शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

‘अच्छे दिन’ येण्यास निदान पंचवीस वर्षे !

By admin | Updated: July 15, 2015 00:06 IST

देशातील जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून केंद्रात सत्तेत आलेल्या भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अच्छे दिन यायला आणखी २५ वर्षे लागतील

नवी दिल्ली : देशातील जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून केंद्रात सत्तेत आलेल्या भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अच्छे दिन यायला आणखी २५ वर्षे लागतील असे सांगून घूमजाव केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. विरोधी पक्षाने भाजपावर जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप केला तर भाजपाने बचावात्मक पवित्रा घेत शहा यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा केला आहे. या निमित्ताने निवडणूक प्रचारातील बत्तिशी आता वचनपूर्तीच्या बाबतीत पंचविशीकडे झुकल्याची जाणीव झाली आहे.केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी मंगळवारी येथे विशेष पत्रपरिषदेत शहा यांच्या सोमवारच्या भाषणाची क्लिपिंगच दाखविली. हे भाषण भोपाळमधील पक्षाच्या बैठकीत देण्यात आले होते. शहा यांनी अच्छे दिनसंदर्भात २५ वर्षांचा उल्लेख केला नव्हता, हे त्यांना स्पष्ट करायचे होते. शहा यांचे भाषण खळबळजनक बनविण्यासाठीच त्यांचे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले असा आरोप भाजपाने केला. दुसरीकडे विरोधी पक्षांनीही या मुद्यावरून भाजपाला लगेच लक्ष्य केले. विश्वासघात आणि खोटी स्वप्ने दाखविणाऱ्या भाजपाला या देशातील जनता नक्कीच धडा शिकवेल, असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना केला. खोट्या आश्वासनांची त्सुनामी आणून भाजपाने धोका दिल्याचा त्यांचा आरोप होता. ‘शहा यांचे अच्छे दिन आले आहेत. त्यामुळे जनतेचे काहीही होवो, आता त्यांनी मजा केली पाहिजे’, अशी उपरोधिक टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंग यांनी टिष्ट्वटरवर केली.(लोकमत न्यूज नेटवर्क)काय म्हणाले होते शहा?देशात पुन्हा इंग्रज राजवटीपूर्वीचा काळ आणणे हेच खरे अच्छे दिनचे द्योतक आणि आश्वासन आहे. येत्या पाच वर्षात महागाई, परराष्ट्र संबंध, सुरक्षा, रोजगार आदी आघाड्यांवर भाजपा योग्य सुधारणा करेल. परंतु जागतिक स्तरावर भारताला सर्वोच्च स्थानी न्यायचे असल्यास २५ वर्षे हवीत, असे शहा भोपाळमध्ये म्हणाले होते.