शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

म्हैस चोरण्याचा प्रयत्न; तिघांना ठेचून मारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 04:24 IST

म्हैस चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना जमावाने ठेचून मारल्याची घटना शुक्रवारी सारन जिल्ह्यात घडल्याने खळबळ उडाली आहे.

छपरा (बिहार) : म्हैस चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना जमावाने ठेचून मारल्याची घटना शुक्रवारी सारन जिल्ह्यात घडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, मृतांच्या कुटुंबियांनी आरोप फेटाळले आहेत. राजू नट, बिदेश नट व नौशाद कुरेशी, अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. बनियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी पहाटे घडलेल्या या घटनेत या तिघांनी एक म्हैस चोरण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप केला जात आहे. जमावाच्या मारहाणीत तिघांपैकी दोन जण जागीच मरण पावले, तर तिसरा रुग्णालयात नेताना गतप्राण झाला, अशी माहिती पोलीस अधीक्षक हर किशोर राय यांनी दिली. या प्रकरणात तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.रुग्णालयात तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेत असताना त्यांचे कुटुंबीय आक्रमक झाले होते. त्यामुळे त्यांना हटविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला व स्थिती नियंत्रणात आणली, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, भाकपाचे सरचिटणीस सत्यनारायण सिंग म्हणाले, बिहारमध्ये नितीशकुमार यांचे, तसेच केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार असताना जमावाकडून हत्या होण्याची ही आणखी एक घटना घडली आहे, या प्रकाराची न्यायालयीन चौकशी करावी. (वृत्तसंस्था)>बंदोबस्त वाढविलाया घटनेनंतर मृत्युमुखी पडलेल्यांचे कुटुंबीय व उर्वरित गावकऱ्यांमध्ये मोठा संघर्ष उफाळून आला. त्यामुळे पोलीस उपअधीक्षक अजयकुमार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आपण समजतो तशा प्रकारची ही घटना नाही. म्हैस चोरीवरून ही घटना घडली आहे.हल्लेखोर आणि ठार झालेले एकाच समुदायाचे आहेत. हल्लेखोरांना शोधले जाईल व कायदा हातात घेतल्याच्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला जाईल, असे अजयकुमार यांनी सांगितले. गावातील स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन्ही बाजंूचे लोक गुन्हा दाखल करण्यासाठी ठाण्यात दाखल झाले.