शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

तृणमूल संसदेत सरकारला घेरणार

By admin | Updated: December 14, 2014 01:30 IST

पश्चिम बंगालचे परिवहन मंत्री मदन मित्र यांच्या अटकेच्या विरोधात तृणमूल काँग्रेसचे खासदार सोमवारपासून संसदेत आंदोलन करतील,

 उद्यापासून आंदोलन : ममतांची भाजपा, केंद्रावर टीका

कोलकाता : पश्चिम बंगालचे परिवहन मंत्री मदन मित्र यांच्या अटकेच्या विरोधात तृणमूल काँग्रेसचे खासदार सोमवारपासून संसदेत आंदोलन करतील, असे जाहीर करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मित्रंच्या अटकेवरून भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला.
‘सीबीआयने आपली विश्वासार्हता गमावलेली आहे. सीबीआय राजकीय हत्यार बनली आहे. आता ही तपास संस्था गुंडाळण्याची वेळ आली आहे. भाजपाच्या या राजकीय सूडभावनेच्या विरोधात तृणमूल काँग्रेसचे खासदार सोमवारपासून संसदेत आंदोलन पुकारणार आहेत’, असे बॅनर्जी म्हणाल्या. कोलकाता येथे शनिवारी तृणमूल काँग्रेसच्या रॅलीत त्या बोलत होत्या.
भाजपा आणि केंद्र सरकारने आपल्या मर्यादेत राहावे, असा इशारा देताना बॅनर्जी म्हणाल्या, ‘बंगालची जनता अपमान सहन करणार नाही. सत्तेत असल्यामुळे ते (भाजपा) मुजोर झाले आहेत. या रॅलीत मी मुख्यमंत्री म्हणून आले नाही तर एक नागरिक म्हणून आले आहे. मदन मित्र हे चोर वा डाकू आहेत, यावर माझा विश्वास नाही. त्यांचे कुटुंबीय श्रीमंत आहेत, याचा अर्थ त्यांनी शारदा चिटफंडमधून पैसा घेतला आहे, असे नव्हे.’
मित्र यांना दिल्लीतून फोन आल्यानंतरच सीबीआयने अटक केली.’  (वृत्तसंस्था)
 
मोदींच्या अटकेची मागणी करावी काय?
4शारदा समूहाचा अध्यक्ष सुदीप्ता सेन आणि मदन मित्र यांचे एका व्यासपीठावरील एकत्रित छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. त्याचा उल्लेख करून बॅनर्जी म्हणाल्या, ‘असे छायाचित्र जर गुन्हेगारी कटाचा पुरावा ठरत असेल तर सहारा घोटाळ्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही अटक करण्यात आली पाहिजे. 
 
4चिटफंड कंपनीच्या मालकांसोबत अनेक माकप नेत्यांची छायाचित्रे प्रसिद्ध झालेली आहेत. सहारा प्रमुखासोबत मोदींचा फोटो आहे. मग सीबीआयने मोदींना अटक करावी, अशी मागणी आम्ही करायची काय?’
 
ममता बॅनर्जी घाबरल्या आहेत -भाजपा
4नवी दिल्ली : शारदा घोटाळ्याच्या संदर्भात करण्यात येत असलेली कारवाई ही राजकीय सूडाचा भाग असल्याचा आरोप केल्याबद्दल भाजपाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शारदा घोटाळ्यात ‘आपला सहभाग’ उघड होण्याची शक्यता असल्यामुळे ममता बॅनर्जी या कमालीच्या घाबरलेल्या आहेत, असे भाजपाने म्हटले आहे.