरआय तरूणांनी फसविल्याचं चित्र पंजाबमध्ये बघायला मिळतं आहे.

ऑनलाइन लोकमत

चंदीगड, दि. 5- आपल्या पसंतीच्या मुलाशी लग्न करणं प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. विशेष म्हणजे एखाद्या मुलीला जर परदेशात नोकरी करून सेटल असलेल्या मुलाचं स्थळ आलं तर त्या मुलीबरोबरच तिचं कुटुंबीयसुद्धा त्या स्थळाला होकार देतं. लग्न करून आपणही विदेशात सेटल व्हावं, असं बहुतांशी मुलींना वाटतं. पण बऱ्याचदा यामुळे मुलींना फसविल्याच्या घटनाही घडतात. हजारो मुलींना एनआरआय तरूणांनी फसविल्याचं चित्र पंजाबमध्ये बघायला मिळतं आहे. तेथे जवळपास 25 हजार नववधु त्यांचा एनआरआर नवऱा पुन्हा मायदेशी येइल, याची वाट पाहत आहेत. या मुलींशी एनआरआय तरूणांनी लग्न केलं त्यांना परदेशात घेऊन जाण्याची स्वप्न दाखविली पण लग्नानंतर परदेशात निघून गेलेले ते तरूण परत आलेच नाहीत. जे तरूण परत आले त्यांनी लग्न केलेल्या मुलीला संपर्कच केला नाही. अशा फसवणूक करणाऱ्या वरांच्या विरोधात पंजाबमध्ये 20 हजारपेक्षा जास्त प्रकरणं प्रलंबित आहेत. 
 
पंजाब विश्वविद्यालयाच्या एका रिपोर्टनुसार, राज्यातील 25 हजार महिलांना त्यांचे एनआरआय पती सोडून निघून गेले आहेत. या मुद्द्यावर पंजाब विधानसभेत चर्चा होते तसंच लोकसभेतही हा मुद्दा उचलला गेला होता. पण तेथिल परिस्थिती अजूनही तशीच आहे. जे एनआरआय तरूण त्यांच्या बायकोला सोडून परदेशात पळून जातात अशांना पकडून त्यांच्यावर कारवाई करणं कठीण असतं. सध्या असलेल्या कायद्यांमध्ये जास्त औपचारिकता असल्याने हे एनआरआय त्याचा फायदा घेऊन स्वतःचा बचाव करतात, असं रिपोर्टमध्ये म्हंटलं आहे. 
 
माजी मंत्री बलवंत सिंह रामूवालिया अशा पीडित मुलींना नेहमी मीडियासमोर आणायचे. एनआरआय तरूणाशी लग्न केलेल्या मुलींना काही दिवसानंतर कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो, असं त्यांचं मत आहे. फसवणूक झालेल्या या मुलींसाठी सगळे सहानुभूती व्यक्त करतात पण त्यांच्या भविष्याचा विचार कधीही कोणासमोर नसतो. एनआऱआय मुलांशी लग्न करून फसवणूक झालेल्या मुलींच्या हक्कासाठी रामूवालिया यांनी आवाज उठवला होता. 
 
केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री मनेका गांधी यांनी पंजाबमधील हे वास्तव पाहता आता पाऊलं उचलायला सुरूवात केली आहे. केंद्र सरकार एनआरआय तरूणांकडून फसवणूक झालेल्या महिलांची मदत करण्यासाठी एक समिती स्थापन करणार आहे. मुलीशी लग्न करून तिला सोडून विदेशात पळून जाणाऱ्या मुलांना कोर्टाच्या आदेशाशिवाय एअरपोर्टवर लुकआउट नोटिस जारी केली जाइल, अशा समितीची स्थापना करण्याची विनंती केली जाणार आहे. अनिवासी भारतीय व्यक्तीशी लग्न केलेल्या महिलेला दोन पासपोर्ट देण्याशिवाय आर्थिक आणि कायदेशीर मदद देण्यावर विचार केला जातो आहे. 
 
आणखी वाचा 
 

हिंदू, मुस्लिम एकत्र राहणं अमान्य, दांपत्याला रुम देण्यास हॉटेलचा नकार

"इंदू सरकार" आधी आम्हाला दाखवा, काँग्रेसचं सेन्सॉर बोर्डाला पत्र

 ड्रॅगनच्या समुद्रातील हालचालींवर "रुक्मिणी"ची नजर