शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
3
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
4
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
5
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
6
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
7
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
8
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
9
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
10
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
11
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
12
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
13
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
14
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
15
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
16
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
17
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
18
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
19
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
20
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश

पाकिस्तानला हुसकवणारा वाघ परतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 05:28 IST

वाघा बॉर्डर : पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांना हुसकावून लावणारे हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी शुक्रवारी रात्री ९ ...

वाघा बॉर्डर : पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांना हुसकावून लावणारे हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी शुक्रवारी रात्री ९ वाजून २० मिनिटांनी पाकिस्तानातून भारताच्या भूमीत पाऊल टाकले.

पाकच्या अधिकाऱ्यांनी अभिनंदन वर्धमान यांना भारतीय लष्कराच्या ताब्यात दिले. तेथून त्यांना लगेचच अमृतसरला नेण्यात आले. तिथे त्यांचे आई-वडील वाट पाहत होते. तेथून ते सर्व जण हवाई दलाच्या विशेष विमानाने अधिकाऱ्यांसह दिल्लीकडे रवाना झाले. ते दिल्लीच्या पालम विमानतळावर नेण्यात आले. पालम विमानतळ हे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी आहे. तिथे ते रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पोहोचले. तिथेही त्यांच्या स्वागतासाठी हवाई दलाचे, तसेच लष्कराचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी भारतीय भूमीत प्रवेश केला, तेव्हा त्यांनी निळ्या रंगाचा कोट घातला होता. त्यांच्या चेहºयावर हास्यही दिसत होते. मात्र, गंभीरपणे ते साºया औपचारिक प्रक्रियांना सामोरे गेले. ते भारतात आल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांवरून दिसताच भारताच्या अनेक भागांत फटाके वाजवण्यात आले आणि मिठाईही वाटण्यात आले. रात्री अनेक शहरांत लोक भारतीय तिरंगा फडकावून आणि ‘भारत माता की जय’ चा जयजयकार करताना दिसत होते.

पाकिस्तानमधून भारतीय भूमीवर प्रवेश करताना, ते अतिशय आत्मविश्वासाने चालताना दिसत होते. त्यांच्यासोबत हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन थॉमस जॉय कुरियन तसेच भारताचे पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातील संरक्षण विभागाचे अधिकारी होते. तसेच काही पाकिस्तानी अधिकारीही होते.भारतीय सीमेवर ते जेमतेम पाचच मिनिटे होते. तेथून हवाई दलाच्या कारमधून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना अमृतसरला नेले. ते २९ किलोमीटरचे अंतर पार करायला त्यांना सुमारे अर्धा तास लागला. ते अमृतसरला पोहोचले, तेव्हा ९ वाजून ५0 मिनिटे झाले होते. विमानतळावरच ते जेवतील, असे आधी ठरले होते. पण नंतर हवाई दलाच्या विमानातच जेवण देण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान मोदी पालम विमानतळावर साडेदहा वाजण्याच्या सुमारात पोहोचणार होते. त्यामुळे पंतप्रधान विमानतळावरून निघून गेल्यानंतर हवाई दलाचे विमान तिथे पोहाचले.

दिल्लीत पोहोचताच, त्यांना लष्कराच्या रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांची प्रकृती तपासण्यात आली. त्यांच्या शरीरावर जखमा आहेत का, त्या कशामुळे झाल्या आहेत, ही सर्व माहिती तेथील डॉक्टरांनी घेतली. तसेच काही उपचारही करण्यात आले. ते मानसिकरित्या शांत आहेत ना, हेही डॉक्टरांनी तपासले. अर्थात ते भारतात अतिशय धिरोदात्तपणे आले होते. त्यामुळे केवळ उपचार म्हणून हे सारे करण्यात आले.

वाघा बार्डर तिथे उपस्थित असलेल्या हजारो भारतीयांना परत जाण्याची विनंती करण्यात आली. पण तरीही तेथून लोक हलायला तयार नव्हते. अभिनंदन यांचे आगमन होणार असल्याने या सीमेवर रोज संध्याकाळी होणारा बिटिंग द रिट्रीट हा कार्यक्रमही रद्द करण्यात आला. तरीही वाघा बॉर्डरच्या परिसरात सुमारे २५ हजार लोक उपस्थित होते. पण अभिनंदन आले, तेव्हा त्यांना जवळ येऊ ही दिले नाही. त्यामुळे हे लोक तिथे असूनही या भारतीय वाघाला पाहू शकले नाहीत. त्यांची कार जातानाच त्यांना पहायला मिळाले. 

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमान