शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

संयुक्त किसान मोर्चाचा मोठा निर्णय; ट्रॅक्टर रॅलीत मार्ग बदलणाऱ्या दोन संघटनांवर कारवाई

By देवेश फडके | Updated: February 7, 2021 15:16 IST

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने मोठा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देसंयुक्त किसान मोर्चाचा मोठा निर्णयटॅक्टर रॅलीत सहभागी दोन संघटनांवर कारवाईसंयुक्त किसान मोर्चाशी चर्चा केली नसल्याचा दावा

सोनीपत : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने मोठा निर्णय घेतला आहे. नियोजित ट्रॅक्टर रॅलीचा मार्ग बदलून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या दोन संघटनांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, याविरोधात एक तपास समिती गठीत करण्यात आली आहे. (Two Farmers Organizations Suspended In Tractor Rally)

ट्रॅक्टर रॅलीत उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालात दोन संघटनांचे पदाधिकारी मार्ग बदलून दुसऱ्या ठिकाणी गेले. एवढेच नव्हे, तर या दोन संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून मार्ग बदलला होता. शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याशी याबाबतीत कोणतीही चर्चा करण्यात आली नाही, असेही या अहवालात म्हटले आहे. 

सरकारने अहंकार सोडून कृषी कायदे रद्द करावेत; राहुल गांधींचा पुनरुच्चार

तपास समितीने दिलेल्या अहवालानंतर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांमध्ये चक्का जाम आंदोलन न करण्याचा निर्णय घेण्यात आला. चक्का जाम आंदोलनानंतर कुंडली सीमेवर सायंकाळी ३२ शेतकरी संघटनांपैकी १४ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर पंजाब किसान युनियनचे रुलदू सिंग मानसा, भाकियू क्रांतिकारीचे दर्शनपाल, जमहूरी किसानचे रघुवीर सिंगसह अन्य पदाधिकाऱ्यांनी चक्का जाम आंदोलनाच्या यशानंतर पुढील रणनीती आखण्याचा निर्णय घेतला आहे. 

भाकियू क्रांतिकारीच्या सुरजित फूल गटाचे अध्यक्ष सुरजित सिंग फूल आणि आझाद शेतकरी समितीचे हरपाल सिंह सांगा या दोन पदाधिकाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली. ट्रॅक्टर रॅलीदरम्यान जितक्या संघटनांनी मार्ग बदलला, त्या सर्वांविरोधात समिती तपास करणार आहे, अशी माहिती रुलदू सिंग मानसा यांनी दिली. 

दरम्यान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांत चक्का जाम आंदोलनादरम्यान हिंसाचार घडवण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे या दोन राज्यात चक्का जाम आंदोलन न करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितले. तसेच रणनीती बदलण्यापूर्वी संयुक्त किसान मोर्चाशी एकदा चर्चा करायला हवी होती, असेही राकेश टिकैत म्हणाले. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतdelhiदिल्ली