शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

विविधतेचा सन्मान करू तेव्हाच खरी लोकशाही अवतरेल, सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 06:23 IST

Chief Justice N. V. Ramana : स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमात सरन्यायाधीश बोलत होते.

नवी दिल्ली : घटना समितीने सखोल विचाराअंती राज्यघटनेची निर्मिती केली आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. मात्र, आपण जेव्हा देशातील विविधतेतील एकात्मतेचा सन्मान करू तेव्हाच ही व्यवस्था खऱ्या अर्थाने लोकांची होईल, असे प्रतिपादन सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी सोमवारी येथे केले.

स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमात सरन्यायाधीश बोलत होते. रमणा पुढे म्हणाले की, फक्त वसाहतवादापासून मुक्तता मिळावी यासाठी स्वातंत्र्यलढा लढला गेला नाही. लोकशाहीची स्थापना व्हावी, सर्वांना सन्मानाने जगता यावे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे मुख्य उद्दिष्ट होते. राज्यघटनेच्या माध्यमातूनच लोकशाहीचा पाया रचण्याचे काम झाले.

रमणा यांनी भाषणामध्ये महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, लाला लजपतराय, सैफुद्दिन किचलू आणि पी. व्ही. राजमन्नर  स्वातंत्र्यसैनिकांचा उल्लेख केला. असंख्य ज्ञात आणि अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या प्रदीर्घ लढ्यामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याचेही सरन्यायाधीशांनी नमूद केले. वकिलांनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या योगदानाचाही उल्लेख रमणा यांनी यावेळी केला. अनेक वकिलांनी घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी आपले योगदान दिल्याचे ते म्हणाले.

फक्त वसाहतवादापासून मुक्तता मिळावी यासाठी स्वातंत्र्यलढा लढला गेला नाही. लोकशाहीची स्थापना व्हावी, सर्वांना सन्मानाने जगता यावे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे मुख्य उद्दिष्ट होते. - ­एन. व्ही. रमणा, सरन्यायाधीश

टॅग्स :N V Ramanaएन. व्ही. रमणाIndependence Dayस्वातंत्र्य दिन