शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 18:48 IST

भोपाळमध्ये ग्राहक आयोगाने रेल्वेला १३ हजार २५७ रुपयांचा दंड ठोठावला आहे.

भोपाल : अनेक जण रेल्वेने प्रवास करतात. यासाठी काहीजण गर्दीमुळे आधीच रेल्वेचे तिकीट बुकिंग करतात. अशाच एका प्रवाशाने आधीच तिकीट काढून आपली सीट आरक्षित केली होती. मात्र, त्याला ती सीट मिळाली नाही. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशाने ग्राहक आयोगात तक्रार केली. त्यामुळे ग्राहक आयोगाने रेल्वेला १३ हजार २५७ रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही घटना भोपाळमधील आहे. 

भोपाळमध्ये ग्राहक आयोगाने रेल्वेला १३ हजार २५७ रुपयांचा दंड ठोठावला आहे. एका रेल्वे प्रवाशाच्या तक्रारीच्या आधारे ग्राहक आयोगाने हा दंड ठोठावला आहे. तक्रारदार रेल्वे प्रवाशाने दिल्ली ते हबीबगंज जाण्यासाठी ट्रेनमध्ये सीट बुक केली होती. प्रवासादरम्यान प्रवाशाला बुक केलेली सीट मिळाली नाही. त्यानंतर पीडित प्रवाशाने भोपाळ जिल्हा ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली.

भोपाळमधील कोलार रोड येथील रहिवासी मनोज शर्मा यांनी १४ डिसेंबर २०२० रोजी IRCTC ॲपद्वारे हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन ते हबीबगंजसाठी   तिकीट बुक केले होते. त्याला ट्रेन क्रमांक ०२१५६ च्या डब्यात २१ क्रमांकाची सीट मिळाली. जेव्हा तो ट्रेनच्या डब्याजवळ पोहोचला, तेव्हा त्याला समजले की, ही सीट आपल्याला देण्यात आली नाही, त्यामुळे मनोज शर्मा यांनी उभे राहून प्रवास केला.

या प्रवासादरम्यान मनोज शर्मा यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. पूर्ण रक्कम भरूनही जागा न मिळाल्याने मनोज शर्मा यांनी जिल्हा ग्राहक आयोग, भोपाळ यांच्याकडे याबाबत तक्रार केली. मनोज शर्मा यांनी सर्व कागदपत्रे सादर करून अर्ज केला. दरम्यान, तब्बल चार वर्षांनंतर ग्राहक आयोगाने याप्रकरणी निकाल देत रेल्वेला हा दंड ठोठावला आहे.

मनोज शर्मा यांनी भोपाळ जिल्हा ग्राहक आयोगाकडे १८ डिसेंबर २०२० रोजी तिकिटाची रक्कम २५७.७० रुपये, शारीरिक, मानसिक त्रास आणि वैद्यकीय खर्चासाठी ५० हजार रुपये आणि खटल्याच्या खर्चासाठी १० हजार रुपये मिळण्यासाठी वकिलामार्फत अर्ज केला होता. सीटीआय हबीबगंज आलोक श्रीवास्तव यांनी या प्रकरणाची चौकशी केली. 

आलोक श्रीवास्तव यांनी ग्राहक आयोगाला सांगितले की, जी ६ डब्यात तिकीट तपासणारा कर्मचारी नव्हता. तसेच, सहा डब्यांमध्ये एकही जागा रिकामी नव्हती. यानंतर, निर्णय देताना ग्राहक आयोगाने सांगितले की, डीआरएम दिल्ली आणि डीआरएम भोपाळ यांनी तक्रारदाराला २५७ रुपये तिकीटाची रक्कम द्यावी. तसेच दहा हजार रुपये मानसिक त्रासासाठी आणि तीन हजार रुपये खटल्याचा खर्च म्हणून द्यावेत.

टॅग्स :railwayरेल्वेMadhya Pradeshमध्य प्रदेश