शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

Mamata Banerjee : ‘तृणमूल काँग्रेस’ लढणार पाच  राज्यांत विधानसभा; भाजप, काँग्रेसची हानी करण्याचे ममता बॅनर्जींचे धोरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 08:34 IST

Mamata Banerjee : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरातमध्ये भाजपमधील बंडखोरांना आम आदमी पक्ष (आप) आणि टीएमसी आपली दारे खुली करील. गुजरातमधील काँग्रेसच्या एका गटाशी टीएमसीने आधीच संपर्क साधला आहे. 

- व्यंकटेश केसरी 

नवी दिल्ली : पुढील वर्षी पाच राज्यांत होणारी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. भाजप आणि काँग्रेसची हानी करण्याचा यामागे उद्देश आहे.

टीएमसीचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील सभेत म्हटले की, “येत्या तीन महिन्यांत आमचा पक्ष आणखी पाच राज्यांत पोहोचलेला असेल याची मी खात्री देऊ शकतो.” सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणूक होणार असलेल्या पाच राज्यांत भाजपला दुबळे करण्याचे ममता बॅनर्जी यांचे धोरण आहे.

त्यानुसार उत्तराखंड व गोव्यासारख्या छोट्या राज्यांत विधानसभा अंधांतरी होऊ द्यावी आणि भाजप सत्तेवर असलेल्या उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील अंतर्गत कलहाचा लाभ घेऊन भाजपला धक्का द्यायचा. पुढील वर्षी राष्ट्रपतिपदासाठी होत असलेल्या निवडणुकीत उत्तर प्रदेश व गुजरातला मोठे महत्त्व असेल.

टीएमसीला सध्या निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचे साह्य होत आहे. टीएमसीने गोव्यात निवडणूक लढविण्याचा घेतलेला निर्णय काँग्रेसला निराश करणारा आहे. त्यामुळे भाजप सावध होईल. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरातमध्ये भाजपमधील बंडखोरांना आम आदमी पक्ष (आप) आणि टीएमसी आपली दारे खुली करील. गुजरातमधील काँग्रेसच्या एका गटाशी टीएमसीने आधीच संपर्क साधला आहे. 

बंडखोरांचे स्वागतभाजपच्या संघटनेत वेगवेगळी कारणे दाखवून सामावून न घेतलेले किंवा सत्तेच्या पदांवरून दूर केलेल्या बंडखोरांची हे पक्ष वाट बघत आहेत. परंतु, उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक ही नेहमी जात आणि धर्माच्या आधारावर लढविली जाते. टीएमसी आणि ‘आ’ला राज्यात जातींमध्ये आधार नाही तसेच त्यांच्याकडे मतदारांसमोर आणावा असा चेहराही नाही. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीElectionनिवडणूक