शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

'ती' भिंत कोसळल्यानं झालेल्या जीवितहानीमुळे तामिळनाडूतील 3 हजार दलित करणार धर्मांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 06:30 IST

इस्लाममध्ये प्रवेश; अस्पृश्यतेच्या भिंतीमुळे १७ जणांचा मृत्यू

कोइम्बतूर : अस्पृश्यतेचा फटका बसलेल्या नाडूर गावातील तीन हजार दलितांनी इस्लाममध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, त्यापैकी दोन हजार दलित येत्या ५ जानेवारी रोजी हे धर्मांतर करणार आहेत. त्या गावात २ डिसेंबर रोजी झालेल्या पावसात भिंत कोसळून १७ जण ठार झाले होते. त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.त्या गावातील शिवसुब्रमण्यन याने आपल्या शेजारी दलितांची घरे असू नयेत, म्हणून मध्येच एक भिंत बांधली होती. ती भिंत बांधताना पुरेशी काळजी घेतली नाही आणि २ डिसेंबरच्या पावसात ती भिंत कोसळली. त्याखाली दबून दलितांच्या तीन कुटुंबातील १७ जण ठार झाले होते. तेव्हापासून तिथे वाद चिघळला आहे.ही भिंत बांधणाऱ्या शिवसुब्रमण्यन याला पोलिसांनी अटक केली; पण त्याची काही दिवसांत जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र, दुर्घटनेबद्दल आवाज उठवणाºया नागई तिरुवल्लूवन या स्थानिक दलित नेत्याला मात्र अद्यापही कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नाडूर व आसपासच्या गावांतील दलित संतप्त आहेत. अस्पृश्यता पाळणाऱ्या व्यक्तीला अ‍ॅट्रॉसिटी कायद्याखाली अटक करण्याऐवजी आमच्याच नेत्याला पोलिसांनी डांबून ठेवले आहे, अशी त्यांची तक्रार आहे. शिवसुब्रमण्यनवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी आम्ही वारंवार केली; पण राज्य सरकार व पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. धर्मांतर करू इच्छिणारे बहुसंख्य दलित हे तामिळ पुळीगल कच्ची संघटनेचे सदस्य आहेत, तसेच ज्या कुटुंबांतील १७ जण भिंत कोसळून ठार झाले, तेही इस्लाममध्ये प्रवेश करू इच्छित आहेत. (वृत्तसंस्था)या धर्मात आम्हाला स्थानच नाहीतामिळ पुळीगल कच्ची या संघटनेचे सरचिटणीस इलावेन्नील म्हणाले की, भिंत कोसळून १७ जण मरणे ही उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी होती. आमच्या जीवनाला हिंदू धर्मात काही किंमतच नसेल तर आम्ही या धर्मात राहायचे तरी का? हिंदू धर्माला आमची काळजी नसेल, तर आम्हालाही त्या धर्मात राहण्याची इच्छा नाही.

टॅग्स :Muslimमुस्लीम