शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Farmer Protest: पंतप्रधान मोदी पूर्णपणे चुकीची माहिती देताहेत- टिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 06:53 IST

शेतकरी आंदोलनाचा २३ वा दिवस; किमान आधारभूत दर हा आमचा अधिकार

- विकास झाडेनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला; परंतु त्यांनी सांगितलेल्या बऱ्याचशा बाबी या असत्य आहेत. मोदी कृषी क्षेत्राचे खाजगीकरण करीत असल्याची टीका शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी केली.मोदी यांनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्याची दिलेली माहिती खोटी असल्याकडेही टिकेत यांनी लक्ष वेधले. त्यांनी अद्याप शेतकऱ्यांसोबत कोणतीही चर्चा केली नाही; परंतु ते सातत्याने चुकीची माहिती देत आहेत. पंतप्रधानांकडून ५०० रुपये महिन्याची भिक्षा नको तर पिकाला किमान आधारभूत मूल्य देणे हा आमचा अधिकार आहे. शेतकरी हिताच्या गोष्टी सांगून उद्योजकांच्या हाती शेतकऱ्यांची मानगूट देण्याचा मोदींचा प्रयत्न आहे, तो आम्ही हाणून पाडू. उस उत्पादकांना १६ कोटी रुपयांची मदत करीत असल्याचा मोदींचा दावाही टिकेत यांनी खोटा ठरविला. ते म्हणाले, साखर कारखान्यांना शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे होते. केंद्र सरकार जर ही मदत करणार असेल तर ती शेतकऱ्यांना नव्हे तर साखर उद्योजकांना असेल.शेतकरी आंदोलनाच्या २३ व्या दिवशीही शेतकऱ्यांमध्ये प्रतिकुल परिस्थितीतही जोश दिसून आला. कॉँग्रेसचे नेते बॉक्सर विजेंद्र सिंह यांनी शुक्रवारी टिकरी सीमेवर शेतकऱ्यांना भोजन वितरित केले. जमींदारा विद्यार्थी संघटनेतर्फे लंगरचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी मजूर संघर्ष समितीचे महासचिव श्रवण सिंह पंढेर यांनी कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचे पत्र शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण करणारे असून त्यात नवीन काहीच नसल्याचे सांगितले. मिरची हिरवी असते की लाल!केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी मेरठ येथील एका सभेत कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या, ज्यांनी ७० वर्षे शेतकऱ्यांचे शोषण केले ते आज आपल्या राजकीय अस्तित्वासाठी नाटक करीत आहेत. मिरची हिरवी असते की लाल हे संसदेत राहुल गांधी सांगू शकत नाहीत. त्यांना शेतीचे किती ज्ञान आहे हे शेतकऱ्यांना चांगले ठाऊक आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी