शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

बंदी असतानाही शहरात येताहेत ट्रॅव्हल्स आदेश झुगारला : वाहतूक पोलिसांकडूनही होतोय कानाडोळा

By admin | Updated: June 22, 2016 22:03 IST

जळगाव: शहरातील मुख्य सार्वजनिक रस्त्यावर खासगी ट्रॅव्हल्सला प्रवेश बंदी असतानाही बिनधास्तपणे ट्रॅव्हल्स शहरात येत आहेत. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी काढलेली अधिसूचना ट्रॅव्हल्समालकांनी धुडकावून लावली आहे.

जळगाव: शहरातील मुख्य सार्वजनिक रस्त्यावर खासगी ट्रॅव्हल्सला प्रवेश बंदी असतानाही बिनधास्तपणे ट्रॅव्हल्स शहरात येत आहेत. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी काढलेली अधिसूचना ट्रॅव्हल्समालकांनी धुडकावून लावली आहे.
आकाशवाणी चौक ते रेल्वे स्टेशन पर्यंत जाणारे सर्व रस्ते व रेल्वे स्टेशन ते नेरी नाका चौक पर्यंत जाणार्‍या रस्त्यावर येण्यास व जाण्यास सर्व खासगी ट्रॅव्हल्सला प्रवेश बंदी करण्यात आली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक सुपेकर यांनी काढलेली अधिसूचना २५ डिसेंबर २०१५ रोजी महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात जाहीर झाली होती.
अजिंठा चौक व आयटीआयजवळ नवा थांबा
शहरात होणारी वाहतुकीची कोंडी तसेच विद्यार्थी सुरक्षा याचा विचार करता बाहेरगावी जाणार्‍या सर्व ट्रॅव्हल्स एकाच ठिकाणी थांबाव्यात त्यासाठी विठ्ठल मंदिर संस्थानची जागा निि›त करण्यात आली. तेथून ट्रॅव्हल्स सुरुही झाल्या, मात्र हळूहळू ही संख्या कमी होत गेली. आत दररोज सकाळी शहरात बसेस येवू लागल्या आहेत तर रात्री पुणेकडे जाताना अजिंठा चौक, गुजरातकडे जाणार्‍या ट्रॅव्हल्स महामार्गावर अग्रवाल हॉस्पिटल व आयटीआयजवळ थांबायला लागल्या आहेत.
स्टेडियम, स्टेशनरोडवर येतात बसेस्
बाहेरगावावरून आलेल्या ट्रॅव्हल्स नेरी नाका या थांब्यावर न जाता थेट शहरात येतात. स्टेडियम कॉम्प्लेक्स, दक्षता पोलीस लाईन रोड व स्टेशन रोड परिसरात या ट्रॅव्हल्स थांबतात. या ठिकाणी त्यांचे कार्यालय आहे. दरम्यान, शहरात बंदी असतानाही ट्रॅव्हल्स येत असताना वाहतूक पोलिसांकडून कोणतीच कारवाई होत नाही. तत्कालिन पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी कारवाईत सातत्य ठेवले होते तसे सातत्य नूतन निरीक्षक अनिल देशमुख यांनी ठेवणे अपेक्षित आहे.
आपआपल्या भूमिकेवर ठाम
दरम्यान, राजपत्र प्रसिध्द झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी त्यावर मालक व सामान्य नागरिकांकडून हरकती मागविल्या होत्या. त्यात ५४ जणांनी लेखी हरकती नोंदविल्या होत्या. प्राप्त हरकतीवर पोलीस अधीक्षक यांच्या समक्ष निर्णय होण्यासाठी हरकतदारांना मूळ अर्ज व ओळखपत्रासह फेब्रुवारी महिन्यात हजर राहण्याचे कळविण्यात आले होते, परंतु त्या दिवशी कोणीही उपस्थित राहिले नाही. त्यामुळे २५ फेब्रुवारी ही शेवटची संधी त्यांना देण्यात आली होती. त्यातही उपस्थित ट्रॅव्हल्स मालक व पोलीस प्रशासन आपआपल्या भूमिकेवर ठाम राहिले होते. न्यायालयातही वाद प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.