शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

उद्या सांगाल लोकांच्या बोटात गडबड, मिश्रांचा केजरीवालांवर पलटवार

By admin | Updated: May 9, 2017 18:56 IST

आम आदमी पक्षानं दिल्ली विधानसभेत उचललेल्या ईव्हीएम मशिनमधल्या छेडछाडीच्या मुद्द्याचा कपिल मिश्रांनी खरपूस समाचार घेतला

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 9 - आम आदमी पक्षानं दिल्ली विधानसभेत उचललेल्या ईव्हीएम मशिनमधल्या छेडछाडीच्या मुद्द्याचा कपिल मिश्रांनी खरपूस समाचार घेतला आहे. उद्या अरविंद केजरीवालांचा आम आदमी पक्ष लोकांच्या बोटांमध्येही गडबड असल्याचंही सांगेल, असं म्हणत मिश्रांनी केजरीवालांसह आपवर टीकास्त्र सोडलं आहे. निवडणुकीत विजय न मिळाल्यानं लोकशाहीवर टीका करणं चुकीचं आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठीच आपकडून ईव्हीएमचा मुद्दा पुढे केला गेला आहे, असा आरोपही मिश्रा यांनी केला आहे. आपच्या सौरभ भारद्वाज यांनी एका प्रात्यक्षिकाद्वारे ईव्हीएम मशिनशी छेडछाड करणं शक्य असल्याचं दाखवलं होतं. त्यावर कपिल मिश्रा म्हणाले, या देशातील निवडणूक प्रक्रिया जगभरात पाहिली जाते. आमच्या देशात निवडणुकीला एक इभ्रत आहे. आम आदमी पार्टी एकही निवडणूक जिंकू शकत नाही. आता केजरीवालांच्या नावावर एकही मत मिळत नाही. आम आदमी पार्टीनं एश्टच्या माध्यमातूनच निवडणुका जिंकल्या आहेत. केजरीवाल आम आदमी पार्टीची इभ्रत वाचवण्यासाठीच असे प्रकार करत असल्याचंही मिश्रा म्हणाले आहेत.(भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला बगल देत आपनं उठवला ईव्हीएमचा मुद्दा)आपच्या अलका लांबा यांनी ईव्हीएमवरून भाजपावर जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या, ज्या राज्यात फ्रीजमध्ये बीफ ठेवल्यानं एकाची हत्या केली जाते, तिथे ईव्हीएमवर संशय का घेतला जाऊ शकत नाही. आपच्या नेत्यांनी ईव्हीएम टॅम्परिंगसंदर्भात तीनदा माहिती मागवली होती. मात्र निवडणूक आयोगानं त्यांना काहीच प्रत्युत्तर दिलं नाही. दिल्लीच्या महापालिका निवडणुकीत जनरेशन थ्री मशिन असतानाही जनरेशन वनच्या मशिनी वापरण्यात आल्या आहेत. अल्का म्हणाल्या, निवडणूक आयोगाकडे पर्याप्त ईव्हीएम मशिन असतानाही राजस्थानमधून ईव्हीएम मशिन मागवाव्या लागल्या आहेत. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे खराब करून या ईव्हीएम मशिनशी छेडछाड केल्यानंतर भाजपाच्या उमेदवारांना जिंकवण्यात आलं आहे. त्यानंतर आपच्या सौरभ भारद्वाज यांनी एका प्रात्यक्षिकाद्वारे ईव्हीएम मशिनशी छेडछाड करणं शक्य असल्याचं म्हटलं आहे. मात्र त्याच वेळी भाजपाच्या सदस्यांनी केजरीवालांच्या कथित 1 हजार कोटींच्या घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला असता, त्यावर अध्यक्षांनी चर्चा करण्यास नकार दिला.

 

भाजपाचे विजेंदर गुप्ता दस्तऐवज घेऊन विधानसभेत पोहोचले असता, अध्यक्षांनी पुरावे विधानभवनाच्या पटलावर ठेवण्यास मंजुरी दिली नाही. तसेच भाजपचा स्थगन प्रस्ताव रद्द केला. त्यामुळे गुप्ता विधानसभेच्या बाहेरच उपोषणाला बसले होते. तत्पूर्वी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.