शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बाबो! महिन्याभरापासून बेपत्ता होता तरुण, घरच्यांना वाटलं मृत्यू; पण श्राद्धाच्या दिवशीच 'तो' परत आला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 13:07 IST

गेल्या एक महिन्यापासून बेपत्ता होता. यानंतर पोलिसांनी आकाश सरकारच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून मृतदेह मिळाल्याची माहिती दिली.

नवी दिल्ली - त्रिपुरा राज्यातील एक 22 वर्षीय तरुण घरातून अचानक बेपत्ता झाला होता. मात्र, एका महिन्याने तो जेव्हा घरी परतला. यावेळी त्याने जे पाहिले, त्यामुळे त्याला मोठाच धक्काच बसला. तो जेव्हा घरी आला तेव्हा चक्क त्याचं श्राद्ध घातलं जात असल्याची तयारी सुरू असल्याचं त्याला दिसलं आणि तो हादरला. त्रिपुरा जिल्ह्याच्या कालीबाजार परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी एकीकडे तरुणाच्या नातेवाईकांना आनंद होत आहे. तेच दुसरीकडे ते पोलिसांबद्दल रागही व्यक्त करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, मोहनपूर उपविभागाच्या कालीबाजार येथीर रहिवासी आकाश सरकार मागील एक महिन्यापासून गायब होता. 3 जून रोजी पश्चिम आगरतळा पोलीस स्टेशन अंतर्गत मेलरमठ जवळील तलावात एक मृतदेह तरंगताना आढळला होता. प्राथमिक तपासात मृत कालीबाजार येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. तसेच तो गेल्या एक महिन्यापासून बेपत्ता होता. यानंतर पोलिसांनी आकाश सरकारच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून मृतदेह मिळाल्याची माहिती दिली.

मोहनपूरचे उपविभागीय अधिकारी के. बी. मुजुमदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आकाशचे वडील प्रणव सरकार जीबीपी हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि त्यांची बॅग, पँट आणि टॅब पाहून त्यांनी त्यांच्या मुलाचा मृतदेह ओळखला." शवविच्छेदनानंतर मृतदेह प्रणव सरकार यांच्याकडे सोपवण्यात आला आणि कुटुंबीयांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. "हे चुकीच्या ओळखीचे प्रकरण असल्याने, आम्ही तपास करू आणि जे काही आवश्यक असेल ते करू", असेही पोलीस म्हणाले आहेत.

पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी दबाव टाकल्याचे तरुणाच्या वडिलांचे म्हणणे आहे. तरुणाच्या वडिलांनी सांगितले की, "मी पोलिसांना वारंवार सांगितले की, तलावातून सापडलेला मृतदेह माझ्या बेपत्ता मुलासारखा दिसत नाही. मात्र, पाण्यात बुडल्याने मृतदेह फुगला, असा दावा पोलिसांनी केला. मात्र, पिशवीत सापडलेली टॅबलेट आणि पॅन्ट माझ्या मुलाची आहे, पण तो इतका फिट नाही" असे देखील त्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले होते. 

आकाशने दिलेल्या माहितीनुसार, "तो बटाला पुलाजवळ राहत होता आणि नुकताच तो त्याच्या एका बहिणीला भेटायला गेला होता. "आज तिने फोन केला आणि मी घरी परतल्यावर माझे श्राद्ध होत आहे, हे पाहून मला आश्चर्य वाटले" असं सांगितलं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.