शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय- प्रकाश राज  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 09:54 IST

काही लोक आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. नव्या पिढीतील कलाकारांत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप प्रख्यात अभिनेते प्रकाश राज यांनी केला.

बंगळुरू : काही लोक आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. नव्या पिढीतील कलाकारांत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप प्रख्यात अभिनेते प्रकाश राज यांनी केला. येथे आयोजित करण्यात आलेल्या २२व्या आंतरराष्ट्रीय केरळ चित्रपट महोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ‘पद्मावती’ चित्रपटातील कलाकारांना मिळत असलेल्या धमक्या आणि नुकत्याच झालेल्या हत्येबद्दल त्यांनी राजस्थान सरकारवर टीका केली.

प्रकाश राज म्हणाले की, मी राजकारणी नाही. एक कलाकार म्हणून मी बोलत आहे, आवाज उठवित आहे. बोलणे ही आपली जबाबदारी आहे, असे मला वाटते. चित्रपट कलाकार हे आपल्या गुणवत्तेमुळे मोठे झालेले नाहीत. समाजाकडून मिळालेल्या प्रेमामुळे आपण आहोत. समाजाचे ऋण फेडण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. समाजाचा आवाज बनून आपण ही जबाबदारी पार पाडली पाहिजे.प्रकाश राज यांनी सांगितले की, जेव्हा कलाकार, सृजक आणि निर्मितीक्षम लोक भित्रे बनतात, तेव्हा आपण संपूर्ण समाजच भित्रा होतो, हे समजून घ्यायला हवे. राजस्थानात कोणाची हत्या होत असेल, कलाकारांना नाक कापण्याच्या शीर कापण्याच्या धमक्या मिळत असतील, तर समाजात काय पद्धतीने दहशत निर्माण केली जात आहे, हे लक्षात घ्यायला हवे.  

धमक्या देणा-यांवर मी हसतोप्रकाश राज यांनी सांगितले की, काही गटांचे लोक मला धमकावत आहेत. मात्र, मी त्यांच्यावर हसतो. ते मला गप्प बसविण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा मी गाणे गातो. मला कोणत्याही राजकीय पक्षाच्या समर्थनाची गरज नाही, कारण मी लोकांत उभा आहे. तुम्ही माझ्याबाबतीत जे काही कराल, तेव्हा लोक पाहतीलच. माझ्यावर आघात कराल, तर ते लोकांना कळेलच.

टॅग्स :Indiaभारत