शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

अनेकांचा बळी घेणारा मामा-भाच्याचा डोह ठरताहे पर्यटकांचा कर्दनकाळ

By admin | Updated: February 8, 2015 00:19 IST

हिवरखेड : त्रिवेणी संगमावर वसलेल्या वारी भैरवगड येथील मामा-भाच्याचा डोह पर्यटनासाठी येणार्‍यांचा कर्दनकाळ ठरत आहे. जळगाव जामोद येथील शरद पवार तंत्रनिकेतनमधील चैतन्य दत्तात्रय डिवरे, नंदकिशोर पुंडलीक वानखडे या दोन विद्यार्थ्यांचा ५ फेब्रुवारी रोजी डोहात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने या डोहाच्या भोवताल तारांचे कुंपण घालण्याची व तेथे सुरक्षेसाठी पोलिसांची किमान शनिवार-रविवार व शासकीय सुट्यांच्या दिवशी ड्युटी लावणे गरजेचे बनले आहे.

हिवरखेड : त्रिवेणी संगमावर वसलेल्या वारी भैरवगड येथील मामा-भाच्याचा डोह पर्यटनासाठी येणार्‍यांचा कर्दनकाळ ठरत आहे. जळगाव जामोद येथील शरद पवार तंत्रनिकेतनमधील चैतन्य दत्तात्रय डिवरे, नंदकिशोर पुंडलीक वानखडे या दोन विद्यार्थ्यांचा ५ फेब्रुवारी रोजी डोहात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने या डोहाच्या भोवताल तारांचे कुंपण घालण्याची व तेथे सुरक्षेसाठी पोलिसांची किमान शनिवार-रविवार व शासकीय सुट्यांच्या दिवशी ड्युटी लावणे गरजेचे बनले आहे.
अकोला, बुलडाणा व अमरावती सीमेवर वसलेल्या वारी भैरवगड येथे प्रसिद्ध हनुमान मंदिर असून, त्याची स्थापना शेकडो वर्षांपूर्वीची असून, याच मंदिराच्या पायथ्याशी मामा-भाच्याचा डोह आहे. जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सहली या ठिकाणी येत असतात. विद्यार्थी आंघोळीसाठी या पाण्यामध्ये उतरतात व पोहणे नसल्याने त्यातच त्यांचा मृत्यू होतो. मागील १० ते १५ वर्षांपासून या मामा-भाच्याच्या डोहामध्ये अनेकांचा बुडून मृत्यू झाला असून, त्यामध्ये युवक व शालेय विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. या डोहामध्ये पाण्याची पातळी कळत नसल्यामुळे त्या ठिकाणी आंघोळीला गेले असता काही समजण्याआधीच त्यामध्ये बुडतात.
शनिवार, रविवार तसेच होळी पौर्णिमा या दिवशी पर्यटक मोठ्या प्रमाणात वारी भैरवगड येथे हनुमान दर्शन तथा वान धरण पाहण्यासाठी येतात व या डोहाच्या खोलीची व कपारींची पुसटशीही कल्पना नसताना ते पोहण्यास त्यात उतरतात. यापूर्वी येथे मृत्यू झालेल्यांच्या नावाची यादी या ठिकाणी लावण्यात आली होती; परंतु तो फलकसुद्धा आता या ठिकाणी नाही. या डोहामुळे होणारे पर्यटकांचे मृत्यू टाळण्यासाठी डोहाच्या चहूबाजूला तारेचे कम्पाउंड करणे गरजेचे असून, पर्यटकांना या डोहाच्या धोक्याबाबत जागरुक करण्यासाठी तेथे फलक लावणेही आवश्यक आहे. या बाबीचा विचार करून सामाजिक संस्थांनी पुढे येऊन या ठिकाणी कम्पाउंड करून पर्यटकांचे जीव वाचविण्यासाठी फलक लावल्यास ते समाज हिताचे ठरू शकेल. (प्रतिनिधी)
फोटो : ०६एकेटीपी०३ व ०४.जेपीजी
कॅप्शन : वारी भैरवगड येथील मामा-भाच्याचा डोह आणि काठावरील आसरा मंदिर.
........................