शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

शशी थरूर व राजदीप सरदेसाई यांच्याविरुद्ध भोपाळमध्ये शेतकऱ्यांनेच केली पोलिसांत तक्रार

By देवेश फडके | Updated: January 29, 2021 16:46 IST

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नोएडानंतर आता मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये काँग्रेस नेते शशी थरूर आणि ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमध्य प्रदेशमध्ये शशी थरूर आणि राजदीप सरदेसाईंविरुद्ध एफआयआरदिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तक्रार दाखलभोपाळमध्ये एका शेतकऱ्यानेच केली पोलिसांत तक्रार

भोपाळ : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नोएडानंतर आता मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये काँग्रेस नेते शशी थरूर आणि ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एका शेतकऱ्यानेच ही तक्रार केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शशी थरूर आणि राजदीप सरदेसाई यांच्यासह अन्य काही जणांवर शांततेचा भंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. संजय रघुवंशी नामक शेतकऱ्याने पोलिसांत ही तक्रार दाखल केली असून, दिल्लीत झालेल्या हिंसाचारासंदर्भात सोशल मीडियावर चुकीची माहिती शेअर केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. 

शेतकरी आंदोलनाला पाकिस्तानचे समर्थन; जो बायडन यांना दखल घेण्याची करणार विनंती

भोपाळ व्यतिरिक्त बैतूल जिल्ह्यातील मुल्ताई येथेही शशी थरूर आणि राजदीप सरदेसाई यांच्याविरोधात एफआरआय दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, नोएडा येथेही ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्यासह अनेक ज्येष्ठ पत्रकारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये हेराल्ड ग्रुपच्या ज्येष्ठ संपादकीय सल्लागार मृणाल पांडे, कौमी आवाज या उर्दू वृत्तपत्राचे मुख्य संपादक जफर आगा, खान कारवां वृत्तपत्राचे मुख्य संपादक परेशनाथ, अनंतनाथ, विनोद के जोश यांच्यासह अन्य आठ जणांचा समावेश आहे. 

पोलिसांनी रॅलीतील एका ट्रॅक्टर चालकाची हत्या केली, अशी खोटी आणि चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप या सर्वांवर ठेवण्यात आला आहे. आंदोलकांना चिथावणे आणि मुद्दामहून भ्रम निर्माण करणाऱ्या माहितीचा प्रसार करणे, असे आरोपही पोलिसांकडून या सर्वांवर ठेवण्यात आले आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणShashi Tharoorशशी थरूरFarmer strikeशेतकरी संपagitationआंदोलन