शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

घारापुरी बेटाला समस्यांचा विळखा

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

मधुकर ठाकूर : उरण - जगभरात घारापुरी बेटावरील लेण्या प्रसिद्ध असल्या तरी रहिवाशांना भेडसावणार्‍या अनेक समस्यांमुळे मात्र बेट कायम दुर्लक्षित राहिले आहे. वीज, पाणी, आरोग्य आणि इतर समस्या सोडविण्याकडे स्थानिक प्र्रतिनिधींपासून आमदार, खासदार आणि प्रामुख्याने केंद्र, राज्य सरकारकडूनही अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने रहिवाशांच्या समस्या सुटण्याऐवजी आणखीनच जटील बनत आहेत.

मधुकर ठाकूर : उरण - जगभरात घारापुरी बेटावरील लेण्या प्रसिद्ध असल्या तरी रहिवाशांना भेडसावणार्‍या अनेक समस्यांमुळे मात्र बेट कायम दुर्लक्षित राहिले आहे. वीज, पाणी, आरोग्य आणि इतर समस्या सोडविण्याकडे स्थानिक प्र्रतिनिधींपासून आमदार, खासदार आणि प्रामुख्याने केंद्र, राज्य सरकारकडूनही अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने रहिवाशांच्या समस्या सुटण्याऐवजी आणखीनच जटील बनत आहेत.
रायगड जिल्ह्याच्या अखत्यारित असलेल्या दुर्लक्षित बेटाकडे विकासाची बोंब आहे. बेटावरील रहिवासी कायमस्वरूपी विजेअभावी अद्यापही अंधारातच चाचपडत आहेत. पर्यटक आणि बेटावरील तिन्ही गावातील रहिवाशांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी धरण बांधले. मात्र धरणात पावसाळ्याव्यतिरिक्त पाणीच शिल्लक राहत नाही. धरण दुरुस्तीसाठी चार कोटी खर्च झाले मात्र नियोजनाअभावी हा निधी पाण्यात गेला.
राजबंदर जे˜ीच्या लेण्यांकडे जाणारा ४० वर्षापूर्वी बांधलेला सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याची दयनीय अवस्था असून या रस्त्याला मोठमोठे तडे गेले आहेत. तर दुरुस्तीअभावी रस्त्यांचे कठडे ढासळले आहेत. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून रस्ते झाले. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे साडेचार कोटी खर्चाचे काम निरुपयोगी ठरले . जेएनपीटी बंदराच्या उभारणीमुळे विकासाच्या नावाखाली होत असलेल्या दगड मातीच्या भरावामुळे किनारपट्टीची धूप झाली आहे.
घारापुरी बेटवासियांना लागलेले समस्यांचे ग्रहण सुटावे, अशी रहिवाशांची इच्छा आहे. त्यासाठी केंद्र, राज्य सरकारकडे आमदार खासदारांनी संयुक्तपणे प्रयत्न करावेत अशी मागणी शिवसेनेचे घारापुरी ग्रा. पं. सदस्य तथा उपविभाग प्रमुख बळीराम ठाकूर यांनी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि मनोहर भोईर यांना निवेदनाद्वारे केली आहे. येथील महिला बचत गट, आर्थिक सदृढ बनविण्यासाठी योजना राबविण्यात याव्यात आणि पर्यटकांसाठी आणि त्यावर आधारी लघुउद्योगांसाठी मरीन मेरीटाईम बोर्ड, एमएमआरडीए, जेएनपीटी, ओएनजीसी यांच्याकडून शासनाच्या माध्यमातून बेटांच्या विकास कामांसाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही ठाकूर यांनी केले आहे.
-----------------


चौकट
पायाभूत सुविधांचा विकास आवश्यक
न्हावा शेवा समुद्रामार्गे येणार्‍या मोरावासियांसाठी जे˜ी बांधणे, तिन्ही गावात ड्रेनेजची व्यवस्था करणे, सागरी धूप संरक्षक कठडे बांधणे, राजबंदर येथे पर्यटकांसाठी शौचालय , व्यायाम शाळा, समाजमंदिर, बेटावरील बेरोजगारांसाठी परिसरातील विविध कंपन्या, प्रकल्पात प्राधान्य आदी पायाभूत सुविधांचा विकास करणे आवश्यक आहे.
------
१) घारापुरी बेटावर प्राचीन, अद्भुत, अप्रतिम कोरीव लेण्या आहेत. काळ्या पाषाणातील कोरीव लेण्यांमुळे घारापुरी लेण्यांचा वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेश
२) दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक या ठिकाणी भेट देतात. पर्यटक ांमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला असला, तरी उत्पन्न फारच कमी आहे.
३) त्यामुळे बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर या तिन्ही गावातील रहिवाशांना विशेषत: युवकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे.
----------