शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 14:09 IST

Tirupati Laddu Prasadam Controversy : भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही तिरुपती मंदिरातील प्रसादात भेसळ झाल्याच्या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. 

Tirupati Laddu Prasadam Controversy : नवी दिल्ली : तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आल्याचे उघड झाले आहे. मागील राज्य सरकारच्या कार्यकाळात तिरुपती बालाजी देवस्थानतर्फे प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडू बनविण्यासाठी निकृष्ट पदार्थ व प्राण्याच्या चरबीचा वापर सुरू केला होता, असा अहवाल गुजरातमधील एका प्रयोगशाळेनं दिला. यावरून देशातील राजकारण चांगलेच तापलं आहे. तर भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही तिरुपती मंदिरातील प्रसादात भेसळ झाल्याच्या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. 

हिंदूंची प्रसादावर मोठी श्रद्धा आहे, मात्र भेसळीच्या बातम्यांमुळे भाविकांमध्ये शंका निर्माण होत आहे, असे रामनाथ कोविंद म्हणाले. तसेच, वाराणसी दौऱ्याचा संदर्भ देत रामनाथ कोविंद म्हणाले, "मी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊ शकलो नाही, पण माझे काही सहकारी मंदिरात गेले होते. त्यांनी मला प्रसाद दिला. त्यावेळी मला तिरुपती मंदिरातील भेसळीची बातमी आठवली. ही समस्या केवळ एका मंदिरापुरती मर्यादित असू शकत नाही, ती प्रत्येक मंदिराची गोष्ट असू शकते."

याचबरोबर, भेसळ हे पाप असल्याचे सांगत रामनाथ कोविंद म्हणाले, "भेसळ हे पाप आहे. हिंदू शास्त्रांमध्ये सुद्धा याला पाप म्हटले आहे. भक्तांसाठी प्रसाद हे श्रद्धेचे प्रतिक असून, त्यातील भेसळ निषेधार्ह आहे." दरम्यान, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या या वक्तव्यानंतर प्रसादातील भेसळीबाबत जनजागृती करून ती रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

दुसरीकडे, भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनीही तिरुपती लाडूंशी संबंधित वादाची आंध्र प्रदेश सरकारकडे कठोर आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी म्हटले आहे की, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने एकतर विशेष पथक स्थापन करावे किंवा हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे. तसेच, हा थेट हिंदू धर्म आणि श्रद्धांवर हल्ला आहे, जो खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा सुद्धा शोभा करंदलाजे यांनी दिला आहे.

प्रल्हाद जोशी यांनीही व्यक्त केली चिंता केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही तिरुपती लाडू प्रसादाच्या वादावर चिंता व्यक्त केली असून ही बाब अत्यंत गंभीर असून याची सखोल चौकशी झाली पाहिजे, असे म्हटले आहे. "प्रयोगशाळेचा जो अहवाल समोर आला आहे तो अत्यंत धोकादायक आहे. हा करोडो लोकांच्या विश्वासाचा विषय आहे. चंद्राबाबू नायडूंनी सार्वजनिक केलेल्या या अहवालाची चौकशी झाली पाहिजे, आणि तो खरा असल्याचे सिद्ध झाल्यास दोषींवर कारवाई झाली पाहिजे", असे  प्रल्हाद जोशी म्हणाले.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट