शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

दार्जिलिंगमधील स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करा -कोलकाता हायकोर्ट

By admin | Updated: June 16, 2017 19:19 IST

दार्जिलिंगमध्ये बिघडलेल्या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करा असे आदेश कोलकाता हायकोर्टाने पश्चिम बंगाल सरकारला दिले आहेत.

लोकमत ऑनलाइन
कोलकाता, दि.16- गेले चार दिवस दार्जिलिंगमध्ये बिघडलेल्या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करा असे आदेश कोलकाता हायकोर्टाने पश्चिम बंगाल सरकारला दिले आहेत. गोरखा जनमुक्ती मोर्चाने चालवलेल्या गोरखालॅंड आंदोलनामुळे दार्जिलिंगमधील जनजीवन ठप्प झाले आहे, या पार्श्वभूमीवर काळजीवाहू प्रभारी मुख्य न्यायाधीश निशिता म्हात्रे आणि न्यायाधीश टी. चक्रवर्ती यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत.
एका याचिकेवर सूचना देताना न्यायाधीशांनी पश्चिम बंगाल सरकारला दार्जिलिंगमधील परिस्थितीवर दोन आठवड्यांमध्ये अहवाल देण्यास सांगितले. गोरखालॅंडच्या या मागणीमुळे सरकारी  आणि खासगी मालमत्तेचे किती नुकसान झाले याचीही माहिती देण्यास न्यायालयाने यावेळेस सांगितले. याचिकाकर्ते रामप्रसाद सरकार यांनी या याचिकेत गोरखा जनमुक्ती मोर्चाचे अध्यक्ष बिमल गुरुंग, सरचिटणीस रोशन गिरी यांना प्रतिवादी केले आहे. 9 जूनपासून दार्जिलिंगमध्ये अशांतता पसरली आहे.
 
दार्जिलिंगपासून 50 किमी अंतरावरील मिरिक येथील ग्रामपंचायतीचे कार्यालयही आंदोलकांनी पेटवून दिले. या आंदोलनामुळे पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. हॉटेल, शाळा, विद्यालये त्याचप्रमाणे बॅंका, एटीएम केंद्रेही बंद झाली आहेत. गुरुवारी रात्री पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त केली असून सहा लोकांना अटकही केली आहे. आंदोलन सुरु झाल्यावर दार्जिलिंगमध्ये  राहायचं असेल तर तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर राहा असा इशारा गोरखा जनमुक्ती मोर्चाने पर्यटकांना दिला होता . गोरखा जनमुक्तीचे अध्यक्ष बिमल गुरुंग यांनी याबाबत बोलताना सांगितले होते, "इथली स्थिती अधिकाधिक वाईट होत चालली आहे,  येथे काहीही घडू शकते. त्यामुळे पर्यटकांनी दार्जिलिंग सोडावे असे माझे  सांगणे आहे, तरिही ते येथे राहणार असतील त्यांनी स्वतःच्याच जबाबदारीवर राहावे."