शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

'ती' भिंत कोसळल्यानं झालेल्या जीवितहानीमुळे तामिळनाडूतील 3 हजार दलित करणार धर्मांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 06:30 IST

इस्लाममध्ये प्रवेश; अस्पृश्यतेच्या भिंतीमुळे १७ जणांचा मृत्यू

कोइम्बतूर : अस्पृश्यतेचा फटका बसलेल्या नाडूर गावातील तीन हजार दलितांनी इस्लाममध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, त्यापैकी दोन हजार दलित येत्या ५ जानेवारी रोजी हे धर्मांतर करणार आहेत. त्या गावात २ डिसेंबर रोजी झालेल्या पावसात भिंत कोसळून १७ जण ठार झाले होते. त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.त्या गावातील शिवसुब्रमण्यन याने आपल्या शेजारी दलितांची घरे असू नयेत, म्हणून मध्येच एक भिंत बांधली होती. ती भिंत बांधताना पुरेशी काळजी घेतली नाही आणि २ डिसेंबरच्या पावसात ती भिंत कोसळली. त्याखाली दबून दलितांच्या तीन कुटुंबातील १७ जण ठार झाले होते. तेव्हापासून तिथे वाद चिघळला आहे.ही भिंत बांधणाऱ्या शिवसुब्रमण्यन याला पोलिसांनी अटक केली; पण त्याची काही दिवसांत जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र, दुर्घटनेबद्दल आवाज उठवणाºया नागई तिरुवल्लूवन या स्थानिक दलित नेत्याला मात्र अद्यापही कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नाडूर व आसपासच्या गावांतील दलित संतप्त आहेत. अस्पृश्यता पाळणाऱ्या व्यक्तीला अ‍ॅट्रॉसिटी कायद्याखाली अटक करण्याऐवजी आमच्याच नेत्याला पोलिसांनी डांबून ठेवले आहे, अशी त्यांची तक्रार आहे. शिवसुब्रमण्यनवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी आम्ही वारंवार केली; पण राज्य सरकार व पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. धर्मांतर करू इच्छिणारे बहुसंख्य दलित हे तामिळ पुळीगल कच्ची संघटनेचे सदस्य आहेत, तसेच ज्या कुटुंबांतील १७ जण भिंत कोसळून ठार झाले, तेही इस्लाममध्ये प्रवेश करू इच्छित आहेत. (वृत्तसंस्था)या धर्मात आम्हाला स्थानच नाहीतामिळ पुळीगल कच्ची या संघटनेचे सरचिटणीस इलावेन्नील म्हणाले की, भिंत कोसळून १७ जण मरणे ही उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी होती. आमच्या जीवनाला हिंदू धर्मात काही किंमतच नसेल तर आम्ही या धर्मात राहायचे तरी का? हिंदू धर्माला आमची काळजी नसेल, तर आम्हालाही त्या धर्मात राहण्याची इच्छा नाही.

टॅग्स :Muslimमुस्लीम