शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

घारापुरी बेटाला समस्यांचा विळखा

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

मधुकर ठाकूर : उरण - जगभरात घारापुरी बेटावरील लेण्या प्रसिद्ध असल्या तरी रहिवाशांना भेडसावणार्‍या अनेक समस्यांमुळे मात्र बेट कायम दुर्लक्षित राहिले आहे. वीज, पाणी, आरोग्य आणि इतर समस्या सोडविण्याकडे स्थानिक प्र्रतिनिधींपासून आमदार, खासदार आणि प्रामुख्याने केंद्र, राज्य सरकारकडूनही अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने रहिवाशांच्या समस्या सुटण्याऐवजी आणखीनच जटील बनत आहेत.

मधुकर ठाकूर : उरण - जगभरात घारापुरी बेटावरील लेण्या प्रसिद्ध असल्या तरी रहिवाशांना भेडसावणार्‍या अनेक समस्यांमुळे मात्र बेट कायम दुर्लक्षित राहिले आहे. वीज, पाणी, आरोग्य आणि इतर समस्या सोडविण्याकडे स्थानिक प्र्रतिनिधींपासून आमदार, खासदार आणि प्रामुख्याने केंद्र, राज्य सरकारकडूनही अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने रहिवाशांच्या समस्या सुटण्याऐवजी आणखीनच जटील बनत आहेत.
रायगड जिल्ह्याच्या अखत्यारित असलेल्या दुर्लक्षित बेटाकडे विकासाची बोंब आहे. बेटावरील रहिवासी कायमस्वरूपी विजेअभावी अद्यापही अंधारातच चाचपडत आहेत. पर्यटक आणि बेटावरील तिन्ही गावातील रहिवाशांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी धरण बांधले. मात्र धरणात पावसाळ्याव्यतिरिक्त पाणीच शिल्लक राहत नाही. धरण दुरुस्तीसाठी चार कोटी खर्च झाले मात्र नियोजनाअभावी हा निधी पाण्यात गेला.
राजबंदर जे˜ीच्या लेण्यांकडे जाणारा ४० वर्षापूर्वी बांधलेला सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याची दयनीय अवस्था असून या रस्त्याला मोठमोठे तडे गेले आहेत. तर दुरुस्तीअभावी रस्त्यांचे कठडे ढासळले आहेत. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून रस्ते झाले. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे साडेचार कोटी खर्चाचे काम निरुपयोगी ठरले . जेएनपीटी बंदराच्या उभारणीमुळे विकासाच्या नावाखाली होत असलेल्या दगड मातीच्या भरावामुळे किनारपट्टीची धूप झाली आहे.
घारापुरी बेटवासियांना लागलेले समस्यांचे ग्रहण सुटावे, अशी रहिवाशांची इच्छा आहे. त्यासाठी केंद्र, राज्य सरकारकडे आमदार खासदारांनी संयुक्तपणे प्रयत्न करावेत अशी मागणी शिवसेनेचे घारापुरी ग्रा. पं. सदस्य तथा उपविभाग प्रमुख बळीराम ठाकूर यांनी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि मनोहर भोईर यांना निवेदनाद्वारे केली आहे. येथील महिला बचत गट, आर्थिक सदृढ बनविण्यासाठी योजना राबविण्यात याव्यात आणि पर्यटकांसाठी आणि त्यावर आधारी लघुउद्योगांसाठी मरीन मेरीटाईम बोर्ड, एमएमआरडीए, जेएनपीटी, ओएनजीसी यांच्याकडून शासनाच्या माध्यमातून बेटांच्या विकास कामांसाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही ठाकूर यांनी केले आहे.
-----------------


चौकट
पायाभूत सुविधांचा विकास आवश्यक
न्हावा शेवा समुद्रामार्गे येणार्‍या मोरावासियांसाठी जे˜ी बांधणे, तिन्ही गावात ड्रेनेजची व्यवस्था करणे, सागरी धूप संरक्षक कठडे बांधणे, राजबंदर येथे पर्यटकांसाठी शौचालय , व्यायाम शाळा, समाजमंदिर, बेटावरील बेरोजगारांसाठी परिसरातील विविध कंपन्या, प्रकल्पात प्राधान्य आदी पायाभूत सुविधांचा विकास करणे आवश्यक आहे.
------
१) घारापुरी बेटावर प्राचीन, अद्भुत, अप्रतिम कोरीव लेण्या आहेत. काळ्या पाषाणातील कोरीव लेण्यांमुळे घारापुरी लेण्यांचा वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेश
२) दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक या ठिकाणी भेट देतात. पर्यटक ांमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला असला, तरी उत्पन्न फारच कमी आहे.
३) त्यामुळे बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर या तिन्ही गावातील रहिवाशांना विशेषत: युवकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे.
----------