शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

सपा सदस्यांचा राज्यसभेत गोंधळ

By admin | Updated: August 12, 2016 03:10 IST

उत्तर प्रदेशातील विविध योजनांसाठी केंद्र सरकारकडून पुरेसा निधी दिला जात नाही. केंद्र सरकार उत्तर प्रदेशच्या बाबतीत भेदभाव करीत आहे

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील विविध योजनांसाठी केंद्र सरकारकडून पुरेसा निधी दिला जात नाही. केंद्र सरकार उत्तर प्रदेशच्या बाबतीत भेदभाव करीत आहे, असा आरोप करीत गुरुवारी राज्यसभेत सपाच्या सदस्यांनी प्रचंड गदारोळ केला. सभागृहाचे कामकाज त्यामुळे प्रथम तीनदा आणि नंतर दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. राज्यसभेचे कामकाज सुरू होताच सपा सदस्यांनी आरोप केला की, उत्तर प्रदेशच्याबाबतीत भेदभाव केला जात आहे. सपाचे नेते रामगोपाल यादव म्हणाले की, याबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव व मंत्री यांनी अनेकदा पत्र लिहिले की, केंद्राकडून राज्याला त्यांचा वाटा दिला जावा; पण राज्याला ही रक्कम मिळत नाही. सर्वशिक्षा अभियान, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती आणि अन्य मागासवर्गांच्या विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती, उच्चशिक्षण, रस्ते विकास योजना आदी अनेक योजना निधीअभावी ठप्प आहेत.सपाचे नेते रामगोपाल यादव म्हणाले केंद्र सरकारने दोन दिवसांत उत्तर प्रदेशला निधी देण्याचे आश्वासन द्यावे; अन्यथा सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही. याचवेळी सपाचे सदस्य समोरच्या रांगेत येऊन घोषणाबाजी करू लागले. सततच्या गोंधळामुळे कामकाज तीन वेळा स्थगित करण्याची वेळ उपसभापतींवर आली. (लोकमत न्यूज नेटवर्क)