शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

संयुक्त किसान मोर्चाचा मोठा निर्णय; ट्रॅक्टर रॅलीत मार्ग बदलणाऱ्या दोन संघटनांवर कारवाई

By देवेश फडके | Updated: February 7, 2021 15:16 IST

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने मोठा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देसंयुक्त किसान मोर्चाचा मोठा निर्णयटॅक्टर रॅलीत सहभागी दोन संघटनांवर कारवाईसंयुक्त किसान मोर्चाशी चर्चा केली नसल्याचा दावा

सोनीपत : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने मोठा निर्णय घेतला आहे. नियोजित ट्रॅक्टर रॅलीचा मार्ग बदलून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या दोन संघटनांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, याविरोधात एक तपास समिती गठीत करण्यात आली आहे. (Two Farmers Organizations Suspended In Tractor Rally)

ट्रॅक्टर रॅलीत उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालात दोन संघटनांचे पदाधिकारी मार्ग बदलून दुसऱ्या ठिकाणी गेले. एवढेच नव्हे, तर या दोन संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून मार्ग बदलला होता. शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याशी याबाबतीत कोणतीही चर्चा करण्यात आली नाही, असेही या अहवालात म्हटले आहे. 

सरकारने अहंकार सोडून कृषी कायदे रद्द करावेत; राहुल गांधींचा पुनरुच्चार

तपास समितीने दिलेल्या अहवालानंतर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांमध्ये चक्का जाम आंदोलन न करण्याचा निर्णय घेण्यात आला. चक्का जाम आंदोलनानंतर कुंडली सीमेवर सायंकाळी ३२ शेतकरी संघटनांपैकी १४ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर पंजाब किसान युनियनचे रुलदू सिंग मानसा, भाकियू क्रांतिकारीचे दर्शनपाल, जमहूरी किसानचे रघुवीर सिंगसह अन्य पदाधिकाऱ्यांनी चक्का जाम आंदोलनाच्या यशानंतर पुढील रणनीती आखण्याचा निर्णय घेतला आहे. 

भाकियू क्रांतिकारीच्या सुरजित फूल गटाचे अध्यक्ष सुरजित सिंग फूल आणि आझाद शेतकरी समितीचे हरपाल सिंह सांगा या दोन पदाधिकाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली. ट्रॅक्टर रॅलीदरम्यान जितक्या संघटनांनी मार्ग बदलला, त्या सर्वांविरोधात समिती तपास करणार आहे, अशी माहिती रुलदू सिंग मानसा यांनी दिली. 

दरम्यान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांत चक्का जाम आंदोलनादरम्यान हिंसाचार घडवण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे या दोन राज्यात चक्का जाम आंदोलन न करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितले. तसेच रणनीती बदलण्यापूर्वी संयुक्त किसान मोर्चाशी एकदा चर्चा करायला हवी होती, असेही राकेश टिकैत म्हणाले. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतdelhiदिल्ली