शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

विविधतेचा सन्मान करू तेव्हाच खरी लोकशाही अवतरेल, सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 06:23 IST

Chief Justice N. V. Ramana : स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमात सरन्यायाधीश बोलत होते.

नवी दिल्ली : घटना समितीने सखोल विचाराअंती राज्यघटनेची निर्मिती केली आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. मात्र, आपण जेव्हा देशातील विविधतेतील एकात्मतेचा सन्मान करू तेव्हाच ही व्यवस्था खऱ्या अर्थाने लोकांची होईल, असे प्रतिपादन सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी सोमवारी येथे केले.

स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमात सरन्यायाधीश बोलत होते. रमणा पुढे म्हणाले की, फक्त वसाहतवादापासून मुक्तता मिळावी यासाठी स्वातंत्र्यलढा लढला गेला नाही. लोकशाहीची स्थापना व्हावी, सर्वांना सन्मानाने जगता यावे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे मुख्य उद्दिष्ट होते. राज्यघटनेच्या माध्यमातूनच लोकशाहीचा पाया रचण्याचे काम झाले.

रमणा यांनी भाषणामध्ये महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, लाला लजपतराय, सैफुद्दिन किचलू आणि पी. व्ही. राजमन्नर  स्वातंत्र्यसैनिकांचा उल्लेख केला. असंख्य ज्ञात आणि अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या प्रदीर्घ लढ्यामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याचेही सरन्यायाधीशांनी नमूद केले. वकिलांनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या योगदानाचाही उल्लेख रमणा यांनी यावेळी केला. अनेक वकिलांनी घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी आपले योगदान दिल्याचे ते म्हणाले.

फक्त वसाहतवादापासून मुक्तता मिळावी यासाठी स्वातंत्र्यलढा लढला गेला नाही. लोकशाहीची स्थापना व्हावी, सर्वांना सन्मानाने जगता यावे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे मुख्य उद्दिष्ट होते. - ­एन. व्ही. रमणा, सरन्यायाधीश

टॅग्स :N V Ramanaएन. व्ही. रमणाIndependence Dayस्वातंत्र्य दिन