शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

नऊ गावांत तिरंगी; ७७ ठिकाणी दुरंगी...

By admin | Updated: July 28, 2015 00:32 IST

कऱ्हाड तालुका निवडणूक धुमशान : पाच ग्रामपंचायतींचा बिनविरोधचा झेंडा; ९५३ जागांसाठी १ हजार ९८६ उमेदवार रिंगणात

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचे धुमशान सुरू आहे. ९८ पैकी पाच ग्रामपंचायतींने बिनविरोधचा झेंडा फडकविल्याने आता ९३ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष ४ आॅगस्टला मतदान होत आहे. पैकी नऊ गावांत तिरंगी तर ७७ गावांत दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, आणखी सात ग्रामपंचायती अंशत: बिनविरोधच्या उंबरठ्यावरती आहेत.शेवाळवाडी-उंडाळे, भुयाचीवाडी, भोळेवाडी, भरेवाडी, पाचुंद या ग्रामपंचायती ग्रामस्थांनी एकत्रित येऊन बिनविरोध केल्या आहेत. उर्वरित ९३ ग्रामपंचायतींत बनवडी, खोडजाईवाडी, खालकरवाडी, म्हारुगडेवाडी, शिंदेवाडी, लटकेवाडी, भैरवानाथनगर-काले या ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्या आहेत.निवडणूक होत असलेल्या गावांपैकी पाल, हजारमाची, विंग, वहागाव, सैदापूर, गोवारे, बेलवडे हवेली, मालखेड, म्होप्रे येथे तिरंगी लढत होत आहे, तर ओंड, गोळेश्वर, वारुंजी, निगडी, खराडे, रिसवड, खोडजाईवाडी, खालकरवाडी, म्हारूगडेवाडी, साळशिरंबे, शिंदेवाडी-विंग, तासवडे, भैरवनाथनगर,लटकेवाडी, मालखेड, कालवडे, वाठार, बेलवडे बुद्रुक, वडगाव-उंब्रज, मरळी, पेरले, कोळे, पोतले, पार्ले, वडोली निळेश्वर, कार्वे, घोणशी, घारेवाडी, खोडशी, गोटे, म्होप्रे, घोगाव, टाळगाव, केसे, अभयचीवाडी, किरपे, काले, बेलदरे, मौजे साकुर्डी, वस्ती साकुर्डी, विरवडे, करवडी, बनवडी, शिरवडे, येरवळे, चचेगाव, खुबी, कोडोली, सवादे, शेवाळेवाडी-म्हासोली, शिवडे, वराडे, भवानवाडी, अंबवडे, बामणवाडी, मुंढे, शहापूर, नवीन कवठे, उंडाळे, म्हासोली, चिखली, हजारमाची, वाघेरी, नांदलापूर, गोळेश्वर, सुर्ली, कामथी, हणबरवाडी, गायकवाडवाडी, धोंडेवाडी, नांदगाव, गमेवाडी, साजूर, गोटेवाडी, हरपळवाडी, इंदोली, चोरे, जिंती, अकाईचीवाडी, कोणेगाव, वाघेश्वर, शेणोली, येणके, पाडळी-केसे, वसंतगड, येथे दुरंगी लढत होत आहे.तालुक्यातील तारुख ग्रामपंचायतीच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी दोघेजण रिंगणात उतरले आहेत.ज्या गावांमध्ये सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामध्ये सत्तासंघर्ष मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत आहे. तालुक्यातील राजकारणाच्या बदलत्या समीकरणांचा गावोगावच्या निवडणुकींवर प्रभाव पडलेला दिसून येत आहे. अनेक गावांत पक्षीय झेंडे, गटतट यापेक्षा भावकी, बुडका याचे राजकारण सुरू झाले आहे.तालुक्यात ‘यंदा सरपंच आमचाच’ या इर्र्षेेला पेटून गावोगावचे नेते, कार्यकर्ते झाडून कामाला लागले आहेत. त्यामुळे आता गुलाल कोण घेणार? याच्या पैजाही लावल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीची निवडणूक होत असलेल्या ठिकाणी राजकीय वातावरण तापले आहे. (प्रतिनिधी)चौकाचौकांत झळकतायत फलक !ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारास आता प्रारंभ झाला आहे. गावागावांतील मुख्य चौकासह रस्त्याकडेला निवडणुकीत उभे राहिलेल्या उमेदवारांचे व पॅनेल प्रमुखांचे फोटो व चिन्हाचे रंगीत फलक लावण्यात आले आहेत.कार्यकर्त्यांकडून ‘हायटेक’ प्रचारग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी काहीजण नामीशक्कल लढवित आहेत. उमेदवारांचे जाहीरनामे, निवडणूक चिन्हाचे, घोषवाक्यांनी तयार केलेल्या घोषणा या व्हाट्सअ‍ॅप, फेसबुकवर टाकत हायटेक प्रचार केला जात आहे.