शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

पंजाबी लखोबांच्या विरोधात वीस हजार प्रकरणं प्रलंबित

By admin | Updated: July 5, 2017 13:32 IST

हजारो मुलींना एनआरआय तरूणांनी फसविल्याचं चित्र पंजाबमध्ये बघायला मिळतं आहे.

ऑनलाइन लोकमत

चंदीगड, दि. 5- आपल्या पसंतीच्या मुलाशी लग्न करणं प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. विशेष म्हणजे एखाद्या मुलीला जर परदेशात नोकरी करून सेटल असलेल्या मुलाचं स्थळ आलं तर त्या मुलीबरोबरच तिचं कुटुंबीयसुद्धा त्या स्थळाला होकार देतं. लग्न करून आपणही विदेशात सेटल व्हावं, असं बहुतांशी मुलींना वाटतं. पण बऱ्याचदा यामुळे मुलींना फसविल्याच्या घटनाही घडतात. हजारो मुलींना एनआरआय तरूणांनी फसविल्याचं चित्र पंजाबमध्ये बघायला मिळतं आहे. तेथे जवळपास 25 हजार नववधु त्यांचा एनआरआर नवऱा पुन्हा मायदेशी येइल, याची वाट पाहत आहेत. या मुलींशी एनआरआय तरूणांनी लग्न केलं त्यांना परदेशात घेऊन जाण्याची स्वप्न दाखविली पण लग्नानंतर परदेशात निघून गेलेले ते तरूण परत आलेच नाहीत. जे तरूण परत आले त्यांनी लग्न केलेल्या मुलीला संपर्कच केला नाही. अशा फसवणूक करणाऱ्या वरांच्या विरोधात पंजाबमध्ये 20 हजारपेक्षा जास्त प्रकरणं प्रलंबित आहेत. 
 
पंजाब विश्वविद्यालयाच्या एका रिपोर्टनुसार, राज्यातील 25 हजार महिलांना त्यांचे एनआरआय पती सोडून निघून गेले आहेत. या मुद्द्यावर पंजाब विधानसभेत चर्चा होते तसंच लोकसभेतही हा मुद्दा उचलला गेला होता. पण तेथिल परिस्थिती अजूनही तशीच आहे. जे एनआरआय तरूण त्यांच्या बायकोला सोडून परदेशात पळून जातात अशांना पकडून त्यांच्यावर कारवाई करणं कठीण असतं. सध्या असलेल्या कायद्यांमध्ये जास्त औपचारिकता असल्याने हे एनआरआय त्याचा फायदा घेऊन स्वतःचा बचाव करतात, असं रिपोर्टमध्ये म्हंटलं आहे. 
 
माजी मंत्री बलवंत सिंह रामूवालिया अशा पीडित मुलींना नेहमी मीडियासमोर आणायचे. एनआरआय तरूणाशी लग्न केलेल्या मुलींना काही दिवसानंतर कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो, असं त्यांचं मत आहे. फसवणूक झालेल्या या मुलींसाठी सगळे सहानुभूती व्यक्त करतात पण त्यांच्या भविष्याचा विचार कधीही कोणासमोर नसतो. एनआऱआय मुलांशी लग्न करून फसवणूक झालेल्या मुलींच्या हक्कासाठी रामूवालिया यांनी आवाज उठवला होता. 
 
केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री मनेका गांधी यांनी पंजाबमधील हे वास्तव पाहता आता पाऊलं उचलायला सुरूवात केली आहे. केंद्र सरकार एनआरआय तरूणांकडून फसवणूक झालेल्या महिलांची मदत करण्यासाठी एक समिती स्थापन करणार आहे. मुलीशी लग्न करून तिला सोडून विदेशात पळून जाणाऱ्या मुलांना कोर्टाच्या आदेशाशिवाय एअरपोर्टवर लुकआउट नोटिस जारी केली जाइल, अशा समितीची स्थापना करण्याची विनंती केली जाणार आहे. अनिवासी भारतीय व्यक्तीशी लग्न केलेल्या महिलेला दोन पासपोर्ट देण्याशिवाय आर्थिक आणि कायदेशीर मदद देण्यावर विचार केला जातो आहे. 
 
आणखी वाचा 
 

हिंदू, मुस्लिम एकत्र राहणं अमान्य, दांपत्याला रुम देण्यास हॉटेलचा नकार

"इंदू सरकार" आधी आम्हाला दाखवा, काँग्रेसचं सेन्सॉर बोर्डाला पत्र

 ड्रॅगनच्या समुद्रातील हालचालींवर "रुक्मिणी"ची नजर