शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
4
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
5
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
6
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
7
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
8
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
9
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
10
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
11
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
12
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
13
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
14
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
15
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
16
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
17
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
18
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
19
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
20
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

संयुक्त किसान मोर्चाचा मोठा निर्णय; ट्रॅक्टर रॅलीत मार्ग बदलणाऱ्या दोन संघटनांवर कारवाई

By देवेश फडके | Updated: February 7, 2021 15:16 IST

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने मोठा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देसंयुक्त किसान मोर्चाचा मोठा निर्णयटॅक्टर रॅलीत सहभागी दोन संघटनांवर कारवाईसंयुक्त किसान मोर्चाशी चर्चा केली नसल्याचा दावा

सोनीपत : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने मोठा निर्णय घेतला आहे. नियोजित ट्रॅक्टर रॅलीचा मार्ग बदलून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या दोन संघटनांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, याविरोधात एक तपास समिती गठीत करण्यात आली आहे. (Two Farmers Organizations Suspended In Tractor Rally)

ट्रॅक्टर रॅलीत उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालात दोन संघटनांचे पदाधिकारी मार्ग बदलून दुसऱ्या ठिकाणी गेले. एवढेच नव्हे, तर या दोन संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून मार्ग बदलला होता. शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याशी याबाबतीत कोणतीही चर्चा करण्यात आली नाही, असेही या अहवालात म्हटले आहे. 

सरकारने अहंकार सोडून कृषी कायदे रद्द करावेत; राहुल गांधींचा पुनरुच्चार

तपास समितीने दिलेल्या अहवालानंतर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांमध्ये चक्का जाम आंदोलन न करण्याचा निर्णय घेण्यात आला. चक्का जाम आंदोलनानंतर कुंडली सीमेवर सायंकाळी ३२ शेतकरी संघटनांपैकी १४ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर पंजाब किसान युनियनचे रुलदू सिंग मानसा, भाकियू क्रांतिकारीचे दर्शनपाल, जमहूरी किसानचे रघुवीर सिंगसह अन्य पदाधिकाऱ्यांनी चक्का जाम आंदोलनाच्या यशानंतर पुढील रणनीती आखण्याचा निर्णय घेतला आहे. 

भाकियू क्रांतिकारीच्या सुरजित फूल गटाचे अध्यक्ष सुरजित सिंग फूल आणि आझाद शेतकरी समितीचे हरपाल सिंह सांगा या दोन पदाधिकाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली. ट्रॅक्टर रॅलीदरम्यान जितक्या संघटनांनी मार्ग बदलला, त्या सर्वांविरोधात समिती तपास करणार आहे, अशी माहिती रुलदू सिंग मानसा यांनी दिली. 

दरम्यान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांत चक्का जाम आंदोलनादरम्यान हिंसाचार घडवण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे या दोन राज्यात चक्का जाम आंदोलन न करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितले. तसेच रणनीती बदलण्यापूर्वी संयुक्त किसान मोर्चाशी एकदा चर्चा करायला हवी होती, असेही राकेश टिकैत म्हणाले. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतdelhiदिल्ली