शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 17:14 IST

Tirupati Prasadam Controversy: तिरुपती लाडू वादाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी "प्रयाश्चित दीक्षा" घेतली आहे.

Tirupati Prasadam Controversy: तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादात प्राण्यांची चरबी आढळल्यानंतर देशभरातील भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला. तर, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी या घटनेच्या निषेधार्थ "प्रयाश्चित दीक्षा" घेतली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, "सनातन धर्माबाबत गेल्या 5-6 वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या प्रकारची विटंबना सुरू आहे. सूमारे 219 मंदिरांची विटंबना करण्यात आली." 

आंध्र प्रदेश उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी तिरुपती लाडू घटनेचे प्रायश्चित करण्यासाठी 11 दिवसांच्या ‘प्रयाश्चित्त दीक्षा’अंतर्गत मंगळवारी सकाळी विजयवाडा येथील कनक दुर्गा मंदिरात शुद्धीकरण विधी करण्यासाठी पोहोचले. यावेळी त्यांनी भगवान बालाजीकडे क्षमा मागत 11 दिवस उपवास करण्याची शपथ घेतली.

लवकरच घोषणा करणारमीडियाशी बोलताना पवन कल्याण म्हणाले की, "अशा प्रकारच्या घटनांना आळा बसला पाहिजे आणि त्यावर वेळोवेळी बोलले पाहिजे. सनातन धर्माबाबत गेल्या 5-6 वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या प्रकारची विटंबना सुरू आहे. 219 मंदिरांची विटंबना करण्यात आली. रामतीर्थम येथे तचर श्रीरामाच्या मूर्तीची विटंबना झाली. त्यामुळे हा फक्त एकट्या तिरुपती प्रसादाचा मुद्दा नाही. 'प्रयाश्चित दीक्षा' सनातन धर्माला पुढे नेण्यासाठीची कटीबद्धता आहे. ही दीक्षा पूर्ण झाल्यानंतर आम्ही एक घोषणाही करणार आहोत," अशी माहिती त्यांनी दिली.

'तिरुपती'मधील भेसळीचा तपास एसआयटीने थांबवलाआंध्र प्रदेशचे पोलीस महासंचालक म्हणाले की, तिरुपती लाडू भेसळ प्रकरणातील SIT तपास तात्पुरता पुढे ढकलण्यात आला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन असल्यामुळे असे करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी नुकतेच प्रसादात भेसळ केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी नऊ सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले होते. आंध्र प्रदेशचे डीजीपी द्वारका तिरुमला राव यांच्या सूचनेनुसार, तिरुपती लाडू प्रसादम भेसळ प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने 3 ऑक्टोबरपर्यंत तपास तात्पुरता स्थगित केला आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :pawan kalyanपवन कल्याणtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट