शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

संयुक्त किसान मोर्चाचा मोठा निर्णय; ट्रॅक्टर रॅलीत मार्ग बदलणाऱ्या दोन संघटनांवर कारवाई

By देवेश फडके | Updated: February 7, 2021 15:16 IST

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने मोठा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देसंयुक्त किसान मोर्चाचा मोठा निर्णयटॅक्टर रॅलीत सहभागी दोन संघटनांवर कारवाईसंयुक्त किसान मोर्चाशी चर्चा केली नसल्याचा दावा

सोनीपत : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने मोठा निर्णय घेतला आहे. नियोजित ट्रॅक्टर रॅलीचा मार्ग बदलून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या दोन संघटनांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, याविरोधात एक तपास समिती गठीत करण्यात आली आहे. (Two Farmers Organizations Suspended In Tractor Rally)

ट्रॅक्टर रॅलीत उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालात दोन संघटनांचे पदाधिकारी मार्ग बदलून दुसऱ्या ठिकाणी गेले. एवढेच नव्हे, तर या दोन संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून मार्ग बदलला होता. शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याशी याबाबतीत कोणतीही चर्चा करण्यात आली नाही, असेही या अहवालात म्हटले आहे. 

सरकारने अहंकार सोडून कृषी कायदे रद्द करावेत; राहुल गांधींचा पुनरुच्चार

तपास समितीने दिलेल्या अहवालानंतर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांमध्ये चक्का जाम आंदोलन न करण्याचा निर्णय घेण्यात आला. चक्का जाम आंदोलनानंतर कुंडली सीमेवर सायंकाळी ३२ शेतकरी संघटनांपैकी १४ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर पंजाब किसान युनियनचे रुलदू सिंग मानसा, भाकियू क्रांतिकारीचे दर्शनपाल, जमहूरी किसानचे रघुवीर सिंगसह अन्य पदाधिकाऱ्यांनी चक्का जाम आंदोलनाच्या यशानंतर पुढील रणनीती आखण्याचा निर्णय घेतला आहे. 

भाकियू क्रांतिकारीच्या सुरजित फूल गटाचे अध्यक्ष सुरजित सिंग फूल आणि आझाद शेतकरी समितीचे हरपाल सिंह सांगा या दोन पदाधिकाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली. ट्रॅक्टर रॅलीदरम्यान जितक्या संघटनांनी मार्ग बदलला, त्या सर्वांविरोधात समिती तपास करणार आहे, अशी माहिती रुलदू सिंग मानसा यांनी दिली. 

दरम्यान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांत चक्का जाम आंदोलनादरम्यान हिंसाचार घडवण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे या दोन राज्यात चक्का जाम आंदोलन न करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितले. तसेच रणनीती बदलण्यापूर्वी संयुक्त किसान मोर्चाशी एकदा चर्चा करायला हवी होती, असेही राकेश टिकैत म्हणाले. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतdelhiदिल्ली