शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

घारापुरी बेटाला समस्यांचा विळखा

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

मधुकर ठाकूर : उरण - जगभरात घारापुरी बेटावरील लेण्या प्रसिद्ध असल्या तरी रहिवाशांना भेडसावणार्‍या अनेक समस्यांमुळे मात्र बेट कायम दुर्लक्षित राहिले आहे. वीज, पाणी, आरोग्य आणि इतर समस्या सोडविण्याकडे स्थानिक प्र्रतिनिधींपासून आमदार, खासदार आणि प्रामुख्याने केंद्र, राज्य सरकारकडूनही अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने रहिवाशांच्या समस्या सुटण्याऐवजी आणखीनच जटील बनत आहेत.

मधुकर ठाकूर : उरण - जगभरात घारापुरी बेटावरील लेण्या प्रसिद्ध असल्या तरी रहिवाशांना भेडसावणार्‍या अनेक समस्यांमुळे मात्र बेट कायम दुर्लक्षित राहिले आहे. वीज, पाणी, आरोग्य आणि इतर समस्या सोडविण्याकडे स्थानिक प्र्रतिनिधींपासून आमदार, खासदार आणि प्रामुख्याने केंद्र, राज्य सरकारकडूनही अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने रहिवाशांच्या समस्या सुटण्याऐवजी आणखीनच जटील बनत आहेत.
रायगड जिल्ह्याच्या अखत्यारित असलेल्या दुर्लक्षित बेटाकडे विकासाची बोंब आहे. बेटावरील रहिवासी कायमस्वरूपी विजेअभावी अद्यापही अंधारातच चाचपडत आहेत. पर्यटक आणि बेटावरील तिन्ही गावातील रहिवाशांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी धरण बांधले. मात्र धरणात पावसाळ्याव्यतिरिक्त पाणीच शिल्लक राहत नाही. धरण दुरुस्तीसाठी चार कोटी खर्च झाले मात्र नियोजनाअभावी हा निधी पाण्यात गेला.
राजबंदर जे˜ीच्या लेण्यांकडे जाणारा ४० वर्षापूर्वी बांधलेला सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याची दयनीय अवस्था असून या रस्त्याला मोठमोठे तडे गेले आहेत. तर दुरुस्तीअभावी रस्त्यांचे कठडे ढासळले आहेत. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून रस्ते झाले. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे साडेचार कोटी खर्चाचे काम निरुपयोगी ठरले . जेएनपीटी बंदराच्या उभारणीमुळे विकासाच्या नावाखाली होत असलेल्या दगड मातीच्या भरावामुळे किनारपट्टीची धूप झाली आहे.
घारापुरी बेटवासियांना लागलेले समस्यांचे ग्रहण सुटावे, अशी रहिवाशांची इच्छा आहे. त्यासाठी केंद्र, राज्य सरकारकडे आमदार खासदारांनी संयुक्तपणे प्रयत्न करावेत अशी मागणी शिवसेनेचे घारापुरी ग्रा. पं. सदस्य तथा उपविभाग प्रमुख बळीराम ठाकूर यांनी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि मनोहर भोईर यांना निवेदनाद्वारे केली आहे. येथील महिला बचत गट, आर्थिक सदृढ बनविण्यासाठी योजना राबविण्यात याव्यात आणि पर्यटकांसाठी आणि त्यावर आधारी लघुउद्योगांसाठी मरीन मेरीटाईम बोर्ड, एमएमआरडीए, जेएनपीटी, ओएनजीसी यांच्याकडून शासनाच्या माध्यमातून बेटांच्या विकास कामांसाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही ठाकूर यांनी केले आहे.
-----------------


चौकट
पायाभूत सुविधांचा विकास आवश्यक
न्हावा शेवा समुद्रामार्गे येणार्‍या मोरावासियांसाठी जे˜ी बांधणे, तिन्ही गावात ड्रेनेजची व्यवस्था करणे, सागरी धूप संरक्षक कठडे बांधणे, राजबंदर येथे पर्यटकांसाठी शौचालय , व्यायाम शाळा, समाजमंदिर, बेटावरील बेरोजगारांसाठी परिसरातील विविध कंपन्या, प्रकल्पात प्राधान्य आदी पायाभूत सुविधांचा विकास करणे आवश्यक आहे.
------
१) घारापुरी बेटावर प्राचीन, अद्भुत, अप्रतिम कोरीव लेण्या आहेत. काळ्या पाषाणातील कोरीव लेण्यांमुळे घारापुरी लेण्यांचा वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेश
२) दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक या ठिकाणी भेट देतात. पर्यटक ांमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला असला, तरी उत्पन्न फारच कमी आहे.
३) त्यामुळे बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर या तिन्ही गावातील रहिवाशांना विशेषत: युवकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे.
----------