शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
2
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
3
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
4
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
5
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
6
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
7
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
8
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
9
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
10
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
11
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
12
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
13
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
14
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
15
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
16
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
17
Mumbai: नवरात्री दांडिया कार्यक्रमात राडा, जमावाकडून तरुणाला मारहाण, गोरेगाव येथील घटना!
18
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
19
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!

दार्जिलिंगमधील स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करा -कोलकाता हायकोर्ट

By admin | Updated: June 16, 2017 19:19 IST

दार्जिलिंगमध्ये बिघडलेल्या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करा असे आदेश कोलकाता हायकोर्टाने पश्चिम बंगाल सरकारला दिले आहेत.

लोकमत ऑनलाइन
कोलकाता, दि.16- गेले चार दिवस दार्जिलिंगमध्ये बिघडलेल्या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करा असे आदेश कोलकाता हायकोर्टाने पश्चिम बंगाल सरकारला दिले आहेत. गोरखा जनमुक्ती मोर्चाने चालवलेल्या गोरखालॅंड आंदोलनामुळे दार्जिलिंगमधील जनजीवन ठप्प झाले आहे, या पार्श्वभूमीवर काळजीवाहू प्रभारी मुख्य न्यायाधीश निशिता म्हात्रे आणि न्यायाधीश टी. चक्रवर्ती यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत.
एका याचिकेवर सूचना देताना न्यायाधीशांनी पश्चिम बंगाल सरकारला दार्जिलिंगमधील परिस्थितीवर दोन आठवड्यांमध्ये अहवाल देण्यास सांगितले. गोरखालॅंडच्या या मागणीमुळे सरकारी  आणि खासगी मालमत्तेचे किती नुकसान झाले याचीही माहिती देण्यास न्यायालयाने यावेळेस सांगितले. याचिकाकर्ते रामप्रसाद सरकार यांनी या याचिकेत गोरखा जनमुक्ती मोर्चाचे अध्यक्ष बिमल गुरुंग, सरचिटणीस रोशन गिरी यांना प्रतिवादी केले आहे. 9 जूनपासून दार्जिलिंगमध्ये अशांतता पसरली आहे.
 
दार्जिलिंगपासून 50 किमी अंतरावरील मिरिक येथील ग्रामपंचायतीचे कार्यालयही आंदोलकांनी पेटवून दिले. या आंदोलनामुळे पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. हॉटेल, शाळा, विद्यालये त्याचप्रमाणे बॅंका, एटीएम केंद्रेही बंद झाली आहेत. गुरुवारी रात्री पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त केली असून सहा लोकांना अटकही केली आहे. आंदोलन सुरु झाल्यावर दार्जिलिंगमध्ये  राहायचं असेल तर तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर राहा असा इशारा गोरखा जनमुक्ती मोर्चाने पर्यटकांना दिला होता . गोरखा जनमुक्तीचे अध्यक्ष बिमल गुरुंग यांनी याबाबत बोलताना सांगितले होते, "इथली स्थिती अधिकाधिक वाईट होत चालली आहे,  येथे काहीही घडू शकते. त्यामुळे पर्यटकांनी दार्जिलिंग सोडावे असे माझे  सांगणे आहे, तरिही ते येथे राहणार असतील त्यांनी स्वतःच्याच जबाबदारीवर राहावे."