शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

२०२२ ची व्याघ्रगणना हे आतापर्यंतचे सर्वांत विशाल वन्यजीव सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 05:47 IST

२०२२ ची व्याघ्रगणना हे आतापर्यंतचे सर्वांत व्यापक, विशाल वन्यजीव सर्वेक्षण आहे.

नवी दिल्ली :

२०२२ ची व्याघ्रगणना हे आतापर्यंतचे सर्वांत व्यापक, विशाल वन्यजीव सर्वेक्षण आहे. यात २० राज्यांसह ६ लाख ४१ हजार ४४९ किलोमीटरच्या प्रभावशाली पायी सर्वेक्षणाचा समावेश आहे, अशी माहिती राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) जारी  केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. 

या अखिल भारतीय स्तरावरील व्याघ्रगणनेच्या अभ्यास पथकात एनटीसीए तसेच राज्यांमधील अधिकारी आणि तज्ज्ञ, संशोधन जीवशास्त्रज्ञ, वैज्ञानिक, समन्वयक, प्रशिक्षणार्थी व स्वयंसेवक यांचा समावेश होता. सर्वेक्षणाचा एक भाग म्हणून या पथकाने वनस्पती, मानवी प्रभाव आणि अशुद्ध मल यावरील माहिती प्राप्त करण्यासाठी ३,२४,००३ अधिवास भूखंडांचे नमुने घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी म्हैसूर येथे एका कार्यक्रमात जारी केलेल्या ‘स्टेटस ऑफ टायगर्स २०२२’ अहवालानुसार ३२,५८८ ठिकाणी बसवलेल्या कॅमेऱ्यांमुळे वाघांच्या ९७,३९९ प्रतिमांसह एकूण ४,७०,८१,८८१ प्रतिमा मिळाल्या. “या अभ्यासासाठी  मोठ्या प्रमाणावर प्रयत्नांची गरज होती आणि तो पूर्ण करण्यासाठी पथकाने ६ लाख ४१ हजार १०२ मनुष्य दिवस खर्ची घातले. आम्ही मानतो की, आजपर्यंत करण्यात आलेला वन्यजीव सर्वेक्षणाचा जगातील हा सर्वांत मोठा प्रयत्न आहे, असे अहवालात म्हटले आहे. 

वाघांच्या संख्येत उत्साहजनक वाढवाघांची (एक वर्षाहून मोठ्या) एकूण ३,०८० छायाचित्रे कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाली आहेत. २०१८ च्या (२,६९७) आकड्यांच्या तुलनेत ही संख्या वाघांच्या संख्येतील वाढ दर्शवते. “सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार भारतातील वाघांची किमान लोकसंख्या अंदाजे ३,१६७ आहे, जी वाघांच्या संख्येत उत्साहवर्धक वाढ दर्शवते,” असे पर्यावरण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :Tigerवाघ