शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
4
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
5
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
6
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
7
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
8
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
9
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
10
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
11
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
12
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
13
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
14
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
15
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
16
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
17
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
18
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
19
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
20
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
Daily Top 2Weekly Top 5

'ती' भिंत कोसळल्यानं झालेल्या जीवितहानीमुळे तामिळनाडूतील 3 हजार दलित करणार धर्मांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 06:30 IST

इस्लाममध्ये प्रवेश; अस्पृश्यतेच्या भिंतीमुळे १७ जणांचा मृत्यू

कोइम्बतूर : अस्पृश्यतेचा फटका बसलेल्या नाडूर गावातील तीन हजार दलितांनी इस्लाममध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, त्यापैकी दोन हजार दलित येत्या ५ जानेवारी रोजी हे धर्मांतर करणार आहेत. त्या गावात २ डिसेंबर रोजी झालेल्या पावसात भिंत कोसळून १७ जण ठार झाले होते. त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.त्या गावातील शिवसुब्रमण्यन याने आपल्या शेजारी दलितांची घरे असू नयेत, म्हणून मध्येच एक भिंत बांधली होती. ती भिंत बांधताना पुरेशी काळजी घेतली नाही आणि २ डिसेंबरच्या पावसात ती भिंत कोसळली. त्याखाली दबून दलितांच्या तीन कुटुंबातील १७ जण ठार झाले होते. तेव्हापासून तिथे वाद चिघळला आहे.ही भिंत बांधणाऱ्या शिवसुब्रमण्यन याला पोलिसांनी अटक केली; पण त्याची काही दिवसांत जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र, दुर्घटनेबद्दल आवाज उठवणाºया नागई तिरुवल्लूवन या स्थानिक दलित नेत्याला मात्र अद्यापही कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नाडूर व आसपासच्या गावांतील दलित संतप्त आहेत. अस्पृश्यता पाळणाऱ्या व्यक्तीला अ‍ॅट्रॉसिटी कायद्याखाली अटक करण्याऐवजी आमच्याच नेत्याला पोलिसांनी डांबून ठेवले आहे, अशी त्यांची तक्रार आहे. शिवसुब्रमण्यनवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी आम्ही वारंवार केली; पण राज्य सरकार व पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. धर्मांतर करू इच्छिणारे बहुसंख्य दलित हे तामिळ पुळीगल कच्ची संघटनेचे सदस्य आहेत, तसेच ज्या कुटुंबांतील १७ जण भिंत कोसळून ठार झाले, तेही इस्लाममध्ये प्रवेश करू इच्छित आहेत. (वृत्तसंस्था)या धर्मात आम्हाला स्थानच नाहीतामिळ पुळीगल कच्ची या संघटनेचे सरचिटणीस इलावेन्नील म्हणाले की, भिंत कोसळून १७ जण मरणे ही उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी होती. आमच्या जीवनाला हिंदू धर्मात काही किंमतच नसेल तर आम्ही या धर्मात राहायचे तरी का? हिंदू धर्माला आमची काळजी नसेल, तर आम्हालाही त्या धर्मात राहण्याची इच्छा नाही.

टॅग्स :Muslimमुस्लीम