शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

खादी ग्रामोद्योगची उलाढाल प्रथमच दीड लाख कोटी रुपयांवर; ‘मन की बात’मध्ये PM मोदींचा संवाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 06:31 IST

आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ च्या ११२ व्या भागात पंतप्रधान मोदी यांंनी जनतेला संबोधित केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : खादी ग्रामोद्योगची उलाढाल पहिल्यांदाच दीड लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे आणि खादी आणि हातमागाच्या वाढत्या विक्रीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी स्पष्ट केले. 

आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ च्या ११२ व्या भागात मोदी म्हणाले की, ज्यांनी पूर्वी कधीही खादी उत्पादने वापरली नाहीत, तेही आज मोठ्या अभिमानाने खादी वापरतात. देशवासीयांना खादीचे कपडे खरेदी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. भारताच्या ऑलिम्पिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले. गणित ऑलिम्पियाडमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आसामच्या ‘मोइदाम्स’चा समावेश केल्याबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केले.

‘भारत अमली पदार्थमुक्त करा’

अमली पदार्थांच्या सेवनाशी संबंधित काळजी व्यक्त केली. भारत अमली पदार्थमुक्त करण्याचे आवाहन मोदी यांनी केले. अमली पदार्थांच्या व्यसनाधीनांना मदत करण्यासाठी ‘मानस’ची हेल्पलाइन आणि पोर्टल काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले असून सरकारने १९३३ हा टोल फ्री क्रमांकही जारी केला आहे. 

विक्रीत ४०० टक्के वाढ

खादीची विक्री ४०० टक्के वाढली आहे. देशात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत आणि स्त्रिया याच्याशी सर्वाधिक जोडलेल्या असल्याने त्यांचा सर्वाधिक फायदाही होत आहे. लाेकांनी या वर्षापासूनच खादीचे कपडे खरेदी करायला सुरुवात करावी, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

सर्वाधिक वाघ भारतात असल्याचा अभिमान

जगातील ७० टक्के वाघ भारतात असल्याचे अधोरेखित करून ते म्हणाले की याचा आम्हाला अभिमान आहे. हर घर तिरंगा डॉट कॉम या वेबसाईटवर राष्ट्रध्वजासह सेल्फी अपलोड करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

 

टॅग्स :Man ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार