शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 17:14 IST

Tirupati Prasadam Controversy: तिरुपती लाडू वादाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी "प्रयाश्चित दीक्षा" घेतली आहे.

Tirupati Prasadam Controversy: तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादात प्राण्यांची चरबी आढळल्यानंतर देशभरातील भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला. तर, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी या घटनेच्या निषेधार्थ "प्रयाश्चित दीक्षा" घेतली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, "सनातन धर्माबाबत गेल्या 5-6 वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या प्रकारची विटंबना सुरू आहे. सूमारे 219 मंदिरांची विटंबना करण्यात आली." 

आंध्र प्रदेश उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी तिरुपती लाडू घटनेचे प्रायश्चित करण्यासाठी 11 दिवसांच्या ‘प्रयाश्चित्त दीक्षा’अंतर्गत मंगळवारी सकाळी विजयवाडा येथील कनक दुर्गा मंदिरात शुद्धीकरण विधी करण्यासाठी पोहोचले. यावेळी त्यांनी भगवान बालाजीकडे क्षमा मागत 11 दिवस उपवास करण्याची शपथ घेतली.

लवकरच घोषणा करणारमीडियाशी बोलताना पवन कल्याण म्हणाले की, "अशा प्रकारच्या घटनांना आळा बसला पाहिजे आणि त्यावर वेळोवेळी बोलले पाहिजे. सनातन धर्माबाबत गेल्या 5-6 वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या प्रकारची विटंबना सुरू आहे. 219 मंदिरांची विटंबना करण्यात आली. रामतीर्थम येथे तचर श्रीरामाच्या मूर्तीची विटंबना झाली. त्यामुळे हा फक्त एकट्या तिरुपती प्रसादाचा मुद्दा नाही. 'प्रयाश्चित दीक्षा' सनातन धर्माला पुढे नेण्यासाठीची कटीबद्धता आहे. ही दीक्षा पूर्ण झाल्यानंतर आम्ही एक घोषणाही करणार आहोत," अशी माहिती त्यांनी दिली.

'तिरुपती'मधील भेसळीचा तपास एसआयटीने थांबवलाआंध्र प्रदेशचे पोलीस महासंचालक म्हणाले की, तिरुपती लाडू भेसळ प्रकरणातील SIT तपास तात्पुरता पुढे ढकलण्यात आला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन असल्यामुळे असे करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी नुकतेच प्रसादात भेसळ केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी नऊ सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले होते. आंध्र प्रदेशचे डीजीपी द्वारका तिरुमला राव यांच्या सूचनेनुसार, तिरुपती लाडू प्रसादम भेसळ प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने 3 ऑक्टोबरपर्यंत तपास तात्पुरता स्थगित केला आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :pawan kalyanपवन कल्याणtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट