शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 16:28 IST

Tirupati Laddu Controversy: मुंबईतील पत्रकार परिषदेत ओवेसींनी वक्फ विधेयकावरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

Asaduddin Owaisi On Tirupati Laddu Controversy : तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादात प्राण्यांची चरबी वापरल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. या तिरुपती लाडू वादावर धर्मप्रमुखांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत...अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान, आता एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी आज, बुधवारी (25 सप्टेंबर) तिरुपतीच्या प्रसादाच्या वादावर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, तिरुपतीच्या प्रसादात प्राण्यांच्या चरबीचा वापर होत असल्याची माहिती समोर आली आहे. असे झाले असेल, तर ते अत्यंत चुकीचे आहे. आम्हीदेखील या गोष्टीला चुकीचे मानतो. असे घडायला नको होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

'भाजप खोटा प्रचार करत आहे'असदुद्दीन ओवेसी यांनी यावेळी वक्फ दुरुस्ती विधेयकावर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, वक्फचा सदस्य मुस्लिम समाजाच्या बाहेरच कसा असू शकतो? वक्फ मालमत्ता ही खासगी मालमत्ता आहे. वक्फ ही सरकारी मालमत्ता असल्याच्या अफवा भाजप पसरवत आहे. वक्फ बोर्डाकडे 10 लाख एकर जमीन असल्याचा खोटा प्रचार केला जात आहे. हिंदू धर्मात जशी संपत्ती दान केली जाते, त्याचप्रमाणे वक्फमध्येही जमीन दान केली जाते, असे ओवेसी म्हणाले.

ओवेसी पुढे म्हणतात की, केंद्र सरकार म्हणत आहे की, जमीन वक्फ आहे की नाही याचा निर्णय जिल्हाधिकारी घेतील. जिल्हाधिकारी हा सरकारी माणूस आहे, मग न्याय कसा मिळणार? हे विधेयक वक्फच्या बाजूने नाही, तर वक्फ रद्द करण्यासाठी बनवले आहे. महाराष्ट्र सरकारने आमची मागणी मान्य न केल्यास आझाद मैदानावर आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट