शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

‘अच्छे दिन’ येण्यास निदान पंचवीस वर्षे !

By admin | Updated: July 15, 2015 00:06 IST

देशातील जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून केंद्रात सत्तेत आलेल्या भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अच्छे दिन यायला आणखी २५ वर्षे लागतील

नवी दिल्ली : देशातील जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून केंद्रात सत्तेत आलेल्या भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अच्छे दिन यायला आणखी २५ वर्षे लागतील असे सांगून घूमजाव केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. विरोधी पक्षाने भाजपावर जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप केला तर भाजपाने बचावात्मक पवित्रा घेत शहा यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा केला आहे. या निमित्ताने निवडणूक प्रचारातील बत्तिशी आता वचनपूर्तीच्या बाबतीत पंचविशीकडे झुकल्याची जाणीव झाली आहे.केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी मंगळवारी येथे विशेष पत्रपरिषदेत शहा यांच्या सोमवारच्या भाषणाची क्लिपिंगच दाखविली. हे भाषण भोपाळमधील पक्षाच्या बैठकीत देण्यात आले होते. शहा यांनी अच्छे दिनसंदर्भात २५ वर्षांचा उल्लेख केला नव्हता, हे त्यांना स्पष्ट करायचे होते. शहा यांचे भाषण खळबळजनक बनविण्यासाठीच त्यांचे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले असा आरोप भाजपाने केला. दुसरीकडे विरोधी पक्षांनीही या मुद्यावरून भाजपाला लगेच लक्ष्य केले. विश्वासघात आणि खोटी स्वप्ने दाखविणाऱ्या भाजपाला या देशातील जनता नक्कीच धडा शिकवेल, असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना केला. खोट्या आश्वासनांची त्सुनामी आणून भाजपाने धोका दिल्याचा त्यांचा आरोप होता. ‘शहा यांचे अच्छे दिन आले आहेत. त्यामुळे जनतेचे काहीही होवो, आता त्यांनी मजा केली पाहिजे’, अशी उपरोधिक टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंग यांनी टिष्ट्वटरवर केली.(लोकमत न्यूज नेटवर्क)काय म्हणाले होते शहा?देशात पुन्हा इंग्रज राजवटीपूर्वीचा काळ आणणे हेच खरे अच्छे दिनचे द्योतक आणि आश्वासन आहे. येत्या पाच वर्षात महागाई, परराष्ट्र संबंध, सुरक्षा, रोजगार आदी आघाड्यांवर भाजपा योग्य सुधारणा करेल. परंतु जागतिक स्तरावर भारताला सर्वोच्च स्थानी न्यायचे असल्यास २५ वर्षे हवीत, असे शहा भोपाळमध्ये म्हणाले होते.