शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

विविधतेचा सन्मान करू तेव्हाच खरी लोकशाही अवतरेल, सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 06:23 IST

Chief Justice N. V. Ramana : स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमात सरन्यायाधीश बोलत होते.

नवी दिल्ली : घटना समितीने सखोल विचाराअंती राज्यघटनेची निर्मिती केली आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. मात्र, आपण जेव्हा देशातील विविधतेतील एकात्मतेचा सन्मान करू तेव्हाच ही व्यवस्था खऱ्या अर्थाने लोकांची होईल, असे प्रतिपादन सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी सोमवारी येथे केले.

स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमात सरन्यायाधीश बोलत होते. रमणा पुढे म्हणाले की, फक्त वसाहतवादापासून मुक्तता मिळावी यासाठी स्वातंत्र्यलढा लढला गेला नाही. लोकशाहीची स्थापना व्हावी, सर्वांना सन्मानाने जगता यावे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे मुख्य उद्दिष्ट होते. राज्यघटनेच्या माध्यमातूनच लोकशाहीचा पाया रचण्याचे काम झाले.

रमणा यांनी भाषणामध्ये महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, लाला लजपतराय, सैफुद्दिन किचलू आणि पी. व्ही. राजमन्नर  स्वातंत्र्यसैनिकांचा उल्लेख केला. असंख्य ज्ञात आणि अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या प्रदीर्घ लढ्यामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याचेही सरन्यायाधीशांनी नमूद केले. वकिलांनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या योगदानाचाही उल्लेख रमणा यांनी यावेळी केला. अनेक वकिलांनी घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी आपले योगदान दिल्याचे ते म्हणाले.

फक्त वसाहतवादापासून मुक्तता मिळावी यासाठी स्वातंत्र्यलढा लढला गेला नाही. लोकशाहीची स्थापना व्हावी, सर्वांना सन्मानाने जगता यावे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे मुख्य उद्दिष्ट होते. - ­एन. व्ही. रमणा, सरन्यायाधीश

टॅग्स :N V Ramanaएन. व्ही. रमणाIndependence Dayस्वातंत्र्य दिन