शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

Farmer Protest: पंतप्रधान मोदी पूर्णपणे चुकीची माहिती देताहेत- टिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 06:53 IST

शेतकरी आंदोलनाचा २३ वा दिवस; किमान आधारभूत दर हा आमचा अधिकार

- विकास झाडेनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला; परंतु त्यांनी सांगितलेल्या बऱ्याचशा बाबी या असत्य आहेत. मोदी कृषी क्षेत्राचे खाजगीकरण करीत असल्याची टीका शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी केली.मोदी यांनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्याची दिलेली माहिती खोटी असल्याकडेही टिकेत यांनी लक्ष वेधले. त्यांनी अद्याप शेतकऱ्यांसोबत कोणतीही चर्चा केली नाही; परंतु ते सातत्याने चुकीची माहिती देत आहेत. पंतप्रधानांकडून ५०० रुपये महिन्याची भिक्षा नको तर पिकाला किमान आधारभूत मूल्य देणे हा आमचा अधिकार आहे. शेतकरी हिताच्या गोष्टी सांगून उद्योजकांच्या हाती शेतकऱ्यांची मानगूट देण्याचा मोदींचा प्रयत्न आहे, तो आम्ही हाणून पाडू. उस उत्पादकांना १६ कोटी रुपयांची मदत करीत असल्याचा मोदींचा दावाही टिकेत यांनी खोटा ठरविला. ते म्हणाले, साखर कारखान्यांना शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे होते. केंद्र सरकार जर ही मदत करणार असेल तर ती शेतकऱ्यांना नव्हे तर साखर उद्योजकांना असेल.शेतकरी आंदोलनाच्या २३ व्या दिवशीही शेतकऱ्यांमध्ये प्रतिकुल परिस्थितीतही जोश दिसून आला. कॉँग्रेसचे नेते बॉक्सर विजेंद्र सिंह यांनी शुक्रवारी टिकरी सीमेवर शेतकऱ्यांना भोजन वितरित केले. जमींदारा विद्यार्थी संघटनेतर्फे लंगरचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी मजूर संघर्ष समितीचे महासचिव श्रवण सिंह पंढेर यांनी कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचे पत्र शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण करणारे असून त्यात नवीन काहीच नसल्याचे सांगितले. मिरची हिरवी असते की लाल!केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी मेरठ येथील एका सभेत कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या, ज्यांनी ७० वर्षे शेतकऱ्यांचे शोषण केले ते आज आपल्या राजकीय अस्तित्वासाठी नाटक करीत आहेत. मिरची हिरवी असते की लाल हे संसदेत राहुल गांधी सांगू शकत नाहीत. त्यांना शेतीचे किती ज्ञान आहे हे शेतकऱ्यांना चांगले ठाऊक आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी